शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

गोंदियातही होवू शकते मलाडची पुनर्रावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्या मालकांना नोटीस पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळा आला की जीर्ण इमारतींचा प्रश्न पुढे येतो.

ठळक मुद्देशहरातील १६८ इमारती धोकादायक : नोटीस देऊन नगर परिषद मोकळी : वेळीच कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आठवडाभरापूर्वीच मलाड येथील जीर्ण इमारत कोसळून पाच जणांचा जीव गेला तर अनेक जण जखमी झाले. जीर्ण झालेल्या इमारती वेळीच पाडण्याची कारवाई स्थानिक प्रशासनाकडून केली जात नसल्यानेच अशा घटना घडत आहे. गोंदिया शहरात सुध्दा १६८ जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नगर परिषदेने अद्यापही याची दखल घेतली नसल्याने गोंदियातही मलाडच्या घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्या मालकांना नोटीस पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळा आला की जीर्ण इमारतींचा प्रश्न पुढे येतो. जीर्ण इमारतीं संदर्भात ओरड वाढल्यानंतर नगर परिषद इमारत मालकांना नोटीस देऊन मोकळी होते. पण अद्यापही एकही जीर्ण झालेली इमारत नगर परिषदेने धडक कारवाई करीत पाडल्याचे ऐकिवात नाही.दोन दिवसांपूर्वीच शहरातील दुर्गा चौक परिसरातील एक जीर्ण इमारत कोसळली. सुदैवाने यात कुठलेही जिवित हानी झाली नाही. शहरात अशा अनेक जीर्ण इमारती असून त्याची नोंद सुध्दा नगर परिषदेकडे आहे. पण कारवाई करण्यासाठी कुचराई केली जात आहे. पावसाळ््यात माती तसेच जुन्या जीर्ण झालेल्या इमारती पडण्याच्या घटना घडतात. मलाड येथे नुकताच हा प्रकार घडला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच प्राण हानीही झाली आहे. जीवापेक्षा जास्त किंमती वस्तू दुसरी नाही. मात्र घर पडल्यानंतर अवघे कुटुंबच उघड्यावर येते. अशात पावसाळ््यात अशा घरांमध्ये राहणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचाच प्रकार असतो.जिल्ह्यात यंदा संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची अंशत: व पूर्णत: पडझड झाली आहे. पावसाळ््यात निर्माण होणाऱ्या या धोक्याची कल्पना लक्षात घेत नगर परिषदेने नगर रचना विभागामार्फत शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करवून घेतले. यात १६८ इमारती जीर्ण आढळून आल्या आहेत. या इमारत मालकांना नगर परिषदेने नोटीस बजावली. यातील काही इमारती जीर्ण व धोकादायक आहेत. काही वास्तव्यासाठी अयोग्य असून निष्काशीत करावयाच्या आहेत. काहींना दुरूस्तीची गरज असल्याचे दिसून आले आहे. मात्र संबंधितांना नगर परिषदेच्या नोटीस नंतरही त्यावर काहीच पावले उचललेली दिसत नाही.जीर्ण इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट नाहीशहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून कायम आहे. पण अद्यापही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्या इमारती पाडण्याची कारवाई करण्यात आली. तर बऱ्याच जीर्ण झालेल्या इमारती या बड्या व्यक्तींच्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेकडून कुचराई केली जात आहे.अन्यथा अप्रिय घटनेची शक्यतामलाड येथे घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अशात नगर परिषदेने शहरातील जीर्ण इमारतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. दरवर्षी नगर परिषद सर्वेक्षण करते व त्या पलीकडे काहीच होत नाही.आता मात्र मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी वेळीच कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा मलाडच्या घटनेची पुनर्रावृत्ती येते टाळता येणार नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका