शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या चक्रव्यूहात सापडला जगाचा पोशिंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी रोहीणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजाला पाणी विकत घेवून तर काही ठिकाणी इंजिन व मोटारपंपाच्या सहाय्याने पऱ्हे जगविण्याची वेळ आली. काही ठिकाणी रोवणी झाली आहे परंतु पुन्हा पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहे. अनेक ठिकाणी पीके करपण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपावसाकडे लागल्या सर्वांच्या नजरा : अद्यापही सर्वत्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

प्रकाश हातेल ।लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही दमदार पावसाअभावी अनेक ठिकाणी रोवणी झालेली दिसून येत नाही. पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरवर्षी शेतकरी खरीप हंगामात नव्या जोमाने तयारीला लागतो. तसाच यावर्षीही बळीराजाने बँकेचे कर्ज तसेच उसनवार करुन खरीप हंगामाची जुळवाजुळव केली. मात्र गत महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी उलटा संकटात सापडला आहे.जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी रोहीणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजाला पाणी विकत घेवून तर काही ठिकाणी इंजिन व मोटारपंपाच्या सहाय्याने पऱ्हे जगविण्याची वेळ आली. काही ठिकाणी रोवणी झाली आहे परंतु पुन्हा पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहे. अनेक ठिकाणी पीके करपण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.गत वर्षाच्या तोटा भरुन निघेल या आशेने अनेकांनी मिळेल तिथून कर्ज घेतले. मात्र ऐन खरीप हंगामातच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. काही ठिकाणी पाणी आहे पण वीज नाही, अशी अवस्था असल्याने गोसे प्रकल्पाच्या पाण्याशेजारी शेतकऱ्यांनी कालव्यातील पाणी उपसून रोवणी केली. मात्र गत आठवड्याभरापासून पावासाने दडी मारल्याने रोवणी करुन देखील पीके करपण्याच्या मार्गावर आहे. बळीराजाने केलेला खर्च निघेल की नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. कर्जमुक्त होण्याचे स्वप्न बळीराजाच्या नशिबिच नाही काय? असे चित्र दिसत आहे.चिचाळ, गोसे, अड्याळ, नेरला, कोंढा, सोमनाळा परिसरातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त झाले आहे. परिवाराच्या पालनपोषणासाठी अनेकांना रोजगाराची चिंता सतावू लागली आहे. नकारात्मक विचार येत असल्याने शासनाच्या मदतीची गरज आहे. देशाची अर्थव्यवस्था शेती व्यवसायामुळे सुधारु लागली असतानाच आता पावसाचे संकट उभे राहिल्याने बळीराजाला सरकारने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. कोरोना प्रादूर्भाव वाढत असल्याने अनेकांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे अनेकजन शेती करु लागले आहेत. त्यामुळे कुटुंबाला हातभार लागणारा रोजगारही बंद पडल्याने आता शेती व्यवसायावरच पुर्ण भिस्त आहे. शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास रोजगार उपलब्ध करण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना कोणी वालीच उरला नाहीशेतकऱ्यांसाठी निवडणुकीपूर्वी विविध आंदोलने, मोर्चे काढणारे पुढारी आता गायब झाल्याचे दिसून येत आहे. बळीराजावर संकट ओढावले असताना आता मदतीसाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पावसासोबत पुढाऱ्यांनीही दडी मारली काय? अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे. गोसे प्रकल्पावर डावा कालव्याचे पाणी सोडा म्हणून शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला. पाण्यासाठी शेतकऱ्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कायमस्वरुपी संकटातून मुक्त करण्यासाठी विविध योजना राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती