शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

आंबेनाला प्रकल्प लवकरच पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 21:19 IST

आजपर्यंत ज्या ज्या कामामध्ये हात घातले ते ते काम यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. भुराटोला लघू पाटबंधारे प्रकल्पामुळे ४८९ हेक्टर शेतीला सिंचन होईल. याचे काही काम पूर्ण झाले असून निधीअभावी काही काम रखडले होते.

ठळक मुद्दे१३ कोटी ८० लाख मंजूर : भुराटोला लघू प्रकल्पाचे काम जून २०१८ पर्यंत होणार पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : आजपर्यंत ज्या ज्या कामामध्ये हात घातले ते ते काम यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. भुराटोला लघू पाटबंधारे प्रकल्पामुळे ४८९ हेक्टर शेतीला सिंचन होईल. याचे काही काम पूर्ण झाले असून निधीअभावी काही काम रखडले होते. सततचा पाठपुरावा व कार्यकारी अभियंता फाडके यांच्या सहकार्याने भुराटोला लघू प्रकल्पाचे काम जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल. तसेच ४० वर्षांपासून रखडलेला आंबेनाला प्रकल्प सुध्दा लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी रविवारी (दि.१४) येथे प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी केले.महाराष्टÑ शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत, विदर्भ पाटबंधारे विभाग महामंडळ नागपूरमधील भुराटोला लघू पाटबंधारे प्रकल्प तालुका तिरोडाचे भूमिपूजन आ. रहांगडाले यांच्या हस्ते, माजी आ. भजनदास वैद्य यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाडके, सरपंच कमलेश आतीलकर, प्रकाश भोंगाडे, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, पं.स. सदस्य पवन पटले, कृउबासचे सदस्य तेजराम चव्हाण, चतुर्भूज बिसेन, मिलिंद कुंभरे, उपसरपंच बाबू कटरे उपस्थित होते.आ. रहांगडाले म्हणाले, या प्रकल्पामुळे शेतकºयांना शेतीसाठी पाणी मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रकल्पाच्या कामासाठी ग्रामपंचायतची एनओसी लागत होती. ती पं.स. सदस्य पवन पटले तसेच सरपंचांनी तत्काळ मिळवून दिली. हा आपल्या तालुक्यातील पहिलाच प्रकल्प आहे की ज्याचे पाणी शेतीला कॅनलद्वारे न जाता पाईपने जाईल, तेही जमिनीच्या ३ फूट खालून. त्यामुळे शेती, जमीन जाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. प्रत्येक शेतकºयासाठी व्हॉलची व्यवस्था असणार आहे. धापेवाडा प्रकल्पाला १५ वर्षांपासून गती नव्हती. हा प्रकल्प २००४- ०५ मध्येच पूर्ण झाला असता तर आता दुष्काळ पडला नसता, असे ते म्हणाले.प्रास्ताविकातून उपकार्यकारी अभियंता के.एस. मुनगनिवार यांनी, हा प्रकल्प निधीअभावी रखडला होता. परंतु आ. रहांगडाले यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला असून जून १८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता फाडके यांनी या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यास आ. रहांगडाले यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य पवन पटले यांनी शेतकºयांना शेती अधिग्रहण करताना नुकसानभरपाई कमी मिळाली, ते मिळवून देवू असे सांगितले. नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी, ४० वर्षे जुनी पाणी पुरवठा योजना तिरोडावासीयांना पुरेशी नव्हती. आता नवीन २७ कोटी रुपयांची योजना मंजूर करवून दिली. आम्ही एक पाऊल समोर टाकतो तर आ. विजय रहांगडाले आम्हाला १०० पावले पुढे नेतात, असे सांगितले. डॉ. चिंतामन रहांगडाले यांनी भुराटोला, आंबेनाला, धापेवाडा टप्पा-२ यामुळे तालुक्यात हरितक्रांती येणार असल्याचे सांगितले. मदन पटले यांनी या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे परिसरातील शेतकरी समृद्ध होतील, असे सांगितले. माजी आ. भजनदास वैद्य यांनी या प्रकल्पामुळे करटी, करटी खुर्द, पालडोंगरी, भुराटोला या गावाला पाण्याची समस्या भेडसावणार नसून येथील शेतकरी समृद्ध होतील, असे सांगितले.शेवटी या गावातील जनतेच्या सोईच्या दृष्टीने दहा लाखांचा एक रस्ता तसेच तीन-तीन लाखांचे दोन रस्ते मंज़ूर केल्याचे आ. रहांगडाले यांनी आभार व्यक्त करताना घनशाम पारधी यांना सांगण्यास सांगितले.याप्रसंगी मंचावर डॉ. वसंत भगत, सरपंच संगीता पुराम, भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे, उमाकांत हारोडे, सलाम शेख, सरपंच सुधा घरजारे, पोलीस पाटील अरविंद चौरे, सुकचंद रहांगडाले, जितेंद्र रहांगडाले, तेजराम चव्हाण, पांडुरंग टेकाम, प्रकाश गौतम, योगेश्वर रहांगडाले, धीरज बरियेकर, निलेश बावनथडे, मुकेश पटले प्रामुख्याने उपस्थित होते.संचालन डुलेश रहांगडाले यांनी केले. आभार घनशाम पारधी यांनी मानले. कार्यक्रमासाठी एच.ए. गायकवाड, एम.बी. कदम, कर्मचारी, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले....अन्यथा राजीनामा घ्या!खळबंदा जलाशयात १८ किमीची पाईपलाईन पूर्ण करुन पाणी सोडले आहे. धापेवाडाच्या टप्पा २ चे पाणी चोरखमारा व बोदलकसा जलाशयात २०१९ मध्ये सोडल्याशिवाय राहणार नाही. ४० वर्षांपासून रखडलेला आंबेनाला प्रकल्प पूर्ण होणार असून त्यासाठी मुख्यमंत्र्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे यासाठी उपोषण करण्याची परवानगी द्या अथवा माझा राजीनामा स्वीकारा, असे कळकळीने सांगितले होते. हा प्रकल्प न झाल्यास मला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे सांगितल्यावर दुसºयाच दिवशी मुख्यमंत्र्यांनी १३ कोटी ८० लाखांचा निधी मंत्रिमंडळात मंजूर करुन मला बोलावून स्वत: सांगितले. तर दुसरीकडे मोठे नेते या प्रकल्पासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे सांगतात, असा टोमणाही यावेळी आमदार विजय रहांगडाले यांनी मारला.