शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

पं.स.ला भ्रष्टाचाराचे ग्रहण

By admin | Updated: April 20, 2017 01:09 IST

तालुकास्तरावर ग्रामीण विभागाचे मिनी मंत्रालय म्हणून पंचायत समिती काम पाहते.

मनरेगा विभाग : शौचालय बांधकाम, सिमेंट रस्ता, गुरांचे शेड, वृक्ष लागवडीमध्ये साटेलोटे परसवाडा : तालुकास्तरावर ग्रामीण विभागाचे मिनी मंत्रालय म्हणून पंचायत समिती काम पाहते. केंद्र शासनाची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अस्तित्वात असून यात शासनाने दारिद्र्य निमुर्लनासाठी मोठी तरतूद केली आहे. पंचायत समिती स्तरावरील यंत्रणा संपूर्ण काम पाहते. पण तिरोडा पंचायत समितीच्या मनरेगा विभागात एक वर्षापासून कामांमध्ये भ्रष्टाचाराचे गालबोट लागत आहे. यात मातीकाम, रस्त्याचे काम, नाली सरळीकरण, पाटचारा दुरुस्ती, शौचालय बांधकाम, सिमेंट रस्ता, मुरुम टाकणे, वृक्ष लागवड, गुरांचे गोठे, शेळीचे गोठे, घनकचरा, घरकुल व इतर सर्वच कामे नरेगाच्या अंतर्गत केली जातात. पण याकडे तालुकास्तरीय यंत्रणाचे गटविकास अधिकारी यांचा दुर्लक्षपणा व साधेपणाचा लाभ ग्रामपंचायत विभाग घेत आहे. प्रत्येक गावात मनरेगा अंतर्गत शौचालयाचे काम सुरू आहेत. पण जुनेच शौचालय दाखवून मजुराचे नाव टाकून मस्टर काढला जात आहे. सिमेंट रस्ते ६०-४० च्या निकषाप्रमाणे पैसे देवून अंदाजपत्रक तयार केले जात आहे. एक लाखाच्यावर साहित्य झाल्यास ई-निविदा काढणे ग्रामपंचायतला आवश्यक आहे. पण पंचायत समिती स्तरावरुनच घोळ, सोटेलोटे असल्याने ई-निविदा न काढता लाखो रुपयांचे काम करण्यात आले व शासनाच्या नियमाला कचराकुंडीत टाकण्यात आले आहे. मुरुमाच्याही कामाची ई-निविदा काढली जात नाही. शासनाच्या पैशाची चोरी दिशाभूल करून तिरोडा पंचायत समितीत होत आहे. गुरांच्या शेडमध्येही घोळ असून ज्याच्याकडे जनावरे, शेळ्या, कुक्कुट नाही अशा लोकांना शेड देण्यात आले आहे. खोटे दाखले देणारे पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाईची मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. वृक्ष लागवड जुलै महिन्यात करण्यात आली होती. यात संपूर्ण वृक्ष गहाळ झाले तरी तालुक्यात काही गावात मजुरांचे खोटे मस्टर काढणे सुरू आहे. यात रोजगार सेवक, ग्रामसेवक, सरपंच, कृषी अभियंता यांची साठगाठ असल्याचे बोलले जात आहे. मजुरांचे देयक जास्त काढण्यासाठी १० ते २० रुपयांची मागणी कनिष्ठ अभियंता ग्रामरोजगार सेवकामार्फत करीत असतो. ज्याचे पैसे दिले नाही तर त्याची मजुरी कामानुसार कमी काढले जाते व ज्याने पैसे दिले त्याची मजुरी काम कमी असले तरी वाढवून मोजमाप दाखवून जास्त काढली जाते. वरिष्ठ यंत्रणेने रस्ता, माती, मुरुम मोजमाप केले तर कितीतरी ग्रामसेवक, रोजगारसेवक, कनिष्ठ अभियंता, सरपंच यांच्यावर रिकवरी आकारणी निघेल. याच्या चौकशीची मागणी तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती व गावातील नागरिकांनी केली आहे. पंचायत समितीला नरेगाच्या कामात कितीतरी तक्रारी आहेत. पण विस्तार अधिकारी तत्कालीन कांबळे येत असल्याचे चित्र आहे. मानकर हे स्वत: बदली करण्यास लागले आहे, हे विशेष. तिरोडा पंचायत समितीकडे जिल्हा परिषद, पंचायत विभाग, मनरेगा, बांधकाम विभागाने लक्ष देवून शौचालय, रस्ता, मुरुम आदी कामांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)