शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

एका चुकीमुळे कोट्यवधीचा पूल ‘शो पीस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:26 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण व अरुंद असल्याने त्याला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी ५१ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाण पूल तयार करण्यात आला. मात्र पूल तयार करताना पुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पूल तयार केला नाही.

ठळक मुद्देयंत्रणेवर प्रश्नचिन्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष भोवणार, पुलावर अपघाताची शक्यता,

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण व अरुंद असल्याने त्याला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी ५१ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाण पूल तयार करण्यात आला. मात्र पूल तयार करताना पुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पूल तयार केला नाही. तर पुलाचा उतार चुकीचा ठेवल्याने या पुलावरील जड वाहतूक बंद करण्याची पाळी प्रशासनावर आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावर ६६ वर्षांपूर्वी उड्डाण पूल तयार करण्यात आला. या पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात असल्याने पुलाचे काही बांधकाम रेल्वे विभागाने केले होते. मात्र आता जुना उड्डाण जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलावरील वाहतूक त्वरीत करावी. असे पत्र आठ दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाने दिले. यानंतर शहरावासीयांमध्ये खळबळ उडाली. मात्र नवीन उड्डाण पूल तयार असल्याने फारशी अडचण जाणवणार नाही, असे शहरवासीयांना वाटत होते. पण, चार वर्षांपूर्वी तयार केलेला नवीन उड्डाण पूल सदोष असल्याने या पुलावरुन जड वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाने चार दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यामुळे ५१ कोटी रुपये खर्च करुन तयार केलेल्या उड्डाण पूल सदोष का असा प्रश्न सर्वांनाच पडला.विशेष म्हणजे नवीन उड्डाण पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आले. यासाठी तज्ञ इंजिनियरची चम्मू कार्यरत होती. मात्र यानंतरही उड्डाणपुलाचे बांधकाम सदोष करण्यात आले. पुलाचे डिझाईन व पुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पुलासाठी जागा सोडण्यात आली नाही.त्यामुळे पुलावरुन पायी जाणाऱ्या नागरिकांना पुलाच्या मधातून चालत जावे लागते. परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पुलाचा उतार सुध्दा अधिक असल्याने एखाद्या वेळेस वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा धोका पत्थकारण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळेच या तीन्ही विभागाने आपल्या अहवालात जुना उड्डाण पूर्णपणे बंद तर नवीन उड्डाण पुलावर जड वाहनाना प्रवेश देऊ नये असे म्हटले आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील जडवाहतूक बायपास मार्गे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार केलेला उड्डाण पूल केवळ एका छोट्याशा चुकीमुळे ‘शो पीस ठरणार आहे. यंत्रणेच्या चुकीचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागणार आहे.यंत्रणेला घाई करणे भोवलेगोंदिया-बालाघाट मार्गावर तयार करण्यात आलेल्या नवीन उड्डाण पुलाचे लोकार्पण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेवर तेव्हा दबाव टाकण्यात आल्याचे बोलल्या जाते.परिणामी याच घाईमुळे पुलाचे तांत्रिकदृष्टया बांधकाम चुकल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजुला पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी जागा न सोडण्याची छोटीशी बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे हा पूल जडवाहतुकीसाठी सुरू ठेवणे म्हणजे धोका पत्थकारण्यासारखे झाले आहे.पूल पाडण्यासाठी एजन्सीचा शोधरेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला जुना उड्डाणपूल त्वरीत पाडण्याचे पत्र दिले आहे. पूल पाडण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगितले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जुना उड्डाणपूल पाडण्यासाठी एजन्सीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. नागपूर येथील छत्रपती चौकातील उड्डाण पूल पाडणाऱ्या एजन्सीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.तात्पुरती वाहतूक सुरू ठेवण्याची मागणीजिल्हा प्रशासनाने जुन्या उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद न करता या पुलावरुन दुचाकी आणि लहान वाहनाची वाहतूक सुरू ठेवावी, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे केली. मात्र यावर रेल्वे प्रशासनाने कुठलेच उत्तर दिले नसल्याची माहिती.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग