शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आता आम्ही आमच्या गावाचे रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील पाच गावांनी गाव बंदीचा निर्णय घेतला. तसेच गावकऱ्यांची परवानगी न घेता गावात प्रवेश करणाऱ्यांना अडीच हजार रुपयांच्या दंडाची सुध्दा तरतूद केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव : गावकऱ्यांचा गावबंदीचा निर्णय

लालसिंह चंदेल।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युध्द स्तरावर उपाय योजना केल्या जात आहे. त्यात आता ग्रामीण भागातील ग्रामपंचायती सुध्दा पुढे येत आहे. कोरोनाचा आपल्या गावामध्ये शिरकाव होऊ नये म्हणून आता गावकऱ्यांनी गाव बंदीचा निर्णय घेत आहे. तर काही ग्रामपंचायतीनी गाव दक्षता समित्या स्थापन करुन गावाच्या प्रवेशाव्दारावर ग्राम रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता आम्हीच आमच्या गावाचे रक्षक असे चित्र आहे.कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील पाच गावांनी गाव बंदीचा निर्णय घेतला. तसेच गावकऱ्यांची परवानगी न घेता गावात प्रवेश करणाऱ्यांना अडीच हजार रुपयांच्या दंडाची सुध्दा तरतूद केली आहे. ऐवढेच नव्हे तर गावात कोणतेही वाहन अथवा बाहेरील नागरिक प्रवेश करु नये यासाठी गावाच्या प्रवेशव्दारावर लाकडे आणि झाडाच्या फांद्या टाकून मार्ग अडविण्यात आला आहे. तर सडक अर्जुनी तालुक्यातील डुंडा आणि पांढरी येथे गावकऱ्यांनी गाव दक्षता समितीची स्थापना करुन ग्राम सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे. गावातील युवक पाळी पाळीने गावाच्या प्रवेशाव्दारा पहारा देत असून गावाबाहेरील व्यक्तीस गावात प्रवेश करण्यास मज्जाव करीत आहे. तर असाच निर्णय देवरी तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतने सुध्दा गावातील युवकांची ग्रामरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे युवक गावाच्या प्रवेशव्दारावर दिवसभर पहारा देत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता आम्हीच आमच्या गावाचे रक्षक ही संकल्प रुढ होत असल्याचे चित्र आहे. ही सर्व उपाय योजना आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे,त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आहे.त्यामुळे गावकरी देखील यात सहकार्य करीत असल्याचे चित्र आहे.गावांमध्ये सॅनिटायझेशन फवारणी करण्यास सुरूवातकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता ग्रामपंचायतीने सुध्दा पुढाकार घेतला आहे.गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील केशोरीसह अनेक ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझर आणि डासनाशक फवारणी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत