शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

४५८ जलस्रोतांची कामे पूर्ण २२७ कामे प्रस्तावित

By admin | Updated: February 2, 2015 23:09 IST

पाण्याशिवाय शेती नाही, शेतीशिवाय अन्न नाही व अन्नाशिवाय जीवन नाही. याकरिता केंद्र व राज्यसरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता पाण्याचे स्त्रोत कसे तयार करता येतील,

काचेवानी : पाण्याशिवाय शेती नाही, शेतीशिवाय अन्न नाही व अन्नाशिवाय जीवन नाही. याकरिता केंद्र व राज्यसरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता पाण्याचे स्त्रोत कसे तयार करता येतील, पाणी कसे थांबवता येईल, पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना कशाप्रकारे देता व घेता येईल यासाठी विविध योजना तयार करून त्या क्रियान्वित केल्या. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना खरच मिळाला आणि उत्पादनातही वाढ झाल्याचे या दशकाच्या उत्पादनावरून दिसून येते. मग्रारोहयो आणि राष्ट्रीय कृषी अभियानांतर्गत अनेक योजना आणि कामे राबविण्यात येत आहेत. जिल्हा पातळीपासून तर ग्रामीण पातळीपर्यंत अनेक विभागामार्फत वेगवेगळी कामे पूर्ण केले जात आहेत. यात कृषी विभाग समाविष्ट आहे. तिरोडा तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना विविध माध्यमातून पाण्याची उपलब्धता व्हावी, अधिक वेळपर्यंत जमिनीत पाणी टिकून रहावे, पाण्याची पातळी वाढावी, गुरांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी अशा अनेक कारणांसाठी सन २००४-०५ ते २०१२-१३ या नऊ वर्षांत ४५८ पाण्याच्या स्त्रोतांची कामे पूर्ण केली आहेत. सन २०१४-१५ साठी २२७ कामे प्रस्तावित करण्यात आले असून त्यांना पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न केले जाईल, असे तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे यांनी सांगितले. तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत मग्रारोहयो आणि राष्ट्रीय कृषी अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये शेततळे १७४, बोडी खोलीकरण कामे १३६, सिनाबा (सिमेंट नाला बांध) १३३ आणि अन्य १५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सन २०११-१२ या वर्षात सर्वाधिक एकूण १४३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सन २००४-०५ या वर्षाला शेततळे (२०), बोडी खोलीकरण (९), सिनाबा (९), २००५-०६ या वर्षामध्ये शेततळे (१७), बोरवेल (८), सिनाबा (२७), मानाबा (३) असे एकूण ५५ कामे पूर्ण करण्यात आले. २००८-०९ मध्ये शेततळे (१०), बोडी खोलीकरण (१३), सिनाबा (११) असे एकूण ३४ कामे पूर्ण करण्यात आले. सन २०१०-११ या आर्थिक वर्षात शेततळे (३८), बोडी खोलीकरण (४९), सिनाबां (३४) आणि मानाबा (८) असे एकूण १२९ कामे पूर्ण करण्यात आले. सन २०११-१२ या आर्थिक वर्षात शेततळे (७७), बोडी खोलीकरण (३९), सिनाबां (३३) व मानाबां (२) असे एकूण १४३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नऊ वर्षातून चार वर्षे वगळता पाच वर्षांत एकूण शेततळे (१७४), बोडी खोलीकरण (१३६), सिनाबां (१३३) आणि मानाबां (१५) असे ४५८ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांतून शेतीला तसेच मानवी समस्येला पाण्याचा आधार मिळाला. यातून शेतकऱ्यांसह इतर प्राण्यांना पाण्याची उपलब्धता प्राप्त झाली. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादनात भर पडली, असे कृषी विभागाने सांगितले आहे. (वार्ताहर)