शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
4
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
5
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
6
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
7
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
8
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
9
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
10
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
11
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
12
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
13
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
14
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
15
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
16
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
17
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
18
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
19
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले

डिमांड भरूनही २८०० शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:49 AM

वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारांकडून निविदाच नाहीत : महावितरण आले अडचणीत

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नसल्याने ते वेटींगवर आहेत.विशेष म्हणजे, महावितरणने या कामासाठी कित्येकदा निविदा काढली. मात्र त्यात कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यात आली नाही. यामुळे वीज जोडणी करून देण्याची इच्छा असतानाही महावितरणची अडचण झाली आहे.जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची फटका सहन करावा लागत आहे. यात एका पाण्याअभावी पीक हातून गेल्याचे चित्रही कित्येकदा बघावयास मिळाले आहे. अशात सिंचनाची मदत घेऊन पीक वाचविण्याची पाळी शेतकºयांवर येते.विहिरीचे पाणी घेण्यासाठी कृषी पंपाची गरज असते. मात्र ज्यांच्याकडे कृषी पंप नाही असे शेतकरी अवैधरित्या जोडणी घेऊन पाण्याची सोय करतात. हा प्रकार कित्येकदा त्यांच्याच अंगलट येत असल्याचेही प्रकार घडतात.यामुळेच महावितरणकडून शेतकºयांना स्वत:च्या हक्काचे कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. महावितरणचा हा सौदा फायद्याचा असल्याने शेतकºयांनीही हक्काच्या कनेक्शनसाठी महावितरणकडे अर्ज केले.त्यानुसार, मागील दोन वर्षांपासून महावितरणकडे सुमारे दोन हजार ७७९ अर्ज डिमांड भरलेले आहेत. या शेतकºयांना कृषी पंप जोडणी दिली जावी, यासाठी महावितरणने कित्येकदा निविदा काढली. मात्र कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यात आल्या नाहीत. अशात इच्छा असूनही महावितरणकडून जोडणी करण्यात आली नाही. परिणामी डिमांड भरूनही जिल्ह्यातील दोन हजार ७७९ शेतकरी वेटींगवरच आहेत.उच्चदाब वितरण प्रणालीचा (एचडिव्हीएस) योजनेला सुरूवातशेतकºयांना योग्य दाब व अखंडीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणाली (एचहिडीएस) योजना राबविली जाणार आहे. यासह अन्य २ योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१६) करण्यात आला. यात, उच्चदाब वितरण प्रणाली या योजनेची जिल्ह्यातही सुरूवात करण्यात आला असून गोरेगाव तालुक्यातील ग्राम झांजीया येथील शेतकरी जियालाल गणपत चन्ने यांना पहिले कनेक्शन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कामांसाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून आता कृषी पंप वीज जोडणीचे काम गती घेणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण