शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय नवीन शोध अशक्य

By admin | Updated: January 22, 2017 01:03 IST

वर्तमान युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञान विचार करायला भाग पाडते. का व कसे, असे प्रश्न निर्माण होतात.

उल्हास नरड : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन अर्जुनी मोरगाव : वर्तमान युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञान विचार करायला भाग पाडते. का व कसे, असे प्रश्न निर्माण होतात. तेव्हाच वैज्ञानिक शोध लागतात. बदलत्या शैक्षणिक क्रांती व विचार प्रवाहानुसार पाठ्यपुस्तके बदलली पाहिजेत. नवनवीन शोध लागले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासल्याशिवाय नवनवीन शोध लागणार नाहीत, असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांनी केले. ते गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जि.प. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी के.बी. बोपचे यांनी केले. अध्यक्षस्थानी पं.स.चे गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार होते. यावेळी शिक्षणाधिकारी उल्हास नरड, पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, जि.प. सदस्य गिरीश पालीवाल, तेजूकला गहाणे, मंदा कुंभरे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी टी.बी. भेंडारकर, शिक्षण विस्तार अधिकारी एम. एस. मोटघरे, अहिल्या खोब्रागडे, वाय.आर. लंजे, मुख्याध्यापक राजगिरे, सुनिता हुमे, प्राचार्य डी.के. मस्के, शाळा समिती सदस्य सिद्धार्थ टेंभुर्णे उपस्थित होते. नरड पुढे म्हणाले, येत्या पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळा उत्कृष्ट होतील. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. यात कुठेही कमी पडता कामा नये. ग्रंथ महोत्सवात जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. वाचन आनंद प्रेरणा दिनाची संकल्पना उत्कृष्ट आहे. हा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यातील शाळांत उत्कृष्टपणे राबविण्यात आला. हा पॅटर्न महाराष्ट्र शासनाने स्वीकारुन राज्यात सुरू करण्याचे परिपत्रक काढले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये शोधकवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने नजीकच्या शाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनी बघण्यासाठी आवर्जुन आणावे असे निर्देश त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या एकाच उपक्रमाची निवड करुन संपूर्ण कौशल्य पणाला लावावे व नैपूण्य प्राप्त करावे असा संदेश दिला. के.बी. बोपचे यांनी सांगितले की, विज्ञानाची प्रगती गं्रथातून झाली. ग्रंथ वाचनाने नवीन दृष्टी तयार होते. ग्रंथ हे आयुष्यातील परिवर्तनाचे माध्यम आहे. ग्रंथ वाचनाने ज्ञानवृत्ती होते. ज्ञान ग्रंथातूनच मिळते. ग्रंथ हे माणसाचे सोबती आहेत. केवळ संशोधनाचा उपयोग घेण्याऐवजी विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती बाळगून संशोधनाच्या मुळाश्ी गेले पाहिजे. स्वत:चे टॅलेंट प्रगत करा. जीवनात टॅलेंट प्रदर्शीत करण्याचे अनेक क्षण प्राप्त होतात त्याचा लाभ घेतल्यास निश्चितच जीवनात संधीचे सोने होईल असा उपदेश केला. एन.आर. जमईवार म्हणाले, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर अधोगतीसाठी करु नका. आपण भावी पीढीचे वैज्ञानिक आहात. केवळ अर्थार्जनासाठी शिक्षण घेऊ नका. स्वत: वैज्ञानिक चिकित्सक वृत्ती जोपासून केवळ विज्ञानातच नव्हे तर कृषी, शिक्षण व समाजकारण क्षेत्रात प्रगती करा. आपल्या भाषणातून त्यांनी शौचालयाचा वापर सर्वच घरात करावा. कॅशलेसचा वापर करा आणि जीवन सुखकर होण्यासाठी स्वत:चे व्यक्तिमत्व फुलवा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एस. मोटघरे, संचालन आर. डी. कस्वाल यांनी केले. टी.बी. भेंडारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)