शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

झाडे जगविण्यासाठी निसर्ग मंडळाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 9:12 PM

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी भूजल पातळीत सुद्धा घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईच्या काळातही पर्यावरण संवर्धनासाठी निसर्ग मंडळाकडून झाडे जगविण्यासाठी धडपड केली जात आहे.

ठळक मुद्देराबविले स्वच्छता अभियान । झाडांनाही दिले पाणी

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी भूजल पातळीत सुद्धा घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईच्या काळातही पर्यावरण संवर्धनासाठी निसर्ग मंडळाकडून झाडे जगविण्यासाठी धडपड केली जात आहे. निसर्ग मंडळाने हलबीटोला नहराजवळील वनविभागाने लावलेल्या रोपट्यांना नजीकच्या नहरातून पाणी देवून जगविण्याचा प्रयत्न केला.पर्जन्यामानात दिवसेंदिवस घट होत असताना अत्यल्प पावसामुळे परिसरातील जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. पाणी मिळणे देखील अवघड झाले. अशा परिस्थितीत पाणी घालून झाडे जगविणे तर फारच कठीन काम आहे. परंतु पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी हार न मानता थेंब-थेंब पाण्याची बचत करुन लावलेली झाडे जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथील निसर्ग मंडळाने वनपरिक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांच्या पुढाकाराने २० युवकांचा गु्रप तयार केला आहे. गेल्या काही दिवसात या मंडळाने पर्यावरण संर्वधनाचे काम, वन्यप्राणी बचाव अभियान व स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी निसर्ग मंडळ लवकरच लोकवर्गणीतून टँकरची व्यवस्था करुन वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांना जगविण्याचा प्रयत्न करणार आहे.स्वच्छता अभियान मोहिमेला गतीपर्यावरण संवर्धनासह निसर्ग मंडळाने स्वच्छता मोहिमेला हातभार लावला आहे. गुरूवारी (दि.२) गतवर्षी वनविभागाने लावलेल्या अकराशे झाडांना पाणी देत रस्त्याच्या पलीकडे असलेल्या वडाच्या झाडाजवळील परिसराला स्वच्छ करण्यात आले. या वडाच्या झाडावर हजारो पक्ष्यांचे घरटे पहायला मिळाले. त्या झाडावर लवकरच पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात येणार आहे. या वेळी निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, सहसचिव दिलीप येळे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, प्रसिद्धी प्रमुख दिलीप चव्हाण, सदस्य डॉ. लोकेश तुरकर यांनी सहकार्य केले.वाटसरुही उतरले स्वच्छता अभियानात२ मे २०१९ रोजी निसर्ग मंडळाने हलबीटोला येथील वडाच्या झाडाच्या परिसरात स्वच्छता अभियानाला सुरुवात केली असता रस्त्याने जाणाऱ्या वाटसरुनांही आवरले आहे. त्यांनीही निसर्ग मंडळाच्या कार्यकर्त्यांना पाहून स्वत:ला स्वच्छता अभियानात सहभागी करुन घेतले.