शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 9:56 PM

बालाघाट येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया-इतवारी रेल्वे गाडी बालाघाटवरुन सुरू करण्यात आली. मात्र ही गाडी गोंदिया व बालाघाट येथील प्रवाशांना चांगलीच डोकेदुखीची ठरत आहे. पूर्वी गोंदिया-इतवारी ही रेल्वे गाडी गोंदियावरुन दुपारी ३.१० मिनिटांनी सुटत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालाघाट येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया-इतवारी रेल्वे गाडी बालाघाटवरुन सुरू करण्यात आली. मात्र ही गाडी गोंदिया व बालाघाट येथील प्रवाशांना चांगलीच डोकेदुखीची ठरत आहे.पूर्वी गोंदिया-इतवारी ही रेल्वे गाडी गोंदियावरुन दुपारी ३.१० मिनिटांनी सुटत होती. तर सायंकाळी ६ वाजता इतवारी स्टेशनवर पोहचत होती. त्यानंतर ही गाडी पुन्हा डोंगरगडला जात होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची सुध्दा सुविधा होत होती. मात्र रेल्वे विभागाने महिनाभरापूर्वीच या गाडीचा विस्तार बालाघाटपर्यंत केला. तेव्हापासून ही गाडी गोंदिया व डोंगरगड व बालाघाट येथे सुध्दा वेळेवर पोहचत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर या गाडीला बालाघाटपर्यंत पोहचण्यासाठी सायंकाळी ६ वाजत आहे. जेव्हा या गाडीची वेळ दुपारी ४.१५ वाजताची आहे. ही गाडी जर गोंदिया रेल्वे स्थानकावर वेळेत पोहचली तरी या गाडीला आऊटरवर बराच वेळ थांबविले जाते. या गाडीसाठी या कालावधी फलाट उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. परिणामी बालघाटवरुन येणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.गोंदिया रेल्वे स्थानकावर येणाऱ्या आणि जाणाºया गाड्यांची संख्या न पाहताच रेल्वे विभागाने या गाडीचा बालाघाटपर्यंत विस्तार केल्याने त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ही गाडी जेव्हा गोंदियावरुन सुरू होती तेव्हा प्रवाशांना सहज जागा मिळत होती. मात्र या गाडीचा बालाघाटपर्यंत विस्तार केल्यापासून प्रवाशांना बºयाच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावर आधीच रेल्वे गाड्यांची संख्या भरपूर होती. गोंदिया ते समनापूर सायंकाळी ५ वाजता, गोंदिया ते वाराशिवणी कटंगी २.४० वाजता आणि बालाघाट इतवारी पॅसेंजर रेल्वे गाड्या धावतात. मात्र रेल्वे विभागाने गाडीचा विस्तार केल्याने या मार्गावरील प्रवाशांना सोय होण्याऐवजी ती गैरसोयीची ठरत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे