शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
4
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
5
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
6
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
7
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
8
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
9
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
10
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
11
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
12
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
13
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
14
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
15
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
16
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
17
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
18
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
19
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
20
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ

अवकाळी पावसाने लाखो क्विंटल धान भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत काही भागात रिमझिम पाऊस सुरूच होता. आमगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, गोंदिया,अर्जुनी मोरगाव,सालेकसा तालुक्यात पाऊस झाल्याने याचा धानाची मळणी करीत असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : शासकीय धान खरेदी, पाखड धानाची समस्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात गुरूवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या लाखो क्विंटल धान भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकºयांना धानाची विक्री करण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांवर असमानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७२ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत काही भागात रिमझिम पाऊस सुरूच होता. आमगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, गोंदिया,अर्जुनी मोरगाव,सालेकसा तालुक्यात पाऊस झाल्याने याचा धानाची मळणी करीत असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे धान खरेदी केंद्र आहेत. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा धान विक्रीसाठी पडून आहे. आदिवासी विकास महामंडळाचा खरेदी केलेला संपूर्ण ४ लाख क्विंटल धान उघड्यावर असून याला अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसामुळे धान भिजल्याने ते पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत ८ लाख क्विंटल धान खरेदी केला असून यापैकी काही धान गोदामात तर काही धान ताडपत्र्या झाकून केंद्रावर पडला आहे. चार दिवसांपूर्वी सरकारने धानाच्या हमीभावात दोनशे रुपये प्रती क्विटंल दर वाढविल्याने शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर गर्दी केली होती. शेकडो शेतकऱ्यांच्या धानाचा काटा न झाल्याने ते खरेदी केंद्राच्या आवारात तसेच पडून आहे.दरम्यान गुरूवारी सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे धान घेत ताडपत्र्या झाकून धानाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्रावर शेतकरी पोहचेपर्यंत धानाचे पोते ओले झाल्याने शेतकºयांना नुकसान सहन करावे लागले. आमगाव तालुक्यातील कट्टीपार, कालीमाटी, सुपलीपार, गोरठा आणि तिगाव या धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धान ओले झाले. त्यामुळे हे वाळविल्याशिवाय विकता येणार नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.रब्बी पिकांना फटकाजिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात काही प्रमाणात भाजीपाला पिकांचा देखील समावेश आहे.अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे.केंद्र संचालकांचे जीआरवर बोटशासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांचा धानाचा काटा न झाल्यास ते धान केंद्रावर उघड्यावर पडून असल्यासमुळे भिजल्यास अथवा चोरीला गेल्यास यासाठी खरेदी केंद्र व शासन जबाबदार राहणार नाही, असे शासनाच्या जीआरमध्ये नमूद आहे.सध्या सर्वच केंद्रावर शेतकऱ्यांच्या लाखो क्विंटल धानाचा काटा व्हायचा आहे. पावसामुळे हे धान भिजून नुकसान झाले असून याची कुठलीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.खरेदी केंद्रावर ताडपत्र्यांचा तुटवडाशासकीय धान खरेदी व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. तर पावसापासून धानाचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्र्यांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. पण अनेक धान खरेदी केंद्रावर ताडपत्र्यांचा तुटवडा होता. तर काही केंद्रावर फाटलेल्या ताडपत्र्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.शेतकऱ्यांच्या समस्येत वाढगुरूवारी जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे धान भिजल्याने ते पाखड झाले. पाखड झालेले धान खरेदी केले जात नसल्याने हे धान मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कोंडीजिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा धानाचा काटा आठ आठ दिवस होत नसल्याने शेतकऱ्यांना धानाची राखन करीत केंद्रावर राहावे लागत आहे. त्यातच गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान सहन करावे लागले. याची नुकसान भरपाई सुध्दा शासनाकडून मिळणार नसल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी केली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी