शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

गरजूंसाठी धावले खालसा सेवा दल सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे.

ठळक मुद्देतीन हजार जणांच्या जेवणाची जबाबदारी : रूग्णालयातील गरजूंचा दिला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मुळे आज रूग्णालयात असलेल्या रूग्णांच्या नातेवाईक तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. मात्र या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी येथील खालसा सेवा दलने घेतली असून दररोज सुमारे तीन हजार जणांना जेवण वितरण करीत आहे. शहरातील दोन्ही शासकीय दवाखाने व म्युनिसिपल शाळेतील भिकाऱ्यांसोबतच शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांतील रूग्णांच्या नातेवाईकांना खालसा सेवा दलकडून जेवण पुरविले जात आहे.कोरोनाच्या कहरमुळे अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. याचा फटका बाहेरगावावरून आलेले तसेच शहरातील भिकारी मात्र उघड्यावर आले आहेत.सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे.याशिवाय शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांत असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना जेवण पुरविले जात आहे. विशेष म्हणजे, या सर्वांना दोन वेळचा चहा व बिस्किटेही दिले जात आहेत. यातील केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालय तसेच म्युनिसिपल शाळेतील भिकाºयांना जेवण देण्यासाठी खालसा सेवा दलची विशेष गाडी जात आहे. तर अन्य रूग्णालयांतील गरजूंना कार्यकर्ते पॅकेट पोहचवून देत आहेत. विशेष म्हणजे, एवढ्या सर्वांचे जेवण बनविणे तसेच पॅकेट बनविण्यासाठी आजघडीला सुमारे ७०-८० महिला-पुरूषांची टीम सेवा देत आहे. यामुळे दररोज तीन हजार गरजूंना मदत होत आहे.२४ सप्टेंबर २०१८ पासून सेवेतयेथील कंत्राटदार वजिंदरसिंग मान हे येथील केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालयात कामानिमित्त गेल्याने त्यांना दवाखान्यात रूग्णांचे नातेवाईक स्वयंपाक करताना दिसले. यावर त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करवून देण्याचा विचार मान यांच्या डोक्यात आला. याबाबत त्यांनी आपल्या आई व कुटुबीयांना सांगीतले. त्यांनी होकार देताच मान यांनी स्वत:ची एक गाडी जेवण पुरविण्यासाठी तयार करवून घेतली व खालसा सेवा दलच्या नावाने २४ सप्टेंबर २०१८ पासून ही सेवा शहरात सुरू झाली.रुग्णांसह अनेकांना होतेय मदतखालसा सेवा दलकडून केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालय, बस स्थानक व रेल्वे स्थानकावर लोकांना जेवण दिले जात होते. मात्र आता ‘लॉकडाऊन’मुळे अचानकच लोकांची संख्या वाढली असून दररोज सुमारे तीन हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. यामध्ये केटीएस, बीजीडब्ल्यूमधील सुमारे दोन हजार २०० जणांचा समावेश त्यांना गाडीने जेवण पोहचविले जात आहे. तर अन्य खासगी रूग्णालयातील सुमारे ८०० जणांना कार्यकर्ते दुचाकीने पॅकेट पोहचवित आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस