शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:19 IST

गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निवेदनाच्या आधारे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडली.

ठळक मुद्देपालमंत्र्यांनी दिली माहिती : बैठकीत मांडली जिल्ह्याची परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निवेदनाच्या आधारे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत घेऊन उपाययोजना करण्यासाठी संबधित विभागाला निर्देश दिले. तसेच दुष्काळ परिस्थितीचा त्वरित आढावा घेण्याचे निर्देश देवून शेतकºयांना सर्वपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले.जिल्ह्यात यावर्षी पाऊस वेळेवर व समाधानकारक न आल्याने मोठ्या प्रमाणात पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे धान पिकांवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात शेतकºयांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. या संदर्भात पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यात दौरा करून पीक परिस्थितीची पाहणी केली होती. तसेच भाजपच्यावतीने त्यांना जिल्हा दुस्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.जिल्ह्यातील परिस्थिती बघता जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या नेतृत्वात पालकमंत्री बडोले यांना देण्यात आले होते. माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी आमदार भेरसिंह नागपूरे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर आदींच्या उपस्थितीत निवेदन देत दुष्काळाच्या विषयावर पदाधिकाºयांनी पालकमंत्री बडोले यांच्या सोबत चर्चा करून याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करवून देण्याची मागणी केली होती.दरम्यान बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री बडोले यांनी जिल्ह्याची सर्व परिस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांच्या समस्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सर्वेक्षण करून पंचनामा तयार करावे. तसेच ज्यांनी पेरणी केलेली नाही त्यांच्या शेतात मूग, हरभरा, उडीद सारख्या कडधान्याचे बियाणे उपलब्ध करून लागवड करण्यासंदर्भात कृषी विभागाला निर्देश दिले. यासोबतच जिल्ह्यात पाणीसाठा कमी असल्याने भविष्य कालीन उपाययोजनांबाबतीत संबंधित यंत्रणेला निर्देशित केले. तसेच पालकमंत्र्यांंना यांसदर्भात आढावा बैठक घेऊन माहिती घेण्यास सांगितले. शेतकºयांना मदत करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पालकमंत्री बडोले यांनी याआधीच जिल्ह्यातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतक-यांना धीर दिला आहे. पीक विम्यातही शेतकºयांना प्रोत्साहित करण्यात आले होते. या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री बडोले यांनी सांगितले.