शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गाळाचा उपसा केल्यास पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 05:00 IST

खरीप व्यतिरिक्त रब्बी, उन्हाळी धान पिकाखालील क्षेत्रसुद्धा वाढ होण्यास मदत झालेली आहे. या प्रत्येक मोठ्या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता ३.०० मी उंचीपर्यंत आहे. पूर्ण क्षमतेने भरल्यावर प्रत्येक कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाण्याची थोप कमीत कमी ३.०० कि.मी.पर्यंत असते. पांगोली नदीवरील या विभागाव्दारे निर्मित कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यापासून जवळपास ७८८ हेक्टर क्षेत्रात ओलिताखाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  :  पांगोली नदीपात्रातून साचलेला गाळ काढून नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास नदीकाठावरील गावातील पाणीटंचाई दूर होऊन पर्यायाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध होईल. परिसरातील गावांना पुराचा धोका कमी होईल. याकरिता प्रातिनिधिक स्वरूपाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू असून शासनाकडून लवकरच मान्यता मिळणार आहे. पांगोली नदीचे उगम तेढा, ता. गोरेगाव येथे झालेला असून छिपीया गावाजवळ बाघ नदीला संगम होतो. या नदीवर मृद व जलसंधारण विभाग गोंदिया मार्फत तुमखेडा, चुलोद, टेमणी, खातीया, को.प.बं. कामठा व पांजरा (गिरोला) असे एकूण ६ कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे तयार करण्यात आले. लंबाटोला, गिरोला, पांजरा, कामठा, नवरगाव कला, नवरगाव (बु.), खातिया, बरबसपुरा, टेमणी, बटाणा, आंभोरा व परिसरातील शेतकरी या बंधाऱ्यापासून सिंचनाकरिता नियमित पाण्याचा वापर करतात. खरीप व्यतिरिक्त रब्बी, उन्हाळी धान पिकाखालील क्षेत्रसुद्धा वाढ होण्यास मदत झालेली आहे. या प्रत्येक मोठ्या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता ३.०० मी उंचीपर्यंत आहे. पूर्ण क्षमतेने भरल्यावर प्रत्येक कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाण्याची थोप कमीत कमी ३.०० कि.मी.पर्यंत असते. पांगोली नदीवरील या विभागाव्दारे निर्मित कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यापासून जवळपास ७८८ हेक्टर क्षेत्रात ओलिताखाली आहे. नदीपात्रात अडवलेल्या पाण्यापासून परिसरात पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच जनावरांसाठीसुद्धा पाण्याचा वापर करण्यात येत असतो. तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा वापर करता येतो.

पुराचा धोका होणार कमी - पांगोली नदीच्या पात्रातून गाळ काढणे व खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यास नदीत आवश्यक तेवढा पाणी प्रवाह राहील. साचलेला गाळ काढून खोलीकरण, रुंदीकरण केल्यास नदीकाठावरील गावातील पाणीटंचाई दूर होऊन पर्यायाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध होईल व परिसरातील गावांना पुराचा धोका कमी होईल. 

नदीकाठावर करणार वृक्ष लागवड पांगोली नदीच्या उगम व संगमापर्यंत एकूण ५९ बंधाऱ्यांचे बांधकाम झालेले आहे. या नदीच्या लगत असलेल्या सर्व ग्रामपंचायतींना नदीकाठावर शक्य असल्यास वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रमाणे उगम ते संगमापर्यंत सर्व प्रकारचे नियोजन करण्यात येत असून, येणाऱ्या काळात पांगोली नदी एक वेगळी ओळख निर्माण करेल यात शंका नसल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप यांनी सांगितले. 

पाणीपातळीत १ मीटरने वाढ याच नदीवर सन २०२०-२१ मध्ये जुन्या निरुपयोगी पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर हे काम करण्यात आलेले होते. प्रचलित रचना व पारंपरिक पध्दतीने बांधकाम केल्यास या कामाचा अंदाजित खर्च ३ कोटी अपेक्षित होता. हे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत (नवीन्यपूर्ण) पध्दतीने २१ लक्ष रुपयांत पूर्ण केले. छोटा गोंदिया परिसरात बंधाऱ्यालगत जवळपास १.०० मीटर खोलीचे पाणी उपलब्ध आहे. छोटा गोंदिया तसेच चुलोद भागातील उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले आहे.

मासेमारीला मिळणार वाव - पांगोली नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास गती दिली गेल्यास इतरदेखील फायदे आहेत. नदीत पाणीसाठा उपलब्ध असल्यास स्थानिक मच्छीमारांनासुध्दा उपयोगी येऊ शकतो. परिसरातील परंपरागत वीटभट्टी कामगारास वीटभट्ट्या व्यवसायासाठीसुध्दा पाण्याचा वापर होऊ शकतो. हे सर्व प्रयत्न यशस्वी झाल्यास पाणी साठवण क्षमतेत वाढ होईलच व त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुबार पिकाकरिता ओलिताची सोय, पर्यायाने उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होईल.

 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प