शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जडवाहनांना शहरात प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 5:00 AM

शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत चालली असून त्याचप्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती तीच असून अगोदरच असलेल्या अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील बाजारपेठेतील रस्ते अरूंद असून त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणाऱ्या जडवाहनांचा दिवसभर शिरकाव होत असतो. परिणामी बाजारपेठेतील वाहतुक विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण शाखेचा प्रयोग। मंगळवारपासून येणार अंमलात

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील रस्ते अगोदरच अरूंद असून त्यात जडवाहनांचा शिरकाव नागरिकांसाठी त्रासदायक व तेवढाच धोकादायक ठरत आहे. जडवाहनांमुळे शहरात कित्येक अपघात घडले असून नागरिकांचा नाहक जीव गेल्याचे प्रकारही घडले आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी आता वाहतूक नियंत्रण शाखेने जडवाहनांना शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजता पर्यंत प्रवेशबंदी केली आहे. मंगळवारपासून (दि.२७) यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत चालली असून त्याचप्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती तीच असून अगोदरच असलेल्या अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील बाजारपेठेतील रस्ते अरूंद असून त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणाऱ्या जडवाहनांचा दिवसभर शिरकाव होत असतो. परिणामी बाजारपेठेतील वाहतुक विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते.शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षीत ठेवण्याच्या दृष्टीने तसेच सामान्य जनतेला धोका, गैरसोय व अडथळा निर्माण होऊ नये यादृष्टीने वाहतूक नियंत्रण शाखेने जडवाहनांना शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत प्रवेशबंदीसाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता.त्यास अधीक्षकांनी ग्रीनसिग्नल दिला असल्याने मंगळवारी (दि.२७) सकाळी ९ वाजतापासून शहरात जडवाहनांना प्रवेशबंदी केली जाणार आहे.२ नोब्हेंबर पर्यंत प्रायोगीक तत्वावरवाहतूक नियंत्रण शाखेचा हा प्रयोग २ ऑक्टोबर पर्यंत प्रायोगीक तत्वावर राबविला जाणार आहे. मात्र त्यानंतर कायमस्वरूपी अधिसूचना लागू करण्यात येणार आहे. मात्र तरिही या प्रयोगामुळे नागरिकांना काही अडचण होत असल्यास त्यांचे आक्षेप जाणून घेतले जाणार आहे. यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या मनोहर चौकातील कार्यालय तसेच पोलीस नियंत्रण कक्ष येथे लेखी स्वरूपात नागरिकांना आपले आक्षेप नोंदविता येणार आहेत.या मार्गावर राहणार जडवाहनांना प्रवेशबंदीकारंजा टी-पॉईंटकडून गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.पतंगा चौक ते फुलचूर शहराकडे येणारा मुख्य रस्ता.राजाभोज चौक ते छोटा गोंदिया मार्गे गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.मरारटोली जंक्शनकडून गोंदया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.राणी अवंतीबाई चौक ते छोटा पाल चौककडे येणार मुख्य रस्ता.कुडवा नाका ते पाल चौक कडे येणारा मुख्य रस्ता.सिंधी स्कूल ते गोंदिया शहराकडे येणार मुख्य रस्ता.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक