शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

आरोग्य केंद्राला कुलूप; दीड महिन्याचे बाळ उपचाराअभावी दगावले! मातेने फोडला हंबरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 10:45 IST

प्राथमिक केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले असल्याचे आढळताच कुटुंबीयांनी गेटबाहेरून आत असलेल्या कर्मचाऱ्यांना रात्री एक ते दीड वाजेपर्यंत आवाज दिला. मात्र, कुणीही कर्मचारी बाहेर आला नाही.

ठळक मुद्देअधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

आमगाव (गाेंदिया) : तालुक्यातील कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य दाराला रात्रीच्या वेळेस कुलूप लावले असल्यामुळे एका दीड महिन्याच्या मुलाला वेळीच उपचार मिळू शकला नाही. परिणामी त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ३०) मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमगाव तालुक्यातील कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास कायरव विकास नांदणे या दीड महिन्याच्या मुलाची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर उपचार करण्यासाठी कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. मात्र, प्राथमिक केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले असल्याचे आढळताच कुटुंबीयांनी गेटबाहेरून आत असलेल्या कर्मचाऱ्यांना रात्री एक ते दीड वाजेपर्यंत आवाज दिला. मात्र, कुणीही कर्मचारी बाहेर आला नाही. त्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या घरी जाऊन बोलाविण्यात आले व संबंधित डॉक्टरला बोलाविण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

डॉक्टर आल्यावर बाळाची तपासणी केली असता तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. केवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले असल्याने आणि वेळीच उपचार होऊ न शकल्याने दीड महिन्याच्या बाळाला प्राणास मुकावे लागले. बाळाला डॉक्टरने मृत घोषित करताच त्या मातेने हंबरडा फोडला. बाळाला वाचविण्यासाठी त्या मातेने आणि कुटुंबीयांनी दीड तास धडपड केली. मात्र, उपचाराअभावीच बाळ दगावल्याने त्यांची ही सर्व धडपड व्यर्थ गेली. गावकऱ्यांना हा सर्व प्रकार कळताच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रवेशद्वाराला कुलूप कशासाठी ?

प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना रात्री-बेरात्री केव्हाही उपचारासाठी आणले जाऊ शकते. मग प्रवेशद्वाराला कुलूप लावून ठेवण्याचे कारण काय, प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याऐवजी चौकीदाराची नियुक्ती का केली जात नाही? बाळाच्या मृत्यूस केवळ कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बाळाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलamgaon-acआमगावDeathमृत्यू