शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

साहित्याने माणूस अंतरंग जाणू शकतो

By admin | Updated: January 26, 2017 01:41 IST

साहित्याने माणसाला माणुसकी दिली. विज्ञानाने माणसाला ज्ञान दिले. विज्ञानाने माणूस अंतरीक्ष

बंडोपंत बोढेकर : ‘विज्ञान आणि साहित्य’ विषयावरील व्याख्यान अर्जुनी मोरगाव : साहित्याने माणसाला माणुसकी दिली. विज्ञानाने माणसाला ज्ञान दिले. विज्ञानाने माणूस अंतरीक्ष जाणू शकतो. साहित्याने माणूस अंतरंग जाणू शकतो. आपण अंतरंग साहित्यातून व्यक्त करु शकतो. साहित्यात व्यक्त झालेलं लेखकांचे अंतरंग, मनातली खदखद, भावना, तरंग संवेदनशीलतेने वाचक टिपू शकतो. साहित्यातून झोपी गेलेला समाज, विकृत झालेला समाजसुद्धा देशासाठी उभा राहू शकतो. मानवातील कुप्रवृत्ती, कलह, व्यसनापासून मुक्ती मिळते, असे प्रतिपादन विज्ञान व साहित्याचे अभ्यासक बंडोपंत बोढेकर, गडचिरोली यांनी केले. ते गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या विज्ञान आणि साहित्य या विषयावरील मुलाखतीत ते बोलत होते. देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारत २०२० पर्यंत महासत्ता होईल, असं म्हटलं होतं. आजचा युवक हा विश्वाचा नकाशा. गावावरुन देशाची परीक्षा, असं म्हटलं जाते. राष्ट्रसंतांनीसुद्धा गावाची संकल्पना त्या कालखंडात वर्णिली होती. गावातील प्रत्येक घर उद्योगी, तेथील प्रत्येक व्यक्ती गावातील सर्वांगिण प्रगतीचा तंत्रज्ञ असतो. राष्ट्रसंतांची खंजेरी वाजते. त्यांचे भजन कानावर येतात. त्यांनी विज्ञान सांगितला आहे. ते विज्ञानवादी होते. तुकडोजी महाराज हे कालचे संत वाटत नाही तर ते आजचे असल्याचे वाटते. विज्ञानाला भावना नसतात आणि साहित्य भावनेवर आधारलेले असते. मनाचं विचार साहित्य. मेंदूचं विचार विज्ञान. साहित्य आणि विज्ञानाचा निर्माता माणूस आहे. विज्ञानात माणसाची चूक सहन केली जात नाही. विज्ञानाची शिकवणूक म्हणजे काटेकोरपणा. विज्ञान आणि साहित्य हे दोन्ही मानवाच्या प्रगतीसाठी आहेत. वैज्ञानिक दृष्टी म्हणजे जे जसं आहे तसं स्वीकारणे होय. साहित्याचा अर्थ तुमच्या मनातला वाईट विचारसुद्धा दखलपात्र साहित्यात व्यक्त करु शकता. मात्र आपण जीवनात तसे वागले तर त्याचा निषेध होईल. जीवन कसं आहे, ते कसं असावे, हा संदेश देण्यासाठी साहित्य आहे. माणसाचा माणूसपण जागृत करणे म्हणजे प्रबोधन. विज्ञान हे ज्ञान देऊ शकतं, प्रबोधन नव्हे. मोबाईल हा विज्ञानाचा आविष्कार आहे. विज्ञान हे साहित्यातून आविष्कारीत झाले आहे. माणसानं कुठल्याही गोष्टीत विज्ञानवाद बघावं. प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. मात्र दृष्टी तशी असली पाहिजे. पहिला वैज्ञानिक हा शेतकरी आहे. एका बियाण्यांपासून अनेक बियाणे तयार करण्याचे काम त्याने केले आहे. विज्ञानाने विद्यार्थ्यांच्या जाणीवा विकसित होतात, त्यातूनच प्रगती होते. लेखकसुद्धा विज्ञानवादी असावेत. अंधश्रद्धा नको, अंधश्रद्धेचे बालमनावर विपरित परिणाम होतात. प्रयोग कृतीतून घडले पाहिजेत. व्यसनाधिनतेमुळे युवकातील उदासीनता वाढली आहे. ती घालण्यासाठी विज्ञान अंगिकारला पाहिजे. स्वत:चा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. मानवी मनाच्या अवस्था सकारात्मक दृष्टीने स्वीकारल्या पाहिजे. मानवी जीवन उन्नत करण्यासाठी विज्ञान आणि साहित्याची सांगड घालणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)