शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

नदीचे पात्र रुंद करुन केली पाणी टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच यंदा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बंधारा तयार करण्याची अडचण होती. अखेर येथील युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या सदस्यांनी पुढाकार घेवून जेसीबीच्या सहाय्याने नदीचे पात्र थोडे रुंद करुन पाणी पुरवठा करणाºया विहिरीची पाणी पातळी वाढवून पाणी टंचाईवर मात केली.

ठळक मुद्देयुवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनल : गावकऱ्यांची समस्या झाली दूर

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : येथील गावकऱ्यांना चूलबंद नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच यंदा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बंधारा तयार करण्याची अडचण होती. अखेर येथील युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या सदस्यांनी पुढाकार घेवून जेसीबीच्या सहाय्याने नदीचे पात्र थोडे रुंद करुन पाणी पुरवठा करणाºया विहिरीची पाणी पातळी वाढवून पाणी टंचाईवर मात केली.सौंदड गावाची लोकसंख्या दहा हजारच्यावर आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायतव्दारे चूलबंद नदीच्या पात्रालगत असलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत केला जातो. गावात एकुण ७०० खाजगी नळ कनेक्शनधारक असून चार हजार नागरिकांना दररोज २४ हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर नदी पात्रावर बंधारा नसल्याने दरवर्षी सौंदड येथील गावकºयांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा समस्येला तोंड द्यावे लागते. यावर्षी पाण्याची टंचाई भासायला नको या उद्देशाने युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या सदस्यांनी दोन हजार सिमेंटच्या बोºयामध्ये रेती भरुन बंधारा तयार करण्याचे नियोजन केले होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कलम १४४ लागू करण्यात आल्याने बंधारा बनविणे शक्य झाले नाही. तर यंदा नदीचे पात्र लवकरच कोरडे झाले. ही बाब युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या लक्षात येताच पाणी टंचाईवर मात करण्याकरिता ७०० फूट लांब व ८ ते ९ फूट रूंद नदीचे पात्र जेसीबीच्या सहाय्याने १० फुटाचे खोलीकरण करण्यात आले. यामुळे ग्रामपंचायत सौंदडने नदीपात्रात तयार केलेल्या विहिरीची पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनल सदस्यांनी वेळीच दखल घेत केलेल्या उपाययोजनेमुळे पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे.यात जनशक्ती युवा पॅनल संस्थापक गायत्री इरले, रोशन शिवणकर, कपिल अग्रवाल, बिरला गणवीर, चंद्रकुमार बहेकार, राजू वैद्य, नंदकिशोर डोंगरवार, समाधान बडोले, हेमराज लाडे, नारायण सावरकर, सुनंदा वाढवे, मनोहर चांदेवार, वामन सुर्यवंशी, धर्मराज शेंडे, बापू भेंडारकर व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक