शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे रास्ता रोकाे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

आधी शेतीमालाला हमीभाव न देणे आणि आता खरेदीला मर्यादा घालून केंद्र सरकार शेेतकऱ्यांची गळचेपी करून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रातील मोदी  सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ करून केंद्र  सरकारने महागाईत भर टाकली असून गोरगरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण बनले आहे. तसेच खते आणि बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यात  धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असून यंदा रब्बी हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मात्र केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी धान खरेदीची मर्यादा ही ४ लाख ७९ हजार क्विंटल ठरवून दिली आहे. त्यामुळे २४ लाख क्विंटल धान विकायचा कुठे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. धान खरेदीची मर्यादा ३० लाख क्विंटलपर्यंत वाढवून देण्यात यावी, या मागणीला घेऊन सडक-अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि. २०) सकाळी १० वाजता गोंदिया-रायपूर मार्गावरील कोहमारा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोहमारा येथील टी पाॅईंट चौकात रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयावर आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, अविनाश काशीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात  आला. यावेळी मोर्च्यात सहभागी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आधी शेतीमालाला हमीभाव न देणे आणि आता खरेदीला मर्यादा घालून केंद्र सरकार शेेतकऱ्यांची गळचेपी करून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रातील मोदी  सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ करून केंद्र  सरकारने महागाईत भर टाकली असून गोरगरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण बनले आहे. तसेच खते आणि बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रब्बीतील धान खरेदीची मर्यादा त्वरित वाढवून द्यावी व पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमती आटोक्यात आणाव्यात, या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानावाने तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष यशवंत गणविर, जि. प. सदस्या सुधा रहांगडाले,  डी. यू. रहांगडाले, तेजराम मडावी, रुकीराम वाढई, रमेश चुऱ्हे, अजय लांजेवार,  राहुल यावलकर, आशिष येरणे, कामिनी कोवे, दिलीप कापगते, शिवाजी गहाणे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, आनंद अग्रवाल, पुष्पमाला बडोले, शुभांगी वाढवे, मंजू डोंगरवार, एफ.आर.टी. शहा, अनिता बांबोडे, ईश्वर कोरे, दिनेश कोरे उपस्थित होते.

या होत्या प्रमुख मागण्या... - केंद्र सरकारने धान खरेदीची मर्यादा वाढवून ३० लाख क्विंटल करावी, - मागीलवर्षीच्या तुलनेत वाढलेले खताचे दर कमी करावेत.- पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर त्वरित कमी करावेत.

केंद्रातील माेदी सरकार एकीकडे शेतकरीहितैशी असल्याचे भासवित असून दुसरीकडे धान खरेदीला मर्यादा लावून आणि खते, बियाणांचे दर वाढवून त्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. पण केंद्र सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे.- राजेंद्र जैन, माजी आमदारकेंद्र सरकारने रब्बीसाठी ठरवून दिलेली धान खरेदीची मर्यादा त्वरित ३० लाख क्विंटल करून द्यावी, अन्यथा यासाठी शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करू.- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपNCPराष्ट्रवादी काँग्रेस