शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

निवडणुकांमुळे जिल्ह्यात दिवाळीनंतर राजकीय धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2021 5:00 AM

यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना विशेष महत्त्व असून पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्व प्रमुख पक्षांचा जोर स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यावर राहणार आहे. यामुळेच सध्या जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढले आहे. दिवाळी मिलन, सभा, बैठका आणि कार्यकर्ते मेळावे घेऊन निवडणुकीपूर्वीची वातावरण निर्मिती केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. तेव्हापासून जि.प. वर प्रशासक नियुक्त आहे. तर आता गोंदिया, तिरोडा नगर परिषदेसह चार नगर पंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यातच चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या सर्व निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून दिवाळीनंतर जिल्ह्यात राजकीय धुराळा उडण्याची शक्यता आहे. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना विशेष महत्त्व असून पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्व प्रमुख पक्षांचा जोर स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यावर राहणार आहे. यामुळेच सध्या जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढले आहे. दिवाळी मिलन, सभा, बैठका आणि कार्यकर्ते मेळावे घेऊन निवडणुकीपूर्वीची वातावरण निर्मिती केली जात आहे. सर्वात आधी पुढील महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर पकड मजबूत करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. त्या पाठोपाठ पुढील महिन्यातच नगर परिषद आणि नगर पंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने जानेवारी महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला असल्याने व परिस्थिती पूर्वपदावर आल्याने जिल्हा परिषदेच्या लांबलेल्या निवडणुकासुद्धा जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील दोन महिने जिल्हावासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहेत. 

युती, आघाडीवर चर्चानंतर, सध्या जनसंपर्कावर भर - राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. तर हेच चित्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये कायम राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपनेसुद्धा आंदोलने, मेळावे घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यास सुरुवात केली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुका लक्षात घेता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सभा बैठकांमध्ये त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे. - दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाचे पक्षाचे पदाधिकारी व सदस्य जोमाने कामाला लागले आहे. - विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

मागील वर्षभरापासून शिवसेनेने जिल्ह्यात कार्यकर्ते मेळावे आणि विविध कार्यक्रमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. - मुकेश शिवहरे,  जिल्हा सहसंपर्क प्रमुख

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघडण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला याचा निश्चितच फटका बसेल.- केशव मानकर, जिल्हाध्यक्ष भाजप 

 

टॅग्स :Electionनिवडणूक