शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी धावले निसर्ग मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:09 IST

वाढत्यामुळे तापमानाचा फटका मानवासह पशु पक्ष्यांना सुद्धा बसत आहे. जंगलातील पानवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. मात्र यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे१६ कृत्रिम पाणवठ्यांची सफाई : जंगल परिसरात ६३३ वन्य प्राण्यांची नोंद

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : वाढत्यामुळे तापमानाचा फटका मानवासह पशु पक्ष्यांना सुद्धा बसत आहे. जंगलातील पानवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. मात्र यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तळपत्या उन्हान्यात वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती करण्यासाठी गोरेगाव येथील निसर्ग मंडळाचे सदस्य वन विभागाच्या मदतीला धावून आले. त्यांनी गोरेगाव तालुक्यातील जंगलातील पानवठ्यांमध्ये पाणी भरुन वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थाबंविण्यासाठी पुढाकार घेतला.तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे.उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलातंरण होत असते. दरवर्षी बौद्ध पोर्णिमेच्या रात्री पशुगणना होते. ही गणना केवळ जंगल भागातील असते. मागील वर्षी जंगल भागात ६३३ वन्यप्राणी आढळले होते. त्यात दोन बिबट, ११२ चितळ, ८ सांबर, ३३ निलगाय, १४१ रान डुक्कर, ८ अस्वल, ४ भेकर, ३६ मोर, ५ ससे, ३ लांडगे, ३ रानमांजर, २८० माकड अशा एकूण ६३३ वन्यप्राण्यांचा समावेश होता. प्राणी गणनेत उपलब्ध झालेल्या प्राण्यांच्या संख्येनुसार वनविभागाने उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जंगलात कृत्रिम १६ पानवठे तयार केले आहेत. मात्र हे पानवठे सध्यास्थितीत कोरडे पडले होते.त्यामुळे वन विभागाच्या मदतीने निसर्गमित्र मंडळाच्या सदस्यांनी या पानवठ्यांमध्ये टँकरव्दारे पाणी भरुन वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करुन दिले. तालुक्यातील बोळुंदा, पिंडकेपार, तेढा, गराडा, मुरदोली, सोंदलागोंदी, आसलपाणी, मलपुरी, बागळबंद, पठानटोला, निंबा या गावाच्या जवळपास तर कुठे लागूनच जंगल व्याप्त परिसर आहे. या भागात वन्य प्राण्यांसाठी १६ कृत्रिम पानवठे तयार केले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातही वन्य प्राण्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. या पाणवंठ्यांची वनविभागाकडून दररोज पाहणी केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एस.एम. जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली.जंगलातील पाणवठ्यांचा शोधवन्यप्राण्यासह स्वत:ची तहान भागविण्यासाठी होत असलेली धडपड व त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या वाढत्या घटना आणि वन्यप्राण्याच्या शिकारीच्या घटनांना पूर्णपणे पायबंद लागवा यासाठी निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीने पुढाकार घेतला आहे. जंगलातील पाणवठे शोधून व त्या पाणवठ्याची साफसफाई करुन त्यात पाणी भरले.यांनी घेतला पुढाकारजंगलातील पानवठे स्वच्छ करुन त्यात वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी जाधव यांनी निसर्ग मंडळाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, सहसचिव दिलीप येळे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, सदस्य मोरेश्वर रहांगडाले, दिलीप चव्हाण, योगेश रहांगडाले यांनी सहकार्य केले.गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीत दोन बांबू उभे करुन ठेवल्यास माकडांना पाणी पिण्याची अडचण होणार नाही. बांबुच्या सहाय्याने माकड विहिरीत उतरुन पाणी पिऊ शकतात. त्यामुळे निसर्ग मंडळाच्या टिमने या सामाजिक उपक्रमाला हातभार लावण्याची गरज आहे.-एस.एम.जाधव वनपरिक्षेत्राधिकारी वनविभाग, गोरेगाव

टॅग्स :water shortageपाणीटंचाईforestजंगल