शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शिक्षण विभागाविरोधात जनहित याचिका दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:29 IST

शिक्षणाचे बाजारीकरण करून खासगी शाळांकडून होत असलेली लूट पालकांच्या अंगलट येत आहे. पण यानंतरही शिक्षण विभागाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही. याला विरोध करण्यासाठी संप्तत पालकांनी जन शिक्षा समिती गठीत केली आहे.

ठळक मुद्देजन शिक्षा समितीची तयारी : जन शिक्षा समिती सदस्यांची पत्रकार परिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षणाचे बाजारीकरण करून खासगी शाळांकडून होत असलेली लूट पालकांच्या अंगलट येत आहे. पण यानंतरही शिक्षण विभागाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही. याला विरोध करण्यासाठी संप्तत पालकांनी जन शिक्षा समिती गठीत केली आहे. खासगी शाळांच्या या मनमर्जी कारभारावर अंकुश लावता यावे यासाठी जन शिक्षा समिती आपल्या लढ्यांतर्गत शिक्षण विभागाविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे समितीचे सदस्य दुर्गेश रहांगडाले शुक्रवारी (दि.३१) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला समितीचे सुयोग चव्हाण, राजेश कनोजिया, हर्षल पवार, प्रतीक कदम, अ‍ॅड. अर्चना नंदघळे, भावना कदम उपस्थित होते. चव्हाण यांनी, खासगी शाळांच्या मनमर्जी धोरणा विरोधात एकट्याने विरोध करून काहीच होत नसल्याचा अनुभव आल्याने पालकांना एकत्रीत करून या विरोधात लढा देण्यासाठी जन शिक्षा समितीची स्थापना करण्यात आल्याचे सांगीतले. या समितीच्या माध्यमातून सध्या शाळांना भेट देवून शाळासाठी ठरवून देण्यात आलेल्या नियमांबाबत चर्चा केली जात असल्याचेही सांगीतले. एका शाळेने पालक-शिक्षक समितीचे गठन केले असून अन्य एका शाळेने पुस्तकांची खरेदी बाजारातून करता येणार असल्याचेही स्वीकार केल्याची माहिती दिली.दुर्गेश रहांगडाले यांनी, आतापर्यंत जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले आहे. मात्र यानंतरही कुठलीच कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आता पालकांसह मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांपर्यंतही जाण्याची तयारी असल्याचे सांगीतले. शिवाय शिक्षण विभागाविरोधात जनहित याचिका दाखल करणार असून गरज पडल्यास आंदोलनही करण्याची तयारी असल्याचे सांगितले.गणवेशाचे कापड निकृष्ट दर्जाचेशहरातील एका नामाकिंत खासगी शाळेच्या गणवेशाचा विषय उपस्थित करण्यात आला. शाळेकडून विद्यार्थ्यांना गणवेश विक्री केले जात असताना त्याची गुणवत्ता तेवढीच उत्तम असणे गरजेचे आहे. यावर शाळा प्रशासनाकडून खास त्यांच्यासाठीच गणवेश तयार करवून घेतले जात असल्याचे सांगीतल जात आहे. मात्र त्या गणवेशाची गुणवत्ता कापड व्यावसायीकाकडून तपासून घेतली असता त्यांनी गणवेशाची गुणवत्ता ९९ टक्के खराब असल्याचे सांगीतले.यावरून शाळांकडून पैसे घेवूनही विद्यार्थी व पालकांची दिशाभूल व लूट करीत असल्याचे चित्र आहे. पुस्तकांवर स्वत:चे स्टीकर लावून वाढीव दराने पुस्तकांची विक्री केली जात असल्याचा प्रकारही उघडकीस आणून दिला.शिक्षण उपसंचालकांच्या पत्राला तिलांजलीनागपूर विभागांतर्गत सर्व सीबीएसई शाळांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांसाठी २४ एप्रिल २०१७ रोजी शिक्षण उपसंचालकांनी एक पत्र काढले होते. त्यात सर्व शाळांना एनसीआरटी प्रकाशित अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरणे अनिवार्य आहे. शाळेतून वह्या, शैक्षणिक साहित्य, दफ्तर खरेदीबाबत आग्रह करू नये, पालक-शिक्षक समितीने सर्वानुमते ठरविलेले शिक्षण शुल्क आकारण्यात यावे. या व्यतिरीक्त कोणतेही शुल्क विद्यार्थ्यांना आकारले जावू नये, ठरविलेले शुल्क शाळेत नोटीस बोर्डवर लावण्यात यावे, शाळेत पात्र मुख्याध्यापक व शिक्षकांची नियुक्ती करावी व नियुक्तीला शिक्षणाधिकाऱ्यांनी मंजुरी घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाचे सर्व नियम व अधिनियम शाळेत लागू असल्यासह १२ सूचना नमूद असल्याचे अ‍ॅड. नंदगळे यांनी सांगीतले. मात्र त्यातील कोणत्याही सूचनांचे पालन खासगी शाळांकडून होत नसल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला.शहरातील विविध संस्थांचे समर्थनजन शिक्षा समितीच्या माध्यमातून खासगी शाळांविरोधात छेडण्यात आलेल्या या लढ्याला शहरातील सिंधू सेना, पुस्तक विक्रेता संघ, आधार महिला संघटना व मारवाडी युवक मंडळाने समर्थन दिले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र