शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

सर्वांगिण विकासासाठी राष्ट्रवादीच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 9:35 PM

झाशीनगर उपसा सिंचन योजना रखडली, भेल कारखाना पुर्णत्वास येऊ शकला नाही. नक्षलग्रस्त जिल्ह्याचा बीआरजीएफ योडनेचा निधी बंद केला जात आहे. साडे पाच हजार कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन झाले. मात्र अद्यापही अंदाजपत्रक तयार झाले नाहीत. भाजप सरकारच्या कोणत्याच हेडमध्ये पैसे नाहीत. त्यामुळे हे सरकार केवळ थापा देणारे आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : भरगच्च कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : झाशीनगर उपसा सिंचन योजना रखडली, भेल कारखाना पुर्णत्वास येऊ शकला नाही. नक्षलग्रस्त जिल्ह्याचा बीआरजीएफ योडनेचा निधी बंद केला जात आहे. साडे पाच हजार कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन झाले. मात्र अद्यापही अंदाजपत्रक तयार झाले नाहीत. भाजप सरकारच्या कोणत्याच हेडमध्ये पैसे नाहीत. त्यामुळे हे सरकार केवळ थापा देणारे आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.११) आयोजीत भरगच्च कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, डॉ. अविनाश काशिवार, प्रदेश प्रतिनिधी डॉ. मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजय शिवनकर, जिल्हा परिषद सदस्य भास्कर आत्राम, रमेश ताराम, प्रभाकर दोनोडे, कैलाश डोंगरे, शब्बीरभाई, राकेश लंजे आदि उपस्थित होते.पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, स्व.मनोहरभाई पटेल व माजी आमदार स्व.आडकुजी पाऊलझगडे यांनी या जिल्ह्याच्या विकासाची कास धरली होती. इटियाडोह धरण बांधून शेतकऱ्यांत हरितक्रांती आणली. १९५८ मध्ये गोंदिया एज्यूकेशन संस्थेची स्थापना करून जिल्ह्यात शैक्षणिक मुहूर्तमेढ रोवली. गोंदिया-भंडारा जिल्ह्याला सक्षम करावयाचे आहे. ही धुरा पेलण्यासाठी राष्ट्रवादीचे हात मजबूत करा. जिल्ह्याला सक्षम नेतृत्व नाही. लोकांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. धान उत्पादक शेतकºयांच्या मालाला भाव नाही. कर्जमाफीचे ढोंग केले. कर्जमाफी द्यायची होती तर सरसकट द्यायला पाहिजे होती. त्यात आॅनलाईनचे सोंग कशाला. बीआरजीएफचा निधी बंद करून या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे ५० कोटींचे नुकसान केले. एकीक डे हे सरकार हे देणार- ते देणार अशी मुक्ताफळे उधळते. तर दुसरीकडे या शासनाच्या कोणत्याच हेडमध्ये निधी नाही. भंडारा जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना तीन लाख २७ हजार रूपयांच्या औषधांचा पुरवठा केला गेला. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाट्याला किती आले. यावरून या सरकारची जनतेच्या आरोग्याप्रती आस्था किती आहे दिसून येते असे बोलून दाखविले. सुशिक्षीत बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. पकोडे विकणाºयालाही मोदी सरकार रोजगार म्हणतात. एवढे हे खोटारडे सरकर असल्याची आगपाखड खासदार पटेल यांनी भाषणातून केली. यावेळी खासदार कुकडे, पंचम बिसेन, शब्बीरभाई, विजय शिवनकर, यशवंत परशुरामकर, मनोहर चंद्रीकापुरे, किशोर तरोणे, सुशीला हलमारे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तावीक लोकपाल गहाणे यांनी मांडले. संचालन जे.के.काळसर्पे यांनी केले. अभार सुधीर साधवानी यांनी मानले.मेळाव्यासाठी नाजुका कुंभरे, भोजराम रहेले, बंडू भेंडारकर, नामदेव डोंगरवार, चित्रलेखा मिश्रा, योगेश नाकाडे, उद्धव मेहेंदळे, मनोहर शहारे, शालीक हातझाडे, राकेश जायस्वाल, माधुरी पिंपळकर, नितीन धोटे, तेजराम राऊत, विकास रामटेके, अजय पाऊलझगडे, नंदू चांदेवार, यशवंत गणवीर, सोनदास गणवीर, आर.के.जांभुळकर, जागेश्वर मडावी, कोमल जांभुळकर, रतिराम राणे, हिरालाल शेंडे, त्र्यंबक झोडे व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.लोकांच्या सुख-दुखात सहभागी व्हामेळाव्यात कार्यकर्त्यांना आवाहन करताना खासदार पटेल यांनी, लोकांची अनेक सुख-दुख आहेत. त्यांना सहकार्य करा. त्यांच्या पाठीशी उभे राहाल तरच पक्ष वाढेल. आता थांबू नका. पक्षाची बांधणी करून कामाला लागा असा सल्ला दिला. तर खासदार कुकडे यांच्याकडूनही त्यांनी जनतेच्या समस्यांच्या निकारणाची अपेक्षा व्यक्त केली.