शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

स्थलांतरीत मजुरांमुळे कोरोना दारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून देश ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. यामुळे देशभराततील उद्योगधंदे बंद पडले व याचा थेट फटका मजूर वर्गावर पडला. हाताला काम राहिले अशात मजुरांनी आपल्या घरची वाट धरली. प्रवासाची सुविधा नसल्याने मजुरांनी पायी प्रवास सुरू केला.

ठळक मुद्देतालुक्यात हजारो मजूर परतले । विलगीकरण कक्षात राहण्यास नकार

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ‘लॉकडाऊन’मुळे मोठ्या शहरांतून पायी प्रवास करीत आपल्या गावी परत येणाऱ्या स्थलांतरीत मजुरांनी गावातील विलगीकरण कक्षात न थांबता थेट घरातच मुक्काम केला आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे सुद्धा पालन ते करीत नसल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग दार ठोठावत असल्याची भीती निर्माण झाली आहे.देशात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून देश ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. यामुळे देशभराततील उद्योगधंदे बंद पडले व याचा थेट फटका मजूर वर्गावर पडला. हाताला काम राहिले अशात मजुरांनी आपल्या घरची वाट धरली. प्रवासाची सुविधा नसल्याने मजुरांनी पायी प्रवास सुरू केला. रस्त्यात एखादे वाहन मिळाले तर काही अंतर त्यातून तर कधी पायी चालत असे करीत त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला व आता आपल्या मूळ गावी पोहचू लागले आहेत. कित्येकांचा प्रवास सुरूच असून ते देखील पोहचतील. परंतु गावात पोहोचणारे मजूर गावाबाहेर विलगीकरण कक्षात न थांबता थेट आपल्या घरी दाखल होत आहेत.त्यातही ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन न करता घरातील लोकांमध्ये मिसळून राहत आहेत. त्यामुळे गावातील अन्य लोक मानसिकरित्या दहशतीत जगत आहेत. तालुक्यातील ग्राम बिंझली, कावराबांध, गोवारीटोला, बाम्हणटोला, पोवारीटोला, नवेगाव, बाम्हणी, सोनपुरी, पानगाव, मुंडीपार, रोंढा, निंबा, पिपरीया या व इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत मजूर गावात परतले आहेत. १-२ गावांत सरपंच व पोलीस पाटलांच्या सूचनेला मान देऊन काही जण विलगीकरण कक्षात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु ९० टक्के गावांमध्ये हे मजूर आपल्या मर्जीप्रमाणे वागत गावांमध्ये बिनधास्त फिरत आहेत.विलगीकरण कक्षात राहण्यासाठी अटीस्थलांतरीत मजुरांना जेव्हा विलगीकरण कक्षात राहण्यासाठी विनंती केली जाते तेव्हा ते राहण्यासाठी अटी-शर्ती मांडतात. दिवसातून ३ वेळा जेवण,चहा-नाश्ता, पाणी, साबण, ब्रश,पेस्ट व इतर दैनंदिन वस्तूंची पूर्तता नित्याने करावी तेव्हाच आम्ही विलगीकरण कक्षात राहू अशी अट मांडून आग्रह करणाºया सरपंच व पोलीस पाटलांना नि:शब्द करण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे, हे मजूर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, हैदराबाद आदि ‘रेड झोन’ मधील शहरांतून आल्याने हे धोकादायक आहे.

टॅग्स :Socialसामाजिक