शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंसाठी धावले खालसा सेवा दल सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे.

ठळक मुद्देतीन हजार जणांच्या जेवणाची जबाबदारी : रूग्णालयातील गरजूंचा दिला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मुळे आज रूग्णालयात असलेल्या रूग्णांच्या नातेवाईक तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. मात्र या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी येथील खालसा सेवा दलने घेतली असून दररोज सुमारे तीन हजार जणांना जेवण वितरण करीत आहे. शहरातील दोन्ही शासकीय दवाखाने व म्युनिसिपल शाळेतील भिकाऱ्यांसोबतच शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांतील रूग्णांच्या नातेवाईकांना खालसा सेवा दलकडून जेवण पुरविले जात आहे.कोरोनाच्या कहरमुळे अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. याचा फटका बाहेरगावावरून आलेले तसेच शहरातील भिकारी मात्र उघड्यावर आले आहेत.सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे.याशिवाय शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांत असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना जेवण पुरविले जात आहे. विशेष म्हणजे, या सर्वांना दोन वेळचा चहा व बिस्किटेही दिले जात आहेत. यातील केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालय तसेच म्युनिसिपल शाळेतील भिकाºयांना जेवण देण्यासाठी खालसा सेवा दलची विशेष गाडी जात आहे. तर अन्य रूग्णालयांतील गरजूंना कार्यकर्ते पॅकेट पोहचवून देत आहेत. विशेष म्हणजे, एवढ्या सर्वांचे जेवण बनविणे तसेच पॅकेट बनविण्यासाठी आजघडीला सुमारे ७०-८० महिला-पुरूषांची टीम सेवा देत आहे. यामुळे दररोज तीन हजार गरजूंना मदत होत आहे.२४ सप्टेंबर २०१८ पासून सेवेतयेथील कंत्राटदार वजिंदरसिंग मान हे येथील केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालयात कामानिमित्त गेल्याने त्यांना दवाखान्यात रूग्णांचे नातेवाईक स्वयंपाक करताना दिसले. यावर त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करवून देण्याचा विचार मान यांच्या डोक्यात आला. याबाबत त्यांनी आपल्या आई व कुटुबीयांना सांगीतले. त्यांनी होकार देताच मान यांनी स्वत:ची एक गाडी जेवण पुरविण्यासाठी तयार करवून घेतली व खालसा सेवा दलच्या नावाने २४ सप्टेंबर २०१८ पासून ही सेवा शहरात सुरू झाली.रुग्णांसह अनेकांना होतेय मदतखालसा सेवा दलकडून केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालय, बस स्थानक व रेल्वे स्थानकावर लोकांना जेवण दिले जात होते. मात्र आता ‘लॉकडाऊन’मुळे अचानकच लोकांची संख्या वाढली असून दररोज सुमारे तीन हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. यामध्ये केटीएस, बीजीडब्ल्यूमधील सुमारे दोन हजार २०० जणांचा समावेश त्यांना गाडीने जेवण पोहचविले जात आहे. तर अन्य खासगी रूग्णालयातील सुमारे ८०० जणांना कार्यकर्ते दुचाकीने पॅकेट पोहचवित आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस