शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

जलाशयातून पाणी सोडण्याचे आदेश निघाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 9:49 PM

जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे. या मागणीचा प्रस्ताव जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या स्थाथी समितीत ठेवला होता. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईग्रस्त गावांना होणार मदत : तीन जलाशयातून सोडणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे. या मागणीचा प्रस्ताव जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या स्थाथी समितीत ठेवला होता. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणी टंचाइर् निवारणार्थ उपाय योजना करण्यात प्रशासनाला यावर्षी पूर्णपणे अपयश आले. मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाला.परिणामी मार्च महिन्यात तलाव, विहिरी बोड्या आणि बोअरवेलनी तळ गाठण्यास सुरूवात केली. तर सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा सध्या स्थितीत केवळ १२ टक्केच पाणी साठा आहे. याचा भूजल पातळीवर परिणाम झाल्याने शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली. जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करीत मे महिन्यापर्यंत वेळ मारुन नेली. परिणामी जिल्हावासीयांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करण्याची पाळी आली आहे. जि.प.च्या १८ मे रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत गंगाधर परशुरामकर यांनी जलाशयात काही प्रमाणात पाणी साठा शिल्लक असून तो सोडल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. याला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सुध्दा एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी २१ मे रोजी जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार चुलबंद जलाशयाचे पाणी म्हसवाणी, घोटी, बोथली, डव्वा, घाटबोरी-तेली १ दसलक्ष घनमीटर तर सिरपूर जलाशयाचे पाणी मकरधोकडा, शिलापूर, पद्मपूर, फुक्कीमेटा, धारणी या गावांसाठी २ दसलक्ष घनमीटर, ओवारा मध्यप्रकल्पाचे पाणी रामाटोला, माळीटोला, वळद, कंटगटोला, कवडी, पानगाव, येरमडा या गावांसाठी १ दसलक्ष घनमीटर आणि पुजारीटोला धरणाचे पाणी कासा, बिरसोला, काटी या गावांकरिता ०.७५ दसलक्ष घन मिटर पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. या मुळे या परिसरातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जलाशयातून पाणी सोडण्यात यावे यासाठी परशुरामकर यांनी मागील तीन दिवसांपासून जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाºयांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.