शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गणरायांच्या निर्माल्याने माखली जलाशये

By admin | Updated: September 9, 2014 00:27 IST

मागील १० दिवसांपासून विराजलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी गोंदियासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांसह हजारोंच्या संख्येत घरगुती

कपिल केकत - गोंदियामागील १० दिवसांपासून विराजलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी गोंदियासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांसह हजारोंच्या संख्येत घरगुती गणेशोत्सव साजरा केला जाते. सोमवारी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सर्वांनीच गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी ठिकठिकाणच्या जलाशयांवर (बोडी) गर्दी केली होती. यावेळी मुर्त्यांसह १० दिवसांचे निर्माल्यही पाण्यात विसर्जित करण्यात आले. यामुळे नदी व तलावांचे काठ निर्माल्याने माखून गेल्याचे चित्र दिसून आले. या प्रकारामुळे पाणी प्रदूषित होत असून याचे मानवासह पशुंवरही दुष्परिणाम जाणवणार आहेत. यावर सामाजिक संस्था किंवा पर्यावरणप्रेमी संस्थांनी पुढाकार घेत जागृती करून हा धोका टाळण्याची गरज होती. परंतू या संस्थांकडून अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे निर्माल्याचा सदुपयोग करणे अशक्य होण्यासोबतच परिसरात दुर्गंधी सुटली आहे.गणरायाला आवडणारे दुर्वांकुर, पूजेचे साहित्य, नैवेद्य, हार, फुलं आदी साहित्याचा निर्माल्यात समावेश होतो. निर्माल्य पायदळी येऊ नये किंवा रस्ते व नाल्यांत टाकू नये, त्यांना पाण्यात विसर्जित करावे अशी परंपराच चालत आहे. ही परंपरा आजही चालत असून गणरायाच्या मुर्तीसह मोठ्या प्रमाणात निर्माल्यही नदी व तलावांत विसर्जीत केले जात आहे. शनिवारपासूनच शहरात गणपती विसर्जनाला सुरूवात झाली आहे. गोंदियात मुर्ती विसर्जनासाठी नागरिकांची छोटा गोंदिया, पांगोळी नदी, देव तलाव, नाग तलाव (साई मंदीर), सिव्हील लाईन बोडी, सरकारी तलाव, रजेगाव बाघ नदी, खमारी येथे गर्दी असते. एकट्या शहर व लगतच्या ग्रामीण भागातील हजारोंच्या संख्येत सार्वजनिक मोठ्या व खाजगी लहान-लहान मूर्त्यांचे विसर्जन केले जाते. गणरायाला निरोप देताना १० दिवसांत गोळा झालेले निर्माल्यही सोबत विसर्जीत केले जाते. अगोदरच मुर्त्यांच्या माती व रंगापासून पाणी दूषीत होते. त्यात या प्रकारामुळे अधिकची भर पडते. निर्माल्यातील साहित्य पाण्यात कुजून पाणी प्रदूषणास हातभार लागतो. यातूनच पाण्याला व परिसरात दुर्गंधी सुटते.निर्माल्यप्रती हिंदू धर्मीयांची आस्था असणे स्वाभाविक आहे. मात्र हे निर्माल्य पाण्यात न घालता एका ठिकाणी जमिनीत खड्डा करून गोळा करून त्यातून खत निर्मिती करता येते. हे खत शेतात किंवा घरातील बाग व कुंड्यांसाठी उपयोगी आणले जाऊ शकते. असे केल्यास भावनाही दुखावणार नाहीत व निर्माल्याचा सदुपयोग होऊ शकतो. सर्वसामान्य माणूस मात्र याकडे कानाडोळा करतो व माझ्या एकट्याच्या निर्माल्याने तलाव दूषीत होणार नाही, असा विचार करून निर्माल्य विसर्जीत करून मोकळा होतो.