शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

पारा गेला चाळीशी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:12 IST

एप्रिल महिन्यातच रविराज चांगलेच तळपू लागले आहेत. जिल्हयाचा पारा आता चाळीशीच्या पार गेला असून अवघ्या जिल्ह्यालाच भाजून सोडले आहे. या उन्हामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आतापासूनच दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देरस्त्यांवर शुकशुकाट : काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एप्रिल महिन्यातच रविराज चांगलेच तळपू लागले आहेत. जिल्हयाचा पारा आता चाळीशीच्या पार गेला असून अवघ्या जिल्ह्यालाच भाजून सोडले आहे. या उन्हामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आतापासूनच दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याचे दिसून येत आहे.एप्रिल महिन्यापासून उन्हाळा खऱ्या अर्थाने रंगात येतो असा आजवरचा अनुभव आहे. तर मे महिन्यात उन्हाळा भाजून सोडतो असे आतापर्यंत बघावयास मिळाले आहे. त्यामुळे नागरिक मे महिन्यात दुपारच्या वेळेत घराबाहेर निघण्याचे टाळत असून तेव्हाच रस्ते शुकशुकाट दिसतात. यंदा मात्र वातावरण चांगलेच बदलले असून यंदा एप्रिल महिन्यातच रविराज डोळे वटारून आपला रंग दाखवू लागले आहेत. यामुळेच आतापासूनच ४० डिग्रीच्यावर तापमानाची नोंद घेतली जात आहे. या उष्णलहरीमुळे शहरातील रस्ते आतापासूनच ओस पडत आहेत.जेमतेम एप्रिल महिन्याचा शेवट असताना उन्हाचा उद्रेक बघता येणाºया मे व जून महिन्यात काय कहर होणार याचा विचार करूनच अंगाला घाम फुटत आहे. यंदाच्या उन्हाने नागरिकांच्या अंगाची आतापासूनच लाही-लाही होत आहे. एवढेच नव्हे तर पंखे व कुलर आतापासूनच फेल ठरत आहेत. अवघ्या राज्याची ही स्थिती असून काय करावे असा सवाल सर्वांपुढे उभा आहे. मात्र घरात बसून कामे होणार नाहीत. यामुळे बांधून-बुंधून नागरिक घराबाहेर पडत आहेत. तरिही उन्हात निघणे टाळले जात असल्याची जाणीव रस्त्यांवरील शुकशुकाट करून देत आहे. विशेष म्हणजे, या उष्ण लहरीची दखल घेत आरोग्य विभागाने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पूर्वी मे महिन्यातील उन्हामुळे नागरिकांना त्रास जाणवत होता. यंदा मात्र उन्हाची तिरीप एवढी वाढली आहे की, मे महिन्यातील आग सुर्यदेव आताच ओकत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आतापासूनच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.तापमान मापकाची व्यवस्थाच नाहीकाही वर्षांपूर्वी येथील जुन्या तहसील कार्यालयात तापमान मापक यंत्र होते व तहसील कार्यालयातील संबंधीत कर्मचाºयांकडून तापमानाची नोंद दररोज मिळत होती. शिवाय तहसील कार्यालयात एक चार्ट लावले जात होते व त्यावर दररोजची नोंद केली जात होती. अशात कुणालाही तेथून तापमान कळत होते. आता मात्र मागील काही वर्षांपासून ही व्यवस्था फिस्कटली आहे. शिवाय सध्या तरी तहसील कार्यालयाकडे तशी काहीच व्यवस्था नसल्याचेही कळले. त्यामुळे आजघडीला फक्त बिरसी विमानतळ येथेच तापमान मापक यंत्र असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Temperatureतापमान