शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:57 IST

बालाघाट येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया-इतवारी रेल्वे गाडी बालाघाटवरुन सुरू करण्यात आली. मात्र ही गाडी गोंदिया व बालाघाट येथील प्रवाशांना चांगलीच डोकेदुखीची ठरत आहे. पूर्वी गोंदिया-इतवारी ही रेल्वे गाडी गोंदियावरुन दुपारी ३.१० मिनिटांनी सुटत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालाघाट येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया-इतवारी रेल्वे गाडी बालाघाटवरुन सुरू करण्यात आली. मात्र ही गाडी गोंदिया व बालाघाट येथील प्रवाशांना चांगलीच डोकेदुखीची ठरत आहे.पूर्वी गोंदिया-इतवारी ही रेल्वे गाडी गोंदियावरुन दुपारी ३.१० मिनिटांनी सुटत होती. तर सायंकाळी ६ वाजता इतवारी स्टेशनवर पोहचत होती. त्यानंतर ही गाडी पुन्हा डोंगरगडला जात होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची सुध्दा सुविधा होत होती. मात्र रेल्वे विभागाने महिनाभरापूर्वीच या गाडीचा विस्तार बालाघाटपर्यंत केला. तेव्हापासून ही गाडी गोंदिया व डोंगरगड व बालाघाट येथे सुध्दा वेळेवर पोहचत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर या गाडीला बालाघाटपर्यंत पोहचण्यासाठी सायंकाळी ६ वाजत आहे. जेव्हा या गाडीची वेळ दुपारी ४.१५ वाजताची आहे. ही गाडी जर गोंदिया रेल्वे स्थानकावर वेळेत पोहचली तरी या गाडीला आऊटरवर बराच वेळ थांबविले जाते. या गाडीसाठी या कालावधी फलाट उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. परिणामी बालघाटवरुन येणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.गोंदिया रेल्वे स्थानकावर येणाऱ्या आणि जाणाºया गाड्यांची संख्या न पाहताच रेल्वे विभागाने या गाडीचा बालाघाटपर्यंत विस्तार केल्याने त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ही गाडी जेव्हा गोंदियावरुन सुरू होती तेव्हा प्रवाशांना सहज जागा मिळत होती. मात्र या गाडीचा बालाघाटपर्यंत विस्तार केल्यापासून प्रवाशांना बºयाच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावर आधीच रेल्वे गाड्यांची संख्या भरपूर होती. गोंदिया ते समनापूर सायंकाळी ५ वाजता, गोंदिया ते वाराशिवणी कटंगी २.४० वाजता आणि बालाघाट इतवारी पॅसेंजर रेल्वे गाड्या धावतात. मात्र रेल्वे विभागाने गाडीचा विस्तार केल्याने या मार्गावरील प्रवाशांना सोय होण्याऐवजी ती गैरसोयीची ठरत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे