शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

नियमभंग करणाऱ्यांना दंडाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

कोरोनाशी लढण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उपसण्यात आले व त्यामुळे सुमारे २ महिने उद्योगधंदे व अन्य व्यवहार बंद पडून होते. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक फटका सहन करीत कारभार चालवावा लागत आहे. त्यात राज्य शासनाचेही आर्थिक उत्पन्न खुंटल्याने त्यांनाही कारभार चालविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांचा विचार करणे गरजेचे होते.

ठळक मुद्देनगर परिषद पथकाची नजर : २९२ जणांवर पथकाने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता देत शासनाने काही नियमांतर्गत दैनंदिन व्यवहारांना परवानगी दिली. त्यानुसार शहरातील बाजारपेठ उघडली असून मात्र नागरिक व व्यापाऱ्यांना नियमांना बगल दिली जात आहे. अशा नागरिक व व्यापाºयांवर नजर ठेवण्यासाठी नगर परिषदेने विशेष पथकांचे गठन केले आहे. या पथकांनी आजवर २९२ नागरिक व व्यापाऱ्यांना दणका देत त्यांच्याकडून ४३ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, हे पथक बाजारपेठ व शहरावर नजर ठेवून असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. कोरोनामुळे ‘न भूतो न भविष्यती’ अशी स्थिती अवघ्या जगापुढे निर्माण झाली आहे.कोरोनाशी लढण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उपसण्यात आले व त्यामुळे सुमारे २ महिने उद्योगधंदे व अन्य व्यवहार बंद पडून होते. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक फटका सहन करीत कारभार चालवावा लागत आहे. त्यात राज्य शासनाचेही आर्थिक उत्पन्न खुंटल्याने त्यांनाही कारभार चालविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांचा विचार करणे गरजेचे होते. अशात राज्य शासनाने ‘लॉकडाऊन’ शिथिल करीत दैनंदिन व्यवहारांना परवानगी दिली असून यासाठी काही नियम ठरवून देण्यात आहेत.मात्र शहरातील बाजारपेठेत बघता व्यापारी व नागरिक दोघांकडूनच नियमांना तिलांजली देत वागणे सुरू आहे. यावरून शिथिलतेचा अर्थ यांनी संपूर्ण सुटका असा समजून घेतल्यासारखे वाटत आहे.या सर्व व्यवहारांवर नजर ठेवणे गरजेचे असून अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगण्याची पाळी येऊ नये यासाठी नगर परिषदेने ३ विशेष पथकांचे गठन करून बाजारपेठेतील व्यवहारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.त्यानुसार, हे पथक १९ मे पासून कार्य करीत असून आजवर २९२ जणांना दंडाचा दणका देत त्यांच्याकडून ४३ हजार रूपये या पथकाने वसूल केले आहेत. दुकानदारांना ग्राहकांची गर्दी करून घेऊ नये, ग्राहकांनी मास्क लावणे, त्यांना हँडवॉश किंवा सॅनिटायजर पुरविणे, शारिरिक अंतर ठेवणे, नोंद घेणे आदि नियमांतर्गत काम करावयाचे आहे.तर नागरिकांनाही स्वत:ची सुरक्षा लक्षात घेत निघायचे आहे. मात्र व्यापारी व नागरिक दोघांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने पथक बारीक नजर ठेऊन आहे.पथकाने अशा केल्या कारवायापथकाने केलेल्या कारवायांत मास्क न लावणाऱ्या २८० जणांना प्रत्येकी १०० रूपये दंड ठोठावला असून २८ हजार रूपये वसूल केले आहेत. शारीरिक अंतर पाळता ग्राहकांची गर्दी करणाºया ९ दुकानदारांना प्रत्येकी एक हजार रूपये दंड ठोठावला असून नऊ हजार रूपये वसूल केले आहेत. विनाकारण फिरणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५०० रूपये दंड ठोठावला असून त्यांच्याकडून एक हजार रूपये तर होम क्वारंटाईन करण्यात आले असतानाही बाहेर फिरत असलेल्या एकाला एक हजार रूपयांचा दंड ठोठावला असून अशा एकूण २९२ कारवायांत ४३ हजार रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती लेखाधिकारी व पथक प्रमुख अविनाश फोफाटे यांनी सांगीतले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या