शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

साहित्याने माणूस अंतरंग जाणू शकतो

By admin | Updated: January 26, 2017 01:41 IST

साहित्याने माणसाला माणुसकी दिली. विज्ञानाने माणसाला ज्ञान दिले. विज्ञानाने माणूस अंतरीक्ष

बंडोपंत बोढेकर : ‘विज्ञान आणि साहित्य’ विषयावरील व्याख्यान अर्जुनी मोरगाव : साहित्याने माणसाला माणुसकी दिली. विज्ञानाने माणसाला ज्ञान दिले. विज्ञानाने माणूस अंतरीक्ष जाणू शकतो. साहित्याने माणूस अंतरंग जाणू शकतो. आपण अंतरंग साहित्यातून व्यक्त करु शकतो. साहित्यात व्यक्त झालेलं लेखकांचे अंतरंग, मनातली खदखद, भावना, तरंग संवेदनशीलतेने वाचक टिपू शकतो. साहित्यातून झोपी गेलेला समाज, विकृत झालेला समाजसुद्धा देशासाठी उभा राहू शकतो. मानवातील कुप्रवृत्ती, कलह, व्यसनापासून मुक्ती मिळते, असे प्रतिपादन विज्ञान व साहित्याचे अभ्यासक बंडोपंत बोढेकर, गडचिरोली यांनी केले. ते गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या विज्ञान आणि साहित्य या विषयावरील मुलाखतीत ते बोलत होते. देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारत २०२० पर्यंत महासत्ता होईल, असं म्हटलं होतं. आजचा युवक हा विश्वाचा नकाशा. गावावरुन देशाची परीक्षा, असं म्हटलं जाते. राष्ट्रसंतांनीसुद्धा गावाची संकल्पना त्या कालखंडात वर्णिली होती. गावातील प्रत्येक घर उद्योगी, तेथील प्रत्येक व्यक्ती गावातील सर्वांगिण प्रगतीचा तंत्रज्ञ असतो. राष्ट्रसंतांची खंजेरी वाजते. त्यांचे भजन कानावर येतात. त्यांनी विज्ञान सांगितला आहे. ते विज्ञानवादी होते. तुकडोजी महाराज हे कालचे संत वाटत नाही तर ते आजचे असल्याचे वाटते. विज्ञानाला भावना नसतात आणि साहित्य भावनेवर आधारलेले असते. मनाचं विचार साहित्य. मेंदूचं विचार विज्ञान. साहित्य आणि विज्ञानाचा निर्माता माणूस आहे. विज्ञानात माणसाची चूक सहन केली जात नाही. विज्ञानाची शिकवणूक म्हणजे काटेकोरपणा. विज्ञान आणि साहित्य हे दोन्ही मानवाच्या प्रगतीसाठी आहेत. वैज्ञानिक दृष्टी म्हणजे जे जसं आहे तसं स्वीकारणे होय. साहित्याचा अर्थ तुमच्या मनातला वाईट विचारसुद्धा दखलपात्र साहित्यात व्यक्त करु शकता. मात्र आपण जीवनात तसे वागले तर त्याचा निषेध होईल. जीवन कसं आहे, ते कसं असावे, हा संदेश देण्यासाठी साहित्य आहे. माणसाचा माणूसपण जागृत करणे म्हणजे प्रबोधन. विज्ञान हे ज्ञान देऊ शकतं, प्रबोधन नव्हे. मोबाईल हा विज्ञानाचा आविष्कार आहे. विज्ञान हे साहित्यातून आविष्कारीत झाले आहे. माणसानं कुठल्याही गोष्टीत विज्ञानवाद बघावं. प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. मात्र दृष्टी तशी असली पाहिजे. पहिला वैज्ञानिक हा शेतकरी आहे. एका बियाण्यांपासून अनेक बियाणे तयार करण्याचे काम त्याने केले आहे. विज्ञानाने विद्यार्थ्यांच्या जाणीवा विकसित होतात, त्यातूनच प्रगती होते. लेखकसुद्धा विज्ञानवादी असावेत. अंधश्रद्धा नको, अंधश्रद्धेचे बालमनावर विपरित परिणाम होतात. प्रयोग कृतीतून घडले पाहिजेत. व्यसनाधिनतेमुळे युवकातील उदासीनता वाढली आहे. ती घालण्यासाठी विज्ञान अंगिकारला पाहिजे. स्वत:चा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. मानवी मनाच्या अवस्था सकारात्मक दृष्टीने स्वीकारल्या पाहिजे. मानवी जीवन उन्नत करण्यासाठी विज्ञान आणि साहित्याची सांगड घालणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)