शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

रेल्वेच्या प्रवाशांत नाराजीचा सूर

By admin | Updated: December 21, 2015 01:50 IST

रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवास भाड्यात दरवाढ केल्याने रेल्वेच्या प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

आॅटोच्या प्रवासाला पसंती : दरवाढीमुळे रेल्वे प्रवासी संख्या रोडावलीबाराभाटी : रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवास भाड्यात दरवाढ केल्याने रेल्वेच्या प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. परिसरातील रेल्वे स्थानकांतून कमी अंतराचा प्रवास करणारे प्रवासी आता आॅटोच्या प्रवासाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे आॅटोवाल्यांना सुगीचे दिवस आले असून रेल्वेचे प्रवासी रोडावत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.मानवाच्या प्राथमिक गरजाप्रमाणेच दुय्यम गरजासुद्धा अधिक महत्त्वाच्याच आहेत. मनोरंजनाची साधने, चैनीच्या वस्तू व दळणवळणाची साधने आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. मनुष्य सायकल, दुचाकी, चारचाकी, एसटी बस, रेल्वे, आॅटो आदींचा वापर प्रवासासाठी करतो. पण अशातच रेल्वे विभागाने प्रवाशांच्या तिकीट भाड्यात दरवाढ केल्याने कमी अंतराचा प्रवास करणारे आता आॅटोमध्ये गर्दी करू लागले आहेत. याचा विपरित परिमाण रेल्वेच्या उत्पन्नावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेने कर्मचारी, विद्यार्थी व इतर प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र काही महिन्यांच्या कालावधीत रेल्वे विभागाने पाच रूपये भाड्याचे सरळ दहा रूपये दरवाढ करून रेल्वे प्रवाशांना चिंतातूर करून सोडले आहे. त्यामुळे हेच प्रवासी आता आपल्या वेळेप्रमाणे व सोयीनुसार आरामात आॅटोने प्रवास करण्याचे धाडस करीत आहेत. परिसरातील अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध व कोहमारा मार्गावर चालणाऱ्या आॅटोंमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. क्षुल्लक चिल्लरच्या कारणावरून रेल्वेने प्रवाशांच्या मनावर आर्थिक ताण निर्माण केल्याचे बोलले जात आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर या दरवाढीचे काय नियोजन असावे, हे रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व रेल्वे मंत्र्यांनाच ठावूक. मात्र सामान्य प्रवाशांवर याचा मोठाच आर्थिक ताण बसत आहे. आता याचाच लाभ आॅटोवाले घेत आहेत. आॅटोचालक १० प्रवाशांऐवजी १८ ते २० प्रवाशांना कोंबून बसायला जागा नसतानाही प्रवास करायला भाग पाडत आहेत. त्यामुळे रेल्वेचा हिरवा कंदील आता आॅटो चालकांना मिळाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.रेल्वेच्या प्रवासाला सुखाचा व सुरक्षिततेचा प्रवास समजला जातो. परंतु येथे रेल्वेची दरवाढ झाल्याने रेल्वेच्या प्रवाशी संख्येमध्ये घट झाल्याचे परिसरातील रेल्वे स्थानकांच्या निरीक्षणातून दिसून येत आहे. दूरच्या अंतराचे भाडेवाढ न होता कमी अंतराची दरवाढ झाल्याने रेल्वेचे प्रवासी नाराज व्यक्त करीत आहेत. रेल्वे विभागाने दर कमी करून प्रवासाला सहकार्य करावे, असे अनेक प्रवासी बोलून दाखवित आहेत.(वार्ताहर)आॅटोचालकांना आले सुगीचे दिवसरेल्वेने कमी अंतराच्या प्रवास दरात वाढ केली. त्यामुळे अप-डाऊन करणारे कर्मचारी, किरकोळ सामान-साहित्य खरेदी विक्रीसाठी ये-जा करणारे लघु व्यावसायिक आता आॅटोने प्रवास करून आपल्या दळणवळणाच्या समस्येचा समाधान करीत आहेत. याचा लाभ आॅटोचालक करून घेत आहेत. तब्बल दुप्पट प्रवासी कोंबून नेले जात आहेत. आॅटो चालक अधिक लोभापायी क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरून प्रवाशांची कोंडी करीत आहेत. काळी-पिवळीमध्ये तर २० ते २२ प्रवाशांना कोंबून नेले जात आहे. या प्रकारामुळे अपघाताची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. तरी हे प्रवासी आता आॅटोच्या प्रवासालाच पसंती देताना दिसतात.