शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे रास्ता रोकाे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

आधी शेतीमालाला हमीभाव न देणे आणि आता खरेदीला मर्यादा घालून केंद्र सरकार शेेतकऱ्यांची गळचेपी करून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रातील मोदी  सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ करून केंद्र  सरकारने महागाईत भर टाकली असून गोरगरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण बनले आहे. तसेच खते आणि बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यात  धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असून यंदा रब्बी हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मात्र केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी धान खरेदीची मर्यादा ही ४ लाख ७९ हजार क्विंटल ठरवून दिली आहे. त्यामुळे २४ लाख क्विंटल धान विकायचा कुठे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. धान खरेदीची मर्यादा ३० लाख क्विंटलपर्यंत वाढवून देण्यात यावी, या मागणीला घेऊन सडक-अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि. २०) सकाळी १० वाजता गोंदिया-रायपूर मार्गावरील कोहमारा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोहमारा येथील टी पाॅईंट चौकात रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयावर आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, अविनाश काशीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात  आला. यावेळी मोर्च्यात सहभागी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आधी शेतीमालाला हमीभाव न देणे आणि आता खरेदीला मर्यादा घालून केंद्र सरकार शेेतकऱ्यांची गळचेपी करून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रातील मोदी  सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ करून केंद्र  सरकारने महागाईत भर टाकली असून गोरगरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण बनले आहे. तसेच खते आणि बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रब्बीतील धान खरेदीची मर्यादा त्वरित वाढवून द्यावी व पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमती आटोक्यात आणाव्यात, या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानावाने तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष यशवंत गणविर, जि. प. सदस्या सुधा रहांगडाले,  डी. यू. रहांगडाले, तेजराम मडावी, रुकीराम वाढई, रमेश चुऱ्हे, अजय लांजेवार,  राहुल यावलकर, आशिष येरणे, कामिनी कोवे, दिलीप कापगते, शिवाजी गहाणे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, आनंद अग्रवाल, पुष्पमाला बडोले, शुभांगी वाढवे, मंजू डोंगरवार, एफ.आर.टी. शहा, अनिता बांबोडे, ईश्वर कोरे, दिनेश कोरे उपस्थित होते.

या होत्या प्रमुख मागण्या... - केंद्र सरकारने धान खरेदीची मर्यादा वाढवून ३० लाख क्विंटल करावी, - मागीलवर्षीच्या तुलनेत वाढलेले खताचे दर कमी करावेत.- पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर त्वरित कमी करावेत.

केंद्रातील माेदी सरकार एकीकडे शेतकरीहितैशी असल्याचे भासवित असून दुसरीकडे धान खरेदीला मर्यादा लावून आणि खते, बियाणांचे दर वाढवून त्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. पण केंद्र सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे.- राजेंद्र जैन, माजी आमदारकेंद्र सरकारने रब्बीसाठी ठरवून दिलेली धान खरेदीची मर्यादा त्वरित ३० लाख क्विंटल करून द्यावी, अन्यथा यासाठी शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करू.- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपNCPराष्ट्रवादी काँग्रेस