शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
3
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
4
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
5
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
6
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
7
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
8
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
9
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
11
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
12
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
13
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
14
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
15
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
16
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
17
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
18
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
19
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
20
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कोटजांभूरा येथे धानाचे पुंजणे जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

आठ दिवसांपुर्वीच चिचगड सहा गावातील ५० हून अधिक शेतकऱ्यांचे ८० पेक्षा अधिक धानाचे पुंजणे अज्ञात इसमांनी जाळले. त्यानंतर पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळण्यात आले. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र यानंतरही धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरुच,चिचगड परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचिचगड : देवरी तालुक्यातील धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास धानाचे पुंजणे जाळल्याची घटना घडली.चिचगड परिसरातील कोटजांभूरा येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे काही अज्ञात इसमानी जाळले. यात शेतकऱ्यांचे १ लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान केले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मागील काही दिवसांपासून चिचगड परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यांना आगी लावून नुकसान करण्याचा प्रकार घडत आहेत.आठ दिवसांपुर्वीच चिचगड सहा गावातील ५० हून अधिक शेतकऱ्यांचे ८० पेक्षा अधिक धानाचे पुंजणे अज्ञात इसमांनी जाळले. त्यानंतर पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळण्यात आले. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र यानंतरही धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी शेतावर जागल करणे सुरू केले आहे. आधीच निसर्गाचा फटका सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर या प्रकारामुळे पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आणखी दारिद्रयाच्या खाईत लोटण्याचे महापाप काही समाजकंटकाकडून होत असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.शुक्रवारी कोटजांभूरा येथील किसन चनाप,फगन बागडेहरिया आणि भिकाम जुडा या आदिवासी शेतकºयांच्या धानाच्या पुंजण्यांना अज्ञात इसमाने आग लावल्याने यात १ लाख ७१ हजार ७३२ रुपयांचा नुकसान झाले. यामुळे सदर शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.शेतकºयांनी या घटनेची माहिती तलाठ्याला दिली. तलाठ्याने नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यात २ हेक्टर ६० आर क्षेत्रातील भातिपकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.धानाचे पुंजणे जाळण्याचा हेतू कायचिचगड परिसरातीलच गावांमध्ये मागील काही दिवसांपासून शेतकºयांचे शेतातील धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरू आहे.अद्यापही पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रक्ताचे पाणी करुन मोठ्या कष्टाने पीक घेतल्यानंतर त्याची राखरांगोळी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. तर धानाचे पुंजणे जाळण्यामागील नेमका हेतू काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पोलिसांसमोर आव्हान कायमशेतातील धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरुच असून अद्यापही या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. तर पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जीव मात्र टांगणीला लागला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfireआग