शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

नियमभंग करणाऱ्यांना दंडाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

कोरोनाशी लढण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उपसण्यात आले व त्यामुळे सुमारे २ महिने उद्योगधंदे व अन्य व्यवहार बंद पडून होते. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक फटका सहन करीत कारभार चालवावा लागत आहे. त्यात राज्य शासनाचेही आर्थिक उत्पन्न खुंटल्याने त्यांनाही कारभार चालविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांचा विचार करणे गरजेचे होते.

ठळक मुद्देनगर परिषद पथकाची नजर : २९२ जणांवर पथकाने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता देत शासनाने काही नियमांतर्गत दैनंदिन व्यवहारांना परवानगी दिली. त्यानुसार शहरातील बाजारपेठ उघडली असून मात्र नागरिक व व्यापाऱ्यांना नियमांना बगल दिली जात आहे. अशा नागरिक व व्यापाºयांवर नजर ठेवण्यासाठी नगर परिषदेने विशेष पथकांचे गठन केले आहे. या पथकांनी आजवर २९२ नागरिक व व्यापाऱ्यांना दणका देत त्यांच्याकडून ४३ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, हे पथक बाजारपेठ व शहरावर नजर ठेवून असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. कोरोनामुळे ‘न भूतो न भविष्यती’ अशी स्थिती अवघ्या जगापुढे निर्माण झाली आहे.कोरोनाशी लढण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उपसण्यात आले व त्यामुळे सुमारे २ महिने उद्योगधंदे व अन्य व्यवहार बंद पडून होते. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक फटका सहन करीत कारभार चालवावा लागत आहे. त्यात राज्य शासनाचेही आर्थिक उत्पन्न खुंटल्याने त्यांनाही कारभार चालविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांचा विचार करणे गरजेचे होते. अशात राज्य शासनाने ‘लॉकडाऊन’ शिथिल करीत दैनंदिन व्यवहारांना परवानगी दिली असून यासाठी काही नियम ठरवून देण्यात आहेत.मात्र शहरातील बाजारपेठेत बघता व्यापारी व नागरिक दोघांकडूनच नियमांना तिलांजली देत वागणे सुरू आहे. यावरून शिथिलतेचा अर्थ यांनी संपूर्ण सुटका असा समजून घेतल्यासारखे वाटत आहे.या सर्व व्यवहारांवर नजर ठेवणे गरजेचे असून अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगण्याची पाळी येऊ नये यासाठी नगर परिषदेने ३ विशेष पथकांचे गठन करून बाजारपेठेतील व्यवहारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.त्यानुसार, हे पथक १९ मे पासून कार्य करीत असून आजवर २९२ जणांना दंडाचा दणका देत त्यांच्याकडून ४३ हजार रूपये या पथकाने वसूल केले आहेत. दुकानदारांना ग्राहकांची गर्दी करून घेऊ नये, ग्राहकांनी मास्क लावणे, त्यांना हँडवॉश किंवा सॅनिटायजर पुरविणे, शारिरिक अंतर ठेवणे, नोंद घेणे आदि नियमांतर्गत काम करावयाचे आहे.तर नागरिकांनाही स्वत:ची सुरक्षा लक्षात घेत निघायचे आहे. मात्र व्यापारी व नागरिक दोघांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने पथक बारीक नजर ठेऊन आहे.पथकाने अशा केल्या कारवायापथकाने केलेल्या कारवायांत मास्क न लावणाऱ्या २८० जणांना प्रत्येकी १०० रूपये दंड ठोठावला असून २८ हजार रूपये वसूल केले आहेत. शारीरिक अंतर पाळता ग्राहकांची गर्दी करणाºया ९ दुकानदारांना प्रत्येकी एक हजार रूपये दंड ठोठावला असून नऊ हजार रूपये वसूल केले आहेत. विनाकारण फिरणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५०० रूपये दंड ठोठावला असून त्यांच्याकडून एक हजार रूपये तर होम क्वारंटाईन करण्यात आले असतानाही बाहेर फिरत असलेल्या एकाला एक हजार रूपयांचा दंड ठोठावला असून अशा एकूण २९२ कारवायांत ४३ हजार रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती लेखाधिकारी व पथक प्रमुख अविनाश फोफाटे यांनी सांगीतले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या