शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गोंदियातही होवू शकते मलाडची पुनर्रावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्या मालकांना नोटीस पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळा आला की जीर्ण इमारतींचा प्रश्न पुढे येतो.

ठळक मुद्देशहरातील १६८ इमारती धोकादायक : नोटीस देऊन नगर परिषद मोकळी : वेळीच कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आठवडाभरापूर्वीच मलाड येथील जीर्ण इमारत कोसळून पाच जणांचा जीव गेला तर अनेक जण जखमी झाले. जीर्ण झालेल्या इमारती वेळीच पाडण्याची कारवाई स्थानिक प्रशासनाकडून केली जात नसल्यानेच अशा घटना घडत आहे. गोंदिया शहरात सुध्दा १६८ जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नगर परिषदेने अद्यापही याची दखल घेतली नसल्याने गोंदियातही मलाडच्या घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्या मालकांना नोटीस पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळा आला की जीर्ण इमारतींचा प्रश्न पुढे येतो. जीर्ण इमारतीं संदर्भात ओरड वाढल्यानंतर नगर परिषद इमारत मालकांना नोटीस देऊन मोकळी होते. पण अद्यापही एकही जीर्ण झालेली इमारत नगर परिषदेने धडक कारवाई करीत पाडल्याचे ऐकिवात नाही.दोन दिवसांपूर्वीच शहरातील दुर्गा चौक परिसरातील एक जीर्ण इमारत कोसळली. सुदैवाने यात कुठलेही जिवित हानी झाली नाही. शहरात अशा अनेक जीर्ण इमारती असून त्याची नोंद सुध्दा नगर परिषदेकडे आहे. पण कारवाई करण्यासाठी कुचराई केली जात आहे. पावसाळ््यात माती तसेच जुन्या जीर्ण झालेल्या इमारती पडण्याच्या घटना घडतात. मलाड येथे नुकताच हा प्रकार घडला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच प्राण हानीही झाली आहे. जीवापेक्षा जास्त किंमती वस्तू दुसरी नाही. मात्र घर पडल्यानंतर अवघे कुटुंबच उघड्यावर येते. अशात पावसाळ््यात अशा घरांमध्ये राहणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचाच प्रकार असतो.जिल्ह्यात यंदा संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची अंशत: व पूर्णत: पडझड झाली आहे. पावसाळ््यात निर्माण होणाऱ्या या धोक्याची कल्पना लक्षात घेत नगर परिषदेने नगर रचना विभागामार्फत शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करवून घेतले. यात १६८ इमारती जीर्ण आढळून आल्या आहेत. या इमारत मालकांना नगर परिषदेने नोटीस बजावली. यातील काही इमारती जीर्ण व धोकादायक आहेत. काही वास्तव्यासाठी अयोग्य असून निष्काशीत करावयाच्या आहेत. काहींना दुरूस्तीची गरज असल्याचे दिसून आले आहे. मात्र संबंधितांना नगर परिषदेच्या नोटीस नंतरही त्यावर काहीच पावले उचललेली दिसत नाही.जीर्ण इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट नाहीशहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून कायम आहे. पण अद्यापही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्या इमारती पाडण्याची कारवाई करण्यात आली. तर बऱ्याच जीर्ण झालेल्या इमारती या बड्या व्यक्तींच्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेकडून कुचराई केली जात आहे.अन्यथा अप्रिय घटनेची शक्यतामलाड येथे घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अशात नगर परिषदेने शहरातील जीर्ण इमारतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. दरवर्षी नगर परिषद सर्वेक्षण करते व त्या पलीकडे काहीच होत नाही.आता मात्र मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी वेळीच कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा मलाडच्या घटनेची पुनर्रावृत्ती येते टाळता येणार नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका