शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

निसर्गाच्या चक्रव्यूहात सापडला जगाचा पोशिंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी रोहीणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजाला पाणी विकत घेवून तर काही ठिकाणी इंजिन व मोटारपंपाच्या सहाय्याने पऱ्हे जगविण्याची वेळ आली. काही ठिकाणी रोवणी झाली आहे परंतु पुन्हा पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहे. अनेक ठिकाणी पीके करपण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपावसाकडे लागल्या सर्वांच्या नजरा : अद्यापही सर्वत्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

प्रकाश हातेल ।लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही दमदार पावसाअभावी अनेक ठिकाणी रोवणी झालेली दिसून येत नाही. पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरवर्षी शेतकरी खरीप हंगामात नव्या जोमाने तयारीला लागतो. तसाच यावर्षीही बळीराजाने बँकेचे कर्ज तसेच उसनवार करुन खरीप हंगामाची जुळवाजुळव केली. मात्र गत महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी उलटा संकटात सापडला आहे.जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी रोहीणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजाला पाणी विकत घेवून तर काही ठिकाणी इंजिन व मोटारपंपाच्या सहाय्याने पऱ्हे जगविण्याची वेळ आली. काही ठिकाणी रोवणी झाली आहे परंतु पुन्हा पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहे. अनेक ठिकाणी पीके करपण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.गत वर्षाच्या तोटा भरुन निघेल या आशेने अनेकांनी मिळेल तिथून कर्ज घेतले. मात्र ऐन खरीप हंगामातच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. काही ठिकाणी पाणी आहे पण वीज नाही, अशी अवस्था असल्याने गोसे प्रकल्पाच्या पाण्याशेजारी शेतकऱ्यांनी कालव्यातील पाणी उपसून रोवणी केली. मात्र गत आठवड्याभरापासून पावासाने दडी मारल्याने रोवणी करुन देखील पीके करपण्याच्या मार्गावर आहे. बळीराजाने केलेला खर्च निघेल की नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. कर्जमुक्त होण्याचे स्वप्न बळीराजाच्या नशिबिच नाही काय? असे चित्र दिसत आहे.चिचाळ, गोसे, अड्याळ, नेरला, कोंढा, सोमनाळा परिसरातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त झाले आहे. परिवाराच्या पालनपोषणासाठी अनेकांना रोजगाराची चिंता सतावू लागली आहे. नकारात्मक विचार येत असल्याने शासनाच्या मदतीची गरज आहे. देशाची अर्थव्यवस्था शेती व्यवसायामुळे सुधारु लागली असतानाच आता पावसाचे संकट उभे राहिल्याने बळीराजाला सरकारने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. कोरोना प्रादूर्भाव वाढत असल्याने अनेकांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे अनेकजन शेती करु लागले आहेत. त्यामुळे कुटुंबाला हातभार लागणारा रोजगारही बंद पडल्याने आता शेती व्यवसायावरच पुर्ण भिस्त आहे. शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास रोजगार उपलब्ध करण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना कोणी वालीच उरला नाहीशेतकऱ्यांसाठी निवडणुकीपूर्वी विविध आंदोलने, मोर्चे काढणारे पुढारी आता गायब झाल्याचे दिसून येत आहे. बळीराजावर संकट ओढावले असताना आता मदतीसाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पावसासोबत पुढाऱ्यांनीही दडी मारली काय? अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे. गोसे प्रकल्पावर डावा कालव्याचे पाणी सोडा म्हणून शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला. पाण्यासाठी शेतकऱ्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कायमस्वरुपी संकटातून मुक्त करण्यासाठी विविध योजना राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती