शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

नदीचे पात्र रुंद करुन केली पाणी टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच यंदा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बंधारा तयार करण्याची अडचण होती. अखेर येथील युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या सदस्यांनी पुढाकार घेवून जेसीबीच्या सहाय्याने नदीचे पात्र थोडे रुंद करुन पाणी पुरवठा करणाºया विहिरीची पाणी पातळी वाढवून पाणी टंचाईवर मात केली.

ठळक मुद्देयुवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनल : गावकऱ्यांची समस्या झाली दूर

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : येथील गावकऱ्यांना चूलबंद नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच यंदा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बंधारा तयार करण्याची अडचण होती. अखेर येथील युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या सदस्यांनी पुढाकार घेवून जेसीबीच्या सहाय्याने नदीचे पात्र थोडे रुंद करुन पाणी पुरवठा करणाºया विहिरीची पाणी पातळी वाढवून पाणी टंचाईवर मात केली.सौंदड गावाची लोकसंख्या दहा हजारच्यावर आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायतव्दारे चूलबंद नदीच्या पात्रालगत असलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत केला जातो. गावात एकुण ७०० खाजगी नळ कनेक्शनधारक असून चार हजार नागरिकांना दररोज २४ हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर नदी पात्रावर बंधारा नसल्याने दरवर्षी सौंदड येथील गावकºयांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा समस्येला तोंड द्यावे लागते. यावर्षी पाण्याची टंचाई भासायला नको या उद्देशाने युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या सदस्यांनी दोन हजार सिमेंटच्या बोºयामध्ये रेती भरुन बंधारा तयार करण्याचे नियोजन केले होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कलम १४४ लागू करण्यात आल्याने बंधारा बनविणे शक्य झाले नाही. तर यंदा नदीचे पात्र लवकरच कोरडे झाले. ही बाब युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या लक्षात येताच पाणी टंचाईवर मात करण्याकरिता ७०० फूट लांब व ८ ते ९ फूट रूंद नदीचे पात्र जेसीबीच्या सहाय्याने १० फुटाचे खोलीकरण करण्यात आले. यामुळे ग्रामपंचायत सौंदडने नदीपात्रात तयार केलेल्या विहिरीची पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनल सदस्यांनी वेळीच दखल घेत केलेल्या उपाययोजनेमुळे पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे.यात जनशक्ती युवा पॅनल संस्थापक गायत्री इरले, रोशन शिवणकर, कपिल अग्रवाल, बिरला गणवीर, चंद्रकुमार बहेकार, राजू वैद्य, नंदकिशोर डोंगरवार, समाधान बडोले, हेमराज लाडे, नारायण सावरकर, सुनंदा वाढवे, मनोहर चांदेवार, वामन सुर्यवंशी, धर्मराज शेंडे, बापू भेंडारकर व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक