शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

थातूर-मातूर सफाईचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 5:00 AM

सिव्हील लाईन्स कारा चौक परिसरातून सुरू होत असलेल्या या प्रभागात मनोहर चौक, प्रभात टॉकीज चौक, गांधी पुतळा, घाट रोड, ठाकूर मोहल्ला येतो. प्रभागात रस्त्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सांडपाणी व गाळाने नाल्या बरबटलेल्या आढळल्या. यातून प्रभागात स्वच्छतेचा अभाव जाणविला तर काही नागरिकांनीही बोलून दाखविले.

ठळक मुद्देप्रभागात स्वच्छतेचा अभाव : रस्त्यांचे जाळे मात्र नाल्या बरबटलेल्याच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील काही भागासह बाजार भागाला लागून असलेल्या प्रभाग क्रमांक ७ चे क्रांती जायस्वाल व शिलू ठाकूर नगर परिषद सदस्य आहेत. सिव्हील लाईन्स कारा चौक परिसरातून सुरू होत असलेल्या या प्रभागात मनोहर चौक, प्रभात टॉकीज चौक, गांधी पुतळा, घाट रोड, ठाकूर मोहल्ला येतो. प्रभागात रस्त्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सांडपाणी व गाळाने नाल्या बरबटलेल्या आढळल्या. यातून प्रभागात स्वच्छतेचा अभाव जाणविला तर काही नागरिकांनीही बोलून दाखविले.सिव्हील लाईन्स परिसरातील काका चौकातून प्रभागाची सुरूवात झाली असून पुढे मनोहर चौक परिसरात सांडपाणी व गाळाने बरबटलेल्या नाल्या दिसल्या. त्यांच्या शेजारी काढण्यात आलेले गाळ व कचऱ्याचे ढिगार दिसले.परिसरातील नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करीत माणसं बोलावून सफाई करावी लागत असल्याचे सांगितले. मनोहर चौकात मोठा खड्डा तयार झाला असून पाणी साचलेले दिसले व त्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. पुढे मनोहर चौकातून प्रभात टॉकीज होत गांधी पुतळापर्यंत मुख्य मार्ग असून हा परिसर बाजार भागातच येतो.पुढे घाट रोड परिसरातील जगन्नाथ मंदिर व ठाकूर मोहल्लात जावून बघितले असता येथे नाल्यांमध्ये गवत उगवलेले दिसले. यातून या नाल्यांच्या सफाईचा प्रश्न पडला. विशेष म्हणजे, मान्सून बघताही या नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे दिसले. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक येतात असे सांगीतले. कचरागाडी दररोज कचरा संकलनासाठी येते असेही सांगीतले. मात्र झाडू लावणारे येत नसल्याचेही बोलून दाखविले. बाजार भागासह सिव्हील लाईन्स परिसरातील जुना रहिवासी भाग असल्याने येथे रस्ते व नाल्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव ही जाणवला.नागरिकांनी व्यक्त केली नाराजीमनोहर चौक ते काका चौक परिसरातील काही नागरिकांनी बरबटलेल्या नाल्यांची स्थिती दाखवून स्वच्छतेची समस्या व्यक्त केली. एवढेच नव्हे तर माणसं बोलावून स्वत: सफाई करवून घ्यावी लागते असेही सांगीतले. यातून प्रभागातील स्वच्छतेचे चित्र दाखवून देत आपली नाराजी व्यक्त केली.प्रभागातील कचराकुंड्या तुडुंबप्रभागातील काही ठिकाणच्या कचराकुंड्या कचऱ्याने तुडुंब भरल्या असल्याचे दिसले. यातून या कचराकुंड्यातील कचऱ्याची उचल किती दिवसांपासून झालेली नाही असा प्रश्न पडला. पावसाळा असल्याने प्रभागात आता खऱ्या अर्थाने स्वच्छतेची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पाईप आहे पण नळ तुटलेलेजगन्नाथ मंदिरपासून काही अंतर पुढे पाण्यासाठी असलेले सार्वजनिक नळ दिसून आले. मात्र येथे पाईपलाईन दिसली. त्यावर लागलेले नळ तुटलेले दिसले. अशात या नळाला पाणी आल्यास पाण्याचा नासाडी होणार यात शंका नाही. मात्र या प्रकाराकडे नागरिक व नगरसेवक दोघांचेही दुर्लक्ष दिसून आले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान