शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

ढोल ताशांच्या गजरात होणार नवगतांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:19 IST

दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्यानंतर मंगळवारपासून (दि.२६) जिल्हा परिषद व इतर खासगी शाळा सुरू होणार आहेत. तर काही बालके प्रथम पहिल्या वर्गात जाणार असून त्यांचा व इतर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे.

ठळक मुद्देशाळांमध्ये आजपासून किलबिलाट : शिक्षण विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्यानंतर मंगळवारपासून (दि.२६) जिल्हा परिषद व इतर खासगी शाळा सुरू होणार आहेत. तर काही बालके प्रथम पहिल्या वर्गात जाणार असून त्यांचा व इतर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळांमध्ये प्रवेशोत्सव व वाचन दिवस उपक्रम राबविण्यात येणार आहे.नवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेवून शाळेला स्कूल चले हम असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकले हसत खेळत मंगळवारपासून शाळेत जाणार आहेत. उन्हाळी सुट्यांचा आनंद घेतल्यानंतर शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे.त्यामुळे शाळांमध्ये मंगळवारपासून विद्यार्थ्यांची किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.नवीन ड्रेस, कंपास पेटी, वह्या, दप्तर आदी घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शहरातील शैक्षणिक साहित्याच्या दुकानात सोमवारी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांमध्ये पहिल्याच दिवसापासून शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळांमध्ये प्रवेशोत्सव, वाचन दिवस आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर काही शाळांमध्ये प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वर्ग खोल्यांची सुध्दा सजावट केली आहे.तर ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने संर्पूण तयारी केली आहे.पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटपइयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. जि.प.च्या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप व्हावे यासाठी जि.प.शिक्षण विभागाने सर्व शाळांना पंधरा दिवसांपूर्वीच पुस्तकांचा पुरवठा केला आहे.पालकांची लगबगमंगळवारपासून शाळा सुरू होणार असल्याने मागील तीन-चार दिवसांपासून पालक मंडळी तयारीला लागली आहे. मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी पुस्तके, दप्तर तसेच इतर गोष्टींची तयारी केली जात आहे. दोन महिन्याच्या सुटीनंतर शाळा सुरू होत असल्याने बच्चे कंपनीतही उत्साह आहे.