शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

गाव झाले आदर्श आता दूर व्हावी सिंचनाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 9:54 PM

तालुक्यातील ३८०० लोकवस्तीचे पाथरी गाव म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या येथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोकांची इच्छा होती.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाथरीचा बदलला चेहरा मोहरा । खासदार दत्तक गाव, आत्तापर्यंत ७ कोटीचा निधी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील ३८०० लोकवस्तीचे पाथरी गाव म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या येथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोकांची इच्छा होती. माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी हे गाव दत्तक घेतले आणि येथील गावकºयांनाही विकासाची स्वप्न पडू लागली.अल्पावधीत गावात झालेल्या विकास कामांमुळे गावाचा चेहरा मोहरा बदलला व आदर्श गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली.पाथरी गावात सर्वच जाती धर्माचे लोक राहतात.गावातील सामाजिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे. गावातील कोणतेही भांडण-तंटे गावातच सामोपचाराने मिटविले जातात. बहुतांश लोक शेतीवर उपजिविका करणारे आहेत. पण जवळच असलेल्या कटंगी प्रकल्पात या गावातील १५० ते २०० लोकांची शेत जमीन गेली. त्यामुळे अनेकांना उपजिविकेसाठी गाव सोडून जावे लागले. आता ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना येथे कटंगी मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाची मोठी आस आहे.कटंगी व प्रकल्पासाठी शेतजमिनी देऊनही त्या प्रकल्पाचे पाणी या गावकºयांना मिळू शकत नाही. ही येथील गावकºयांची सर्वात मोठी खंत आहे. हे गाव आणि लगतच्या शेत जमिनी उंच आहे. तर प्रकल्पाचे स्थळ खालच्या भागाला आहे. त्यामुळे गावात थेट पाणी पोहोचू शकत नाही. मात्र लिफ्ट करुन (उपसा सिंचन योजना ) प्रकल्पाचे पाणी शेताला द्यावे,अशी गावकºयांची अपेक्षा आहे. शेतीला पाण्याची सोय झाली तर पाथरीतील शेतकरी रब्बी हंगामातही धानाचे पीक घेऊन संपन्न होतील. पाथरी गावाला खा.प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेतल्यापासून आजपर्यंत सात कोटी ६३ लाख रुपयांचे विविध योजनेतील विकासकामे करण्यात आली. बस स्टँंड, सपाटीकरण, सौंदर्यीकरण, व्यायाम शाळा, रस्ते, नाली, सार्वजनिक शौचालय, सांडपाण्याची व्यवस्था, आरोग्य स्वच्छतेवर खर्च करण्यात आले.उपसा सिंचन, क्रीडांगण, व्यायाम शाळा साहित्य व इतर विकास कामासाठी पाच कोटी रुपयांची मागणी आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतच्या वर्गाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी एक कि.मी.अंतरावर असलेल्या कुºहाडी गावात जावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रही कुºहाडीत आहे.एक कि.मी.चे अंतर पार करताना गावकºयांना कोणतीही अडचण नाही.खा. प्रफुल्ल पटेल यांनी हे गाव दत्तक घेतल्यामुळे गावकºयांचा आशा पल्लवित झाल्या आहेत.गावाचा कायापालट झाला. सर्व सोई सवलती, शासकीय योजनांचा लाभ मिळाला. रस्ते, नाल्या चकचकीत झाल्या, स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जागृती आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांनी आमच्या गावाला दत्तक घेवून पाथरीवासियांच्या हृदयाला साद दिली.- ज्ञानेश्वर शहारे,नागरिक, पाथरी.