शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाइल ॲप लावणार वाहन अपघातांना ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

गोंदिया : अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने वर्षाकाठी लाखो लोक मृत्यूमुखी पडतात. हे मृत्यू टाळण्यासाठी तसेच घडलेल्या अपघाताचे कारण, ...

गोंदिया : अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने वर्षाकाठी लाखो लोक मृत्यूमुखी पडतात. हे मृत्यू टाळण्यासाठी तसेच घडलेल्या अपघाताचे कारण, घटनास्थळावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना करून अपघातांना ब्रेक लावण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला. गोंदिया जिल्ह्यातही याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक अधिकारी व तीन कर्मचारी अशा ६४ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अपघात टाळण्यासाठी शोधून काढलेले हे ॲप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचा ठाणेदार हा ॲडमिन तर बाकीचे अधिकारी, कर्मचारी हे फिल्ड ऑफिसर म्हणून यामध्ये काम करण्यात आले आहे. ॲडमिनची एक युजर आयडी असते. तो त्या गाडीत किती अपघात घडले याची नोंद घेण्यात आली किंवा नाही हे स्वतः पाहत असतो. आतापर्यंत दहा लाइव्ह केसेस इंट्री करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली आहे.

..............................

६४ जणांना प्रशिक्षण

गोंदिया जिल्ह्यात १६ पोलीस ठाणी आहेत. आमगाव, सालेकसा, देवरी, चिचगड, डुग्गीपार, केशोरी, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा, गंगाझरी, दवनीवाडा, रावणवाडी, रामनगर, गोंदिया शहर व गोंदिया ग्रमीण अशा १६ पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक अधिकारी व तीन कर्मचारी अशा ६४ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

...........................

आतापर्यंत ९५ अपघातांची नोंद

-गोंदिया जिल्ह्यात सन २०२१ च्या सहा महिन्यांत ९५ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. ७२ लोक जखमी असल्याचे पुढे आले आहे. कोरोनामुळे संचारबंदी असली तरी देखील अपघाताची संख्या सहा महिन्यांत शेकडोंच्या घरात गेली आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१९ मध्ये २६५ अपघात घडले होते. यात १६० जणांचा मृत्यू झाला, तर ३२४ जण जखमी झाले होते. सन २०२० मध्ये २१८ अपघात झाले होते. यात १४० जणांचा मृत्यू झाला आहे. यात २३७ लोक जखमी झाले आहेत.

.......................

असा करणार अभ्यास

-मोबाइल ॲपवर एखाद्या अपघाताची नोंद झालेली नसेल तर त्याची नोंद फिल्ड ऑफिसर घेईल. अपघाताचे कारण काय आहे, त्यावर अभ्यास करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रात्री अपघात झाला तर त्या घटनास्थळावर लाइट होती किंवा नव्हती याचा अभ्यास केला जाणार आहे.

-वाहनांना समोरचे वाहन दिसले किंवा नाही. लाइट लावण्याची गरज आहे का, पुलावर अपघात घडला असेल तर त्या पुलावर कठडे होते किंवा नाही. कठडे लावण्याची गरज आहे का, तसेच घटनास्थळाचे लाइव्ह लोकेशन त्या घटनास्थळाचा अक्षांश आणि रेखांश या ॲपमधून दिसणार आहे. एकंदरीत अपघातावर आळा घालण्यासाठी हे ॲप मदत करणार आहे.

..........................................................

जिल्ह्यातील रस्ते अपघात

सन २०१९

रोड अपघात-२६५

जखमी -३२४

मृत्यू- १६०

.....

सन २०२०

रोड अपघात-२१८

जखमी -२३७

मृत्यू- १४०

.......

सन २०२१ जूनपर्यंत

रोड अपघात-९५

जखमी -७२

मृत्यू- ५४