शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाणीपुरवठ्याची अनेक कामे अपूर्ण; हर घर जल नळयोजना ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:47 IST

Gondia : विभागाकडून मात्र योजनेचा निव्वळ गाजावाजा

लोकमत न्यूज नेटवर्क मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यात जलजीवन मिशनचा मोठा गाजावाजा करून योजना सुरू करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अनेक योजना अजूनही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. या तालुक्यात दोन कंत्राटदारांनी अनेक कामे घेतली आहेत. निधी मिळत नसल्याने या कंत्राटदारांनीही कामे अर्धवट ठेवली आहेत. दरम्यान, अर्धवट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

१५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल या योजनेची घोषणा केली. २०२४पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन देण्यात आले. जलजीवन योजनेची प्रभावी अंमलबजावणीकरिता पंतप्रधानांनी देशातील सर्वच सरपंचांना पत्र पाठविले. योजनेत सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रत्येक व्यक्तीमागे ५५ लिटर पाणी देता येईल, असे नियोजन या योजनेत करावयाचे होते.

लोकसंख्येनुसार तेवढ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करावयाचे होते. जिल्ह्यात जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या योजनेचा मोठा गाजावाजा केला. मात्र, अनेक ठिकाणी या योजनेच्या कामातील अनियमिता पुढे आली. या विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे गावकऱ्यांना अजूनही 'हर घर नल से जल' योजनेचे पाणी मिळाले नाही.

निधी मिळत नसल्याने कामे ठप्प केवळ तिरोडा तालुक्यातच नव्हे, संपूर्ण जिल्ह्यात निधीअभावी जलजीवनची अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत कंत्राटदार काहीच बोलत नाहीत. निधी मिळत नसल्याने सध्या ही कामे अपूर्ण असल्याची माहिती आहे.

माहिती देण्यास टाळाटाळमहाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन ही योजना सुरू केली. त्यात प्रत्येक घरी नळ व शुद्ध पिण्याचे पाण्याची योजना आखली आहे. तिरोडा तालुक्यात किती कोटी रकमेची कामे मंजूर आहेत. किती कामे पूर्ण झाली आहेत. किती कामे अपूर्ण आहेत. याची कनिष्ठ अभियंता यांना विचारणा करण्यासाठी त्यांच्या मोबाइ- लवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :water transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाईgondiya-acगोंदिया