शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

संतापजनक ! १३ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग ; शाळकरी मुली शहरात सुरक्षित नसल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 14:51 IST

मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल : पोलिसांनी केले आरोपीला अटक; सतत दोन दिवस केला पाठलाग

लोकमत न्यूज नेटवर्क देवरी: देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच येथे १३ वर्षीय शाळकरी मुलीचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) उघडकीस आली. त्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी खुशाल कैलास राऊत (१८, रा. परसटोला) या तरुणाला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे अल्पवयीन शाळकरी मुली शहरात सुरक्षित नसल्याची भीती पीडित मुलीच्या पालकांसह समाजमनात निर्माण झाली आहे.

देवरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौकात गुरुवारी (दि. २२) सकाळी १०:३० वाजता पीडित मुलगी आपल्या खासगी वसतिगृहातून शाळेत जात होती. दरम्यान, शिवाजी चौकातील स्टार कॉम्प्यटरजवळ आरोपी खशाल राऊत स्कूटीवर आला व त्याने मुलीचा हात पकडून मोबाइल घेण्यास सांगितले.

मुलीने नकार दिला असता, त्याने तिला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. २३) सकाळी १०:३० वाजता त्याने पीडित मुलीचा पाठलाग करीत शाळेसमोर तिचा हात पकडला व माझ्याशी बोल, नाही तर तुला मारेन, अशी धमकी देत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. यावर मुलगी जोरात ओरड लागल्याने आरोपीने तेथन पळ काढला. मुलीने घडलेली घटना वसतिगृह अधीक्षिकेला सांगून पोलिस ठाणे गाठले.

तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी भारतीय न्याय संहिता कलम ७४,७८, ३५, १(२), सहकलम ८,१२ लैंगिक अपराध बाल संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी खुशाल राऊत याला अटक केली. देवरी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तुरुंगवासात पाठविले आहे. पुढील तपास सपोनि गंगाकचर करीत आहेत. 

शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर देवरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या शाळकरी मुलींची संख्या जास्त प्रमाणात आहे. बसस्थानक ते शाळा व शाळा ते बसस्थानक यादरम्यान पायी जाताना शहरातील रोडरोमिओ मुलींना त्रास देताना आढळून येतात. परंतु या रोडरोमिओंवर कारवाई होत नाही. यातच पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी भरदिवसा शाळकरी मुलीवर विनयभंग झाल्याची घटना घडल्याने पालकांनी संताप व्यक्त करीत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पोलिस बंदोबस्ताची गरज या घटनेनंतर शैक्षणिक संस्थांनी सुद्धा या या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अशाच घटना घडत असताना 'लोकमत'ने पोलिस बंदोबस्तावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळेस पोलिस अधीक्षकांनी दखल घेत पोलिस बंदोबस्त वाढविला होता. परंतु आजघडीला शाळेच्या वेळेत शाळांच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त दिसत नसल्याने अशा घटना घडत असून, यावर अंकुश कोण लावणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया