शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती करून शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:40 IST

शेतकरी समृद्ध तर गाव समृद्ध व देश समृद्ध होईल. रासायनिक द्रव्यांचा शेतीपिकांवरील वारेमाप वापराने मानव व निसर्गाचा समतोल ढासळला आहे. शेतजमीनीला पोषक वातावरण, मानवाला निरोगी जीवन जगणे व अर्थसमृद्धीसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करावी.....

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : गोठणगाव येथे शेतीची पाहणी

ऑनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : शेतकरी समृद्ध तर गाव समृद्ध व देश समृद्ध होईल. रासायनिक द्रव्यांचा शेतीपिकांवरील वारेमाप वापराने मानव व निसर्गाचा समतोल ढासळला आहे. शेतजमीनीला पोषक वातावरण, मानवाला निरोगी जीवन जगणे व अर्थसमृद्धीसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करावी असा मोलाचा सल्ला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी तालुक्यातील ग्राम गोठणगाव येथील सेंद्रिय शेतीची पाहणी करताना दिला.शनिवारी (दि.१०) सकाळी जिल्हाधिकारी काळे यांनी गोठणगाव येथील शेतकरी रतीराम राणे यांच्या शितगृहाची पाहणी केल्यानंतर बोंडगाव सुरबन येथील प्रगतशील शेतकरी व पंचायत समिती सदस्य सुशीला योगराज हलमारे यांच्या शेडनेटला भेट दिली.यावेळी त्यांचा मुलगा हर्षद योगराज हलमारे यांनी शेतातील व शेडनेटमधील टमाटर, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, काकडी, टरबूज, अ‍ॅप्पल बोर तसेच १ किलो वजनाचे पेरु याबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी हलमारे कुटुंबाचे शेतीमधील अद्ययावत तंत्रज्ञान, धडपड व मेहनतीची प्रशंसा करुन समाधान व्यक्त केले.श्रृंगारबांध शेजारील शेतीतील श्रृंगार व बांधातील पक्षी न्याहाळीत सकाळीच निसर्गसौंदर्याचा आस्वाद जिल्हाधिकाºयांच्या चेहºयावर खुलून दिसत होता. प्रत्येक पिकांची काटेकोरपणे माहिती त्यांनी घेतली. हर्षद हलमारे यांनी सुद्धा शेतामधील आतापर्यंत केलेले विविध पिकांचे प्रयोग यांची दिलखुलास माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी सेंद्रीय शेती व त्यामध्ये जैविक खतांचा वापर यांच्यावरच भर दिला गेला.जिल्हाधिकारी काळे यांनी, शासन सेंद्रिय शेतीसाठी खूप प्रोत्साहन देत असून शेतकऱ्यांनी ते स्विकारावे. प्रत्येक गावामध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे यावे. जमिनीची पोषकता वाढविण्यासाठी व तिचे आरोग्य सांभाळण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा वापर करणे टाळावेत. घरी गाई व म्हशी पाळाव्यात, त्यांना पोषक खाद्य जमिनीतून उगवावेत, त्यांचे मुत्र व शेणाद्वारे जीवामृत तयार करुन सर्व पिकांवर त्याचा वापर केल्यास खत व कीटकनाशक दोघांसाठी लाभप्रद आहे. शेतजमीनीत मित्र गांडूळ तसेच उडणारे मित्र किडे यांचे संगोपन करण्यासाठी पळस व तत्सम झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी. शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध होईल. त्यासाठी आता प्रत्येक गावातून शेतकऱ्यांनी पुढे येवून आपली मानसिकता सेंद्रिय शेतीकडे पुरस्कृत करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.राणेंच्या घरात रात्रीचा मुक्कामया पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी काळे यांनी रात्री गोठणगाव येथील शेतकरी रतीराम राणे यांच्या घरी मुक्काम केला. याबाबत अती गोपणीयता ठेवण्यात आली होती. अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्रातील मुक्काम हा दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१०) परीसरात चर्चेचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे यावेळी तहसीलदार पी.आर.भंडारी व कृषी विभागाचे कोहळे उपस्थित होते. यावेळी गावातील शेतकरी वगळता प्रशासनाचा लवाजमा नव्हता. अत्यंत गोपनीय दौरा ठेवण्यात आला होता. परंतु यांची माहिती विशेष कुणाला नव्हती अत्यंत साधेपणाची राहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शवून बिसलेरीचे पाणी नाकारुन घरातील पाणी पिण्यासाठी वापर केल्याचे व अस्सल हाडामासाच्या शेतकºयाचे दर्शन घडल्याचे राणे म्हणाले. अधिकाऱ्यांचा अविर्भाव जिल्हाधिकाऱ्यांच्या मुक्कामी आढळला नसल्याने राणे कुटुंबाने समाधान व्यक्त केला.

टॅग्स :collectorतहसीलदार