शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

करा एकच निर्धार, आयुष्यात नको क्षयाचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 10:44 IST

गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ११८५ क्षय रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने मुलांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे.

ठळक मुद्दे गोंदिया जिल्ह्यात ११८५ क्षयरोगाचे रूग्ण

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: क्षयरोग आणि कोरोना विषाणू हा फुफ्फसावर अनिष्ट परिणाम करीत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी क्षयरूग्णांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिल्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११८५ क्षय रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने मुलांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस (टीबी) नावाच्या जीवाणूमुळे होणारा आजार आहे. हा मुख्यत्वे फुफ्फसाचा आजार असून रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व कुपोषित व्यक्तींना होण्याची जास्त शक्यता असते.कोरोना व क्षयरोगएक क्षयरोगी १० ते १५ व्यक्तीपर्यंत हा आजार पसरवू शकतो. आजार होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. जगभरात कहर करणारा कोरोना साथरोग व एड्ससारखे मोठे आजार थांबविण्यासाठी रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. क्षयरोगाचा सांसर्गिक रूग्ण ज्याने परिणामकारक व संपूर्ण उपचार घेतला नाही,अशांसाठी जीवाणूचा स्त्रोत ठरतो.असा होतो क्षयरोगज्यावेळी क्षयरोगाचा जीवाणू श्वासावाटे फुफ्फसात प्रवेश करतो. काही दिवसांनी लक्षणे दिसल्यास त्याला फुफ्फसाचा क्षयरोग म्हणतात. काही रूग्णांमध्ये या जीवाणूंचा मेंदू मूत्रपिंड हाडे त्वचेपर्यंत प्रसार होऊ शकतो. मुले व एचआयव्हीग्रस्तांना क्षयरोग हा अत्यंत गंभीर ठरतो. क्षयरोगाचा संसर्गजन्य असून खोकणे व थुंकीदिवारे जीवाणू बाहेर टाकतो. हे जिवाणू हवेमध्ये पसरतात.काही काळ जिवंत राहून निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिली.क्षयरोग दुरूस्ती ९० टक्केराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्र मांतर्गत तपासणी व इतर आधुनिक चाचण्यांद्वारे क्षयाचे निदान झाल्यानंतर औषधी पॅकमध्ये दिली जाते. याचा उपचार आरोग्य सेवकाच्या देखरेखीखाली केला जातो. नियमित औषधे घेतल्यानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे.क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.देशात दररोज पाच हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोग होतो. दररोज एक हजार व्यक्ती क्षयरोगाने मृत्यूमुखी पडतात.डॉट्स उपचार, टीबीपासून मुक्तीकडेसंशयीत व दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला असणाºया व्यक्तींची थुंकी सुक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून आजाराचे निदान केले जाते. काही रूग्णांमध्ये क्ष-किरण तपासणी, प्रयोगशाळेत तपासणी व इतर आधुनिक चाचणीद्वारे करता येते. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत मुलांना व प्रौढ व्यक्तींना रूग्णनिहाय औषधी पॅकमध्ये उपलब्ध आहे. क्षयरोगाचा उपचार हा वेगवेगळ्या श्रेणीत उपलब्ध आहे. क्षयरोगाचा उपचार आरोग्य कार्यकर्त्यांच्या समक्ष देखरेखीखाली केला जातो. त्याला डॉट्स पद्धत म्हटले जाते.क्षयरोगाची लक्षणेदोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, वजन कमी होणे, छातीत दुखने, दम लागणे, ताप येणे विशेषत: रात्री, भूक कमी लागणे, खोकतांना थुंकी वाटे रक्त पडणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.क्षयरोग झालेल्या किंवा क्षयरोगाचे निदान झालेल्या रूग्णांना कोरोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हायरिक्समध्ये येणाºया रूग्णांचे उपचाराकडे आरोग्य प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांची तपासणी सुरू आहे._ डॉ.रा.ज.पराडकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Healthआरोग्य