शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

माय बापहो...लेकरं सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:34 IST

अजानत्या मिसरूड न फुटलेल्या वयात लाजलज्जा वेशीवर टांगून केलेल्या नको त्या कृत्यांचा परिणाम इतरांवर होतो. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देपालकांना संदेश : गांजा ओढणाऱ्या मुलांचे प्रकरण चर्चेत

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : अजानत्या मिसरूड न फुटलेल्या वयात लाजलज्जा वेशीवर टांगून केलेल्या नको त्या कृत्यांचा परिणाम इतरांवर होतो. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वाढली आहे. अशीच एक गंभीर व मनाला चटका लावणारीच नव्हे तर हादरविणारी घटना सोमवारी (दि.१९) उघडकीस आली. तालुक्यातील निमगाव येथे गांजा ओढणाऱ्या किशोरवयीन मुलांनी एका इसमाला मारहाण केली. सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.तालुक्यातील ग्राम निमगाव हे अवघे अडीच हजार लोकवस्तीचे खेडेगाव असून येथे घडलेला प्रताप हा मायबापांना निश्चितच अंतर्मुख करणारा आहे. सोमवारी दुपारी तीन किशोरवयीन मुलं गावातीलच मैदानावर बसली होती. एक चिमुकला त्यांच्यापाशी पोहोचला. त्याने जे दृश्य बघितले ते अत्यंत विदारक होते. याची वाच्यता त्याने एका ग्रामस्थाकडे केली व तो इसम त्यांच्याकडे गेला असता तिन्ही मुल गांजा पित बसली होती. यावर इसमाने त्यांना हटकले असता तिघे चक्क त्या इसमावर धावून गेले. त्या इसमाचे दोघांनी हात पकडून ठेवले व एका मुलाने इसमाच्या पोटावर बुक्यांनी मारले.सोमवारी निमगाव ग्रामपंचायतची ग्रामसभा होती व तो इसम तिथे पोहोचला. त्याने झालेला प्रकार गावच्या पोलीस पाटलांना सांगितला. त्यांनी याची सूचना पोलिसांत दिली. पोलिसांनी गांजासह तिघांनाही ठाण्यात आणले. मारहाण झालेला इसम तक्र ार नोंदविण्यासाठी ठाण्यात आला मात्र काय घडले काय ठाऊक तक्र ार न करताच तो परतला. ही माफी किशोरवयीन मुलांना दिलासा देणारी ठरली. मात्र दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या या पिढीला वेळीच आवर घालणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.तारु ण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या पाल्याचा पाय कदाचित वाकडा पडू शकतो. त्याचेही पाय अशा व्यसनाच्या आहारी गेलेल्यांपैकी एक असू शकते. घराघरात पोहचलेले चॅनल, इंटरनेट, आधुनिक मोबाईल, त्यावरून फिरणारे संदेश आदी बाबी कदाचित ही उद्याची पिढी बरबाद करण्यासाठी जबाबदार ठरू शकते. यात आपल्या पोटच्या गोळ््याचे भवितव्य गारद होऊ शकते. वारंवार कृती करून निर्ढावलेली कोवळी पोरं तारु ण्यात शौक भागविण्यासाठी वाटेल ते करतात हे चित्र आपण नेहमीच बघतो व हाच प्रकार निमगाव येथे बघायवयास मिळाला. तरूणाईच्या उंबरठ्यावर असलेल्या किशोरवयीन मुलांना आजच सावरणे गरजेचे आहे. त्यामुळे या भीषण वादळाची दिशा ओळखून बापहो ..... लेकरं सांभाळा असे म्हणावेसे वाटते.अंतर्मुख व्हा...सजग राहाज्यांना जन्म दिला ती चिल्ली-पिल्ली वाममार्गाला लागली आहेत, पण या संकटाचा अंदाज आपल्याला अजूनही कसा येत नाही ? मुलांना नामांकित, महागड्या शाळेत घातलं, त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण केल्या, पालकसभेला नियमित हजेरी लावली की बस्स संपलं. मात्र जागरूक पालक म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करण्यापलीकडेही मायबाप म्हणून आपल्याला खूप काही करायचं आहे. हा प्रश्न निमगावात घडलेल्या घटनेनंतर तुम्हांला छळू लागेल. यासाठी अंतर्मुख व्हा .... सजग राहा .......एवढाच संदेश देता येईल.पोलिसांनीही मनावर घेतले नाहीनिमगावच्या पोलीस पाटलांनी पोलिसांना बोलाविले. मार खाणाऱ्यानेही तक्र ार नोंदविली नाही. मात्र हा प्रश्न सुजाण युवापिढी घडविण्यासाठी घातक होता. तीन किशोरवयीन मुलांपैकी एक मुंबई, दुसरा चंद्रपूर व तिसरा निमगावचा होता. मुलांजवळ तर अगदी थोडासा गांजा मिळाला पण तो नेमका आला कुठून ? याची उकल त्या किशोरवयीन मुलांकडून करून घेणे गरजेचे होते. यासाठी पोलीस पाटलांची तक्र ार घेता येऊ शकली असती. अर्जुनी-मोरगाव शहरातही गांजा विकला जातो. यापासून पोलीस अनभिज्ञ नाही. पण अशा या युवापिढीला देशोधडीला लावणाऱ्या गैरकृत्यांवर पोलीस अंकुश का लावत नाही हा खरा आत्मचिंतनाचा विषय आहे. एका पत्रकाराने ठाणेदार महादेव तोंदले यांना यासंदर्भात विचारणा केली तेव्हा त्यांनी ही फेक न्यूज असल्याचे सांगितले. त्यावेळी ती तीन किशोरवयीन मुले व निमगावची प्रतिष्ठित मंडळी ठाण्यातच होती. खोटे बोलण्यामागील रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे.