शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

फोडाफोडीच्या भीतीमुळे पॅनल झाल्या अंडरग्राउंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST

गोंदिया : जिल्ह्यात १८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सर्वच राजकीय पक्षांकडून वर्चस्वाचे दावे केले जात आहेत. मात्र, ग्रामपंचायतवर ...

गोंदिया : जिल्ह्यात १८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सर्वच राजकीय पक्षांकडून वर्चस्वाचे दावे केले जात आहेत. मात्र, ग्रामपंचायतवर सरपंच बसविणार, तोच खरा हिरो ठरणार असल्याने, आता राजकीय पक्षांकडून आपला सरपंच बसविण्यासाठी साम-दाम-दंड व भेद या शस्त्रांचा वापर केला जाणार यात शंका नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेत, ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या पॅनल आपल्या नवनिर्वाचित सदस्यांना घेऊन अंडरग्राउंड झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, ८ ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाल्याने १८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. या ग्रामपंचायतींचा निकाल १८ जानेवारी रोजी लागला असून, निकाल हाती आल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून आपलेच वर्चस्व असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, ग्रामपंचायतवर सरपंच ज्यांचा बसेल, तेच खरे सत्ताधारी ठरणार आहेत. अशात मात्र यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीच्या नंतर केले जाणार असून, त्यानुसार येत्या २८ तारखेला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतर, ग्रामपंचायतींना सरपंचपदाच्या निवडणुका घेण्यासाठी तारखा देण्यात येतील व तेव्हाच सरपंचांची निवड सदस्यांतून केली जाणार आहे.

म्हणजेच, ज्यांचे सदस्य जास्त, त्यांचा सरपंच निवडून येणार व त्या पॅनल म्हणजेच पक्षाची ग्रामपंचायतवर सत्ता येणार, असे समीकरण आहे. यासाठी तेवढे सदस्य आपल्या पॅनलमध्ये असणे गरजेचे असून, येथूनच सदस्यांना आपल्याकडे घेण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे, राजकारणाची पहिली पायरीच ग्रामपंचायत असल्याने जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आता राजकीय पक्ष सत्ता स्थापनेसाठी सदस्यांची फोडाफोडी करणार यात शंका नाही. असे झाल्यास आतापर्यंत केलेली सर्व मेहनत वाया जाणार व हीच बाब हेरून काही पॅनल आपल्या नवनिर्वाचित सदस्यांना घेऊन अंडरग्राउंड झाल्याचे दिसून येत आहे.

-----------------------------

निवडणुकीच्या दिवशीच होणार आगमन

येत्या २८ तारखेला सरपंचांचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतरच सरपंचपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यासाठी निवडणूक ‌विभागाकडून निश्चित कालावधी ठरवून दिला जाणार व त्यातच या निवडणुका घेतल्या जातील. म्हणजेच आता अंडरग्राउंड झालेले म्हणजेच पर्यटनासाठी गेलेले हे सदस्य निवडणुकीच्या दिवशीच थेट निवडणूक स्थळी प्रकटतील.