शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय नवीन शोध अशक्य

By admin | Updated: January 22, 2017 01:03 IST

वर्तमान युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञान विचार करायला भाग पाडते. का व कसे, असे प्रश्न निर्माण होतात.

उल्हास नरड : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन अर्जुनी मोरगाव : वर्तमान युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञान विचार करायला भाग पाडते. का व कसे, असे प्रश्न निर्माण होतात. तेव्हाच वैज्ञानिक शोध लागतात. बदलत्या शैक्षणिक क्रांती व विचार प्रवाहानुसार पाठ्यपुस्तके बदलली पाहिजेत. नवनवीन शोध लागले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासल्याशिवाय नवनवीन शोध लागणार नाहीत, असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांनी केले. ते गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जि.प. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी के.बी. बोपचे यांनी केले. अध्यक्षस्थानी पं.स.चे गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार होते. यावेळी शिक्षणाधिकारी उल्हास नरड, पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, जि.प. सदस्य गिरीश पालीवाल, तेजूकला गहाणे, मंदा कुंभरे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी टी.बी. भेंडारकर, शिक्षण विस्तार अधिकारी एम. एस. मोटघरे, अहिल्या खोब्रागडे, वाय.आर. लंजे, मुख्याध्यापक राजगिरे, सुनिता हुमे, प्राचार्य डी.के. मस्के, शाळा समिती सदस्य सिद्धार्थ टेंभुर्णे उपस्थित होते. नरड पुढे म्हणाले, येत्या पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळा उत्कृष्ट होतील. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. यात कुठेही कमी पडता कामा नये. ग्रंथ महोत्सवात जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. वाचन आनंद प्रेरणा दिनाची संकल्पना उत्कृष्ट आहे. हा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यातील शाळांत उत्कृष्टपणे राबविण्यात आला. हा पॅटर्न महाराष्ट्र शासनाने स्वीकारुन राज्यात सुरू करण्याचे परिपत्रक काढले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये शोधकवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने नजीकच्या शाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनी बघण्यासाठी आवर्जुन आणावे असे निर्देश त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या एकाच उपक्रमाची निवड करुन संपूर्ण कौशल्य पणाला लावावे व नैपूण्य प्राप्त करावे असा संदेश दिला. के.बी. बोपचे यांनी सांगितले की, विज्ञानाची प्रगती गं्रथातून झाली. ग्रंथ वाचनाने नवीन दृष्टी तयार होते. ग्रंथ हे आयुष्यातील परिवर्तनाचे माध्यम आहे. ग्रंथ वाचनाने ज्ञानवृत्ती होते. ज्ञान ग्रंथातूनच मिळते. ग्रंथ हे माणसाचे सोबती आहेत. केवळ संशोधनाचा उपयोग घेण्याऐवजी विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती बाळगून संशोधनाच्या मुळाश्ी गेले पाहिजे. स्वत:चे टॅलेंट प्रगत करा. जीवनात टॅलेंट प्रदर्शीत करण्याचे अनेक क्षण प्राप्त होतात त्याचा लाभ घेतल्यास निश्चितच जीवनात संधीचे सोने होईल असा उपदेश केला. एन.आर. जमईवार म्हणाले, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर अधोगतीसाठी करु नका. आपण भावी पीढीचे वैज्ञानिक आहात. केवळ अर्थार्जनासाठी शिक्षण घेऊ नका. स्वत: वैज्ञानिक चिकित्सक वृत्ती जोपासून केवळ विज्ञानातच नव्हे तर कृषी, शिक्षण व समाजकारण क्षेत्रात प्रगती करा. आपल्या भाषणातून त्यांनी शौचालयाचा वापर सर्वच घरात करावा. कॅशलेसचा वापर करा आणि जीवन सुखकर होण्यासाठी स्वत:चे व्यक्तिमत्व फुलवा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एस. मोटघरे, संचालन आर. डी. कस्वाल यांनी केले. टी.बी. भेंडारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)