शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गोंदियातही होवू शकते मलाडची पुनर्रावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्या मालकांना नोटीस पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळा आला की जीर्ण इमारतींचा प्रश्न पुढे येतो.

ठळक मुद्देशहरातील १६८ इमारती धोकादायक : नोटीस देऊन नगर परिषद मोकळी : वेळीच कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आठवडाभरापूर्वीच मलाड येथील जीर्ण इमारत कोसळून पाच जणांचा जीव गेला तर अनेक जण जखमी झाले. जीर्ण झालेल्या इमारती वेळीच पाडण्याची कारवाई स्थानिक प्रशासनाकडून केली जात नसल्यानेच अशा घटना घडत आहे. गोंदिया शहरात सुध्दा १६८ जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नगर परिषदेने अद्यापही याची दखल घेतली नसल्याने गोंदियातही मलाडच्या घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्या मालकांना नोटीस पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळा आला की जीर्ण इमारतींचा प्रश्न पुढे येतो. जीर्ण इमारतीं संदर्भात ओरड वाढल्यानंतर नगर परिषद इमारत मालकांना नोटीस देऊन मोकळी होते. पण अद्यापही एकही जीर्ण झालेली इमारत नगर परिषदेने धडक कारवाई करीत पाडल्याचे ऐकिवात नाही.दोन दिवसांपूर्वीच शहरातील दुर्गा चौक परिसरातील एक जीर्ण इमारत कोसळली. सुदैवाने यात कुठलेही जिवित हानी झाली नाही. शहरात अशा अनेक जीर्ण इमारती असून त्याची नोंद सुध्दा नगर परिषदेकडे आहे. पण कारवाई करण्यासाठी कुचराई केली जात आहे. पावसाळ््यात माती तसेच जुन्या जीर्ण झालेल्या इमारती पडण्याच्या घटना घडतात. मलाड येथे नुकताच हा प्रकार घडला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच प्राण हानीही झाली आहे. जीवापेक्षा जास्त किंमती वस्तू दुसरी नाही. मात्र घर पडल्यानंतर अवघे कुटुंबच उघड्यावर येते. अशात पावसाळ््यात अशा घरांमध्ये राहणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचाच प्रकार असतो.जिल्ह्यात यंदा संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची अंशत: व पूर्णत: पडझड झाली आहे. पावसाळ््यात निर्माण होणाऱ्या या धोक्याची कल्पना लक्षात घेत नगर परिषदेने नगर रचना विभागामार्फत शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करवून घेतले. यात १६८ इमारती जीर्ण आढळून आल्या आहेत. या इमारत मालकांना नगर परिषदेने नोटीस बजावली. यातील काही इमारती जीर्ण व धोकादायक आहेत. काही वास्तव्यासाठी अयोग्य असून निष्काशीत करावयाच्या आहेत. काहींना दुरूस्तीची गरज असल्याचे दिसून आले आहे. मात्र संबंधितांना नगर परिषदेच्या नोटीस नंतरही त्यावर काहीच पावले उचललेली दिसत नाही.जीर्ण इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट नाहीशहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून कायम आहे. पण अद्यापही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्या इमारती पाडण्याची कारवाई करण्यात आली. तर बऱ्याच जीर्ण झालेल्या इमारती या बड्या व्यक्तींच्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेकडून कुचराई केली जात आहे.अन्यथा अप्रिय घटनेची शक्यतामलाड येथे घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अशात नगर परिषदेने शहरातील जीर्ण इमारतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. दरवर्षी नगर परिषद सर्वेक्षण करते व त्या पलीकडे काहीच होत नाही.आता मात्र मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी वेळीच कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा मलाडच्या घटनेची पुनर्रावृत्ती येते टाळता येणार नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका