शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
2
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
3
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
4
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
5
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
6
चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?
7
मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 
8
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
10
"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
11
वैमानिकांची पळवापळवी! जॉइनिंगसाठी थेट ५० लाखांची ऑफर; इंडिगो आणि एअर इंडियामध्ये चुरस
12
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
13
“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
14
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
15
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
16
VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
17
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
18
एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश
19
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
20
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी गेल्याच्या धक्क्याने राणे यांचा मृत्यू

By admin | Updated: January 8, 2015 22:57 IST

सालेकसा तालुक्यातील इठाई आश्रमशाळेची मान्यता आदिवासी आयुक्त नाशिक यांच्या पत्रान्वये रद्द करण्यात आली आहे. त्यातील कर्मचाऱ्यांचे समायोजन इतरत्र शाळेत करण्यात येणार आहे.

प्रशासन जबाबदार : पत्नी, मुले-मुली, कुटुंब उघड्यावरसालेकसा : सालेकसा तालुक्यातील इठाई आश्रमशाळेची मान्यता आदिवासी आयुक्त नाशिक यांच्या पत्रान्वये रद्द करण्यात आली आहे. त्यातील कर्मचाऱ्यांचे समायोजन इतरत्र शाळेत करण्यात येणार आहे. तोपर्यंत त्यांचा पगार देण्यात यावा, असे आदेश तत्कालीन अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर पल्लवी दराडे यांनी सर्व प्र्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेले आहे. तरीसी आॅगस्ट ते डिसेंबर २०१४ या महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. याच विवंचनेत एका कर्मचाऱ्याने जीवनयात्रा संपविली.ईठाई आश्रम शाळेचे स्वयंपाकी सुखदेव राणे यांचा चार महिन्यांपासून पगार झाला नाही. शाळेची मान्यता रद्द झाली. नवीन ठिकाणी देवलभट्ी, ता. अहेरी जि.गडचिरोली येथे रूजू होण्यास अप्पर आयुक्त आदिवासी नागपूर यांनी सांगितले.तेथे शाळेत गेल्यावर जागा रिक्त नाही म्हणून उलट पावली परत पाठविण्यात आले. ही माहिती नागपूर कार्यालयाला देण्यात आली. पुन्हा वाट बघण्याचा सल्ला देण्यात आला. प्रधान सचिव यांच्या बैठकीत समायोजित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन समायोजित करण्यात येईपर्यंत कालावधीचे प्रलंबित वेतन अदा करण्याची कार्यवाही अप्पर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांच्यावर राहील असा स्पष्ट आदेश असतानाही प्रकल्प अधिकारी देवरी यांनी सुखदेव राणे यांचे चार महिन्याचे वेतन दिलेले नाही. नोकरी गेली, नवीन शाळेत रूजू करीत नाही, ४ महिन्यापासून पगार नाही या मानसिक धक्याने राणे यांचा तोल जाऊन त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना गोंदिया येथे केटीएस रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांना नागपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला. रुपये नसल्यामुळे त्यांना परत गावी आणण्यात आले. खासगी डॉक्टरांचा उपचार सुरू असतानाच ६ जानेवारी २०१५ ला कौटुंबिक विवंचना व मानसिक धक्यामुळे राणे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी, दहा वर्षाची मुलगी, ८ वर्षाचा मुलगा, आई-वडील यांच्यावर उदरनिर्वाहचा गंभीर प्रसंग निर्माण झालेला आहे. या राणे यांच्या मृत्यूस पागर चार महिने न देणारे प्रकल्प अधिकारी दोषी आहेत, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. आता अनुकंपा तत्वावर राणे यांच्या पत्नी यांना शासनाने नोकरीत घ्यावे, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. अन्यथा कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वारंवार प्रशासनाकडे तक्रार नोंदवूनही काही उपयोग झाला नाही. जेथे आपण सेवा दिली तेथेच आपल्याला न्याय मिळत नसेल तर जगायचे कसे, या विवंचनेत ते सतत राहयचे, असेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.(तालुका प्रतिनिधी)