शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:19 IST

गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निवेदनाच्या आधारे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडली.

ठळक मुद्देपालमंत्र्यांनी दिली माहिती : बैठकीत मांडली जिल्ह्याची परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निवेदनाच्या आधारे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत घेऊन उपाययोजना करण्यासाठी संबधित विभागाला निर्देश दिले. तसेच दुष्काळ परिस्थितीचा त्वरित आढावा घेण्याचे निर्देश देवून शेतकºयांना सर्वपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले.जिल्ह्यात यावर्षी पाऊस वेळेवर व समाधानकारक न आल्याने मोठ्या प्रमाणात पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे धान पिकांवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात शेतकºयांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. या संदर्भात पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यात दौरा करून पीक परिस्थितीची पाहणी केली होती. तसेच भाजपच्यावतीने त्यांना जिल्हा दुस्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.जिल्ह्यातील परिस्थिती बघता जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या नेतृत्वात पालकमंत्री बडोले यांना देण्यात आले होते. माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी आमदार भेरसिंह नागपूरे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर आदींच्या उपस्थितीत निवेदन देत दुष्काळाच्या विषयावर पदाधिकाºयांनी पालकमंत्री बडोले यांच्या सोबत चर्चा करून याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करवून देण्याची मागणी केली होती.दरम्यान बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री बडोले यांनी जिल्ह्याची सर्व परिस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांच्या समस्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सर्वेक्षण करून पंचनामा तयार करावे. तसेच ज्यांनी पेरणी केलेली नाही त्यांच्या शेतात मूग, हरभरा, उडीद सारख्या कडधान्याचे बियाणे उपलब्ध करून लागवड करण्यासंदर्भात कृषी विभागाला निर्देश दिले. यासोबतच जिल्ह्यात पाणीसाठा कमी असल्याने भविष्य कालीन उपाययोजनांबाबतीत संबंधित यंत्रणेला निर्देशित केले. तसेच पालकमंत्र्यांंना यांसदर्भात आढावा बैठक घेऊन माहिती घेण्यास सांगितले. शेतकºयांना मदत करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पालकमंत्री बडोले यांनी याआधीच जिल्ह्यातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतक-यांना धीर दिला आहे. पीक विम्यातही शेतकºयांना प्रोत्साहित करण्यात आले होते. या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री बडोले यांनी सांगितले.