शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कोरोनाचा उद्रेक सुरूच, ग्रामीण भागात संसर्ग वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, बाधितांचे आकडे दररोज नवा रेकार्ड करीत आहे. त्यातच आता शहरीसह ग्रामीण भागात ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, बाधितांचे आकडे दररोज नवा रेकार्ड करीत आहे. त्यातच आता शहरीसह ग्रामीण भागात संसर्ग वेगाने वाढत आहे. काही गावच्या गाव कोरोना बाधित होत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे, तर आरोग्य यंत्रणा सुध्दा तोकडी पडत असून एकंदरीत परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनाच आता स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात रविवारी (दि.१८) ५७६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली, तर ७५९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या १३ बाधितांचा मृत्यू झाला. यात खासगी रुग्णालयात ४, तर शासकीय रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ७५९ रुग्णांमध्ये सर्वाधिक ४९८ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६०, गोरेगाव २७, आमगाव ५६, सालेकसा ७, देवरी १९, सडक अर्जुनी ७८ व बाहेरील राज्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावच्या गाव बाधित होत आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा वाढला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या आनुषंगाने आतापर्यंत १,२२,७८० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,०२,८६४ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,१५,८८६ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,०२,५३४ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत २५,६४० कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १८,६३६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे, तर ६,६५९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २,५९६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

...................

कोरोनाबाधितांची २६ हजारांकडे वाटचाल

जिल्ह्यात आठ दिवसांच्या कालावधीत तब्बल ९ हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा २५,६४० वर पोहचला असून, कोरोनाची २६ हजारी वाटचाल सुरू झाल्याचे चित्र आहे, तर १३० जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

............

आरटीपीसीआर किटची समस्या कायम

गोंदिया शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून पाच आरटीपीसीआर केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर आरटीपीसीआर कीटचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांना केंद्रावरून परत जावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

.......

१ लाख ३० हजार जणांना लस

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३० हजार जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागत आहे.