शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

मनोहरभाई पटेल हायस्कूलची अनुश्री जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:06 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागात जिल्हा दुसऱ्या स्थानी । मागील वर्षीच्या तुुलनेत टक्केवारीत घट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. देवरी येथील मनोहरभाई पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी अनुश्री हेमंतकुमार भेंडारकर हिने ९५.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर आमगाव येथील आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी साहिल गुंजन बोपचे याने ९५.४० टक्के गुण घेवून व्दितीय, आमगाव तालुक्यातील ठाणा येथील संत जैरामदास विद्यालयाची रुपाली भूमेश्वर गिरीपुंजे हिने ९४.८० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक तर अर्जुनी मोरगाव येथील जीएमबी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी कल्याणी सोनवाने हिने ९४.६८ टक्के गुण घेवून चतुर्थ क्रमांक पटकाविला.मागील वर्षी दहावी परीक्षेच्या निकालात गोंदिया जिल्हा विभागात प्रथम स्थानी होता. तर यंदा जिल्ह्याची दुसºया स्थानी घसरण झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली असून बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून ७४.१३ टक्के मुली उर्तीण झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण २१ हजार ५७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ हजार ४१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६६४० विद्यार्थी तर ७७७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. २६६० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उर्तीण झाले. प्रथम श्रेणीत ६७९३ तर व्दितीय श्रेणीत ४५४७ विद्यार्थी उत्तीण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ६८.४६ टक्के लागला.मात्र मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकालात १९.०९ टक्क्यांनी घट झाली आहे.विशेष म्हणजे मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ४३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. मात्र यंदा केवळ १४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.देवरी येथील मनोहरभाई पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी अनुश्री हेमंतकुमार भेंडारकर हिने ९५.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर आमगाव येथील आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी साहिल गुंजन बोपचे याने ९५.४० टक्के गुण घेवून व्दितीय तर आमगाव तालुक्यातील ठाणा येथील संत जैरामदास विद्यालयाची रुपाली भूमेश्वर गिरीपुंजे हिने ९४.८० टक्के गुण घेवून तृतीय तर अर्जुनी मोरगाव येथील जीएमबी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनीनी कल्याणी सोनवाने हिने ९४.६८ टक्के गुण घेवून चतुर्थ क्रमांक पटकाविला. गुजराती नॅशनल हायस्कूलची विद्यार्थी ९४ टक्के गुण प्राप्त केले तर विवेक मंदिर विद्यालयाची लिपाक्षी जैन कुंभलवार हिने ९३.४० टक्के, रविंद्रनाथ टॅगोर हायस्कूलची साक्षी अग्रवाल हिने ९२ टक्के गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे निकालाची टक्केवारी पाहता शहरीभागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे आहेत.दहावीतही सावित्रीच्या लेकीच सरसपंधरा दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची उर्तीण होण्याची टक्केवारी अधिक होती. तिच पंरपरा दहावीच्या निकालात सुध्दा कायम आहे. दहावीच्या परीक्षेत ६६४० विद्यार्थी तर ७७७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उर्तीण होण्याची टक्केवारी ही ६२.८४ टक्के तर मुलींच्या उर्तीण होण्याची टक्केवारी ७४.१३ टक्के आहे.त्यामुळे दहावीच्या परीक्षेतही सावित्रीच्या लेकीच सरस ठरल्या.निकाल घसरला मात्र टक्केवारी सुधारलीमागील वर्षी गोंदिया जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.५५ टक्के लागला होता. मात्र यंदा जिल्ह्याच्या निकालात १९.०९ टक्क्यांनी घट झाली आहे. निकालाची टक्केवारी जरी घटली असली तरी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीत मात्र सुधारणा झाली आहे. २६६० विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेवून उर्तीण झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.केवळ १४ शाळांनी गाठली शंभरीदहावीच्या निकालात यंदा आदिवासी बहुल देवरी तालुक्यांने आघाडी घेतली आहे. देवरी येथील मनोहरभाई पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी अनुश्री भेंडारकर हिने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.मात्र यंदा जिल्ह्यातील केवळ १४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.तर मागील वर्षी ४३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत शंभर टक्के निकाल देणाºया शाळेच्या संख्येत घट झाली असून ही बाब शाळांसाठी चिंतनाची आहे.सीबीएसई शाळा बोर्डाच्या परीक्षेत माघारल्यासीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सीबीएसई शाळांनी शंभर टक्के निकाल दिला होता. तसेच बारावी सीबीएसई परीक्षेत सुध्दा चांगला निकाल दिला होता. मात्र या शाळांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात शंभर टक्के निकाल देण्यात यश आले नाही. त्यामुळे या सीबीएसई शाळा दहावी बोर्डाच्या निकालात माघारल्याचे चित्र आहे.आता पालकांचे लक्ष मिशन अ‍ॅडमिशनकडेदहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या पाल्याला त्याच्या आवडत्या शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड सुरू होते. त्यामुळे निकालानंतर आता पालक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. सोमवारपासून विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची गर्दी दिसणार आहे.निकालात सालेकसा तालुका आघाडीवरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या तालुकानिहाय निकालावर नजर टाकल्यास यात सालेकसा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. या तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ७२.२३ टक्के लागला. तर गोंदिया ६९.७६, आमगाव ६९.६४, अर्जुनी मोरगाव ६७.४३, देवरी ६१.४५ टक्के, गोरेगाव ६६.१५, सडक अर्जुनी ६८.४३, तिरोडा ६९.९६ टक्के लागला. मागील वर्षी दहावीच्या निकालात सालेकसा तालुका जिल्ह्यात दुसºया स्थानी होता. यंदा त्यात सुधारणा झाली असून प्रथम स्थान पटकाविले आहे. आदिवासी बहुल आणि दुर्गम भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल