शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण...'; पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 15:56 IST

पोलीस मुख्यालय मैदान कारंजा गोंदिया येथे आयोजित 76 व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

गोंदिया - 'समृद्ध भारत-विकसित भारत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत व तसा संकल्पही त्यांनी केला आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सदैव प्रयत्नशील आहे. पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण योगदान देईल. आपला महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने देशात अव्वल व गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल राहील यासाठी कटिबद्ध होऊया', असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

प्रजासत्ताक दिनी आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस मुख्यालय मैदान कारंजा गोंदिया येथे आयोजित 76 व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

१०० दिवसांत १०० गोदाम उभारणार

'सहकार विभागामार्फत राज्यातील 12 हजार प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार असून गोंदिया जिल्ह्यातील 121 सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. केंद्र पुरस्कृत जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 300 ते 1000 मे.टन क्षमतेचे गोदाम उभारणीबाबत कार्यवाही सुरु असून या योजनेअंतर्गत पुढील 100 दिवसात 100 गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे', असे ते म्हणाले. 

ऑनलाईन सुविधांसाठी कार्यवाही सुरू

'गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कनेरी 1500 मे.टन, डोंगरगाव 500 मे.टन व गोठणगाव 500 मे.टन क्षमता असलेल्या या तीन संस्थांना मंजूरी देण्यात आलेली असून गोदामाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. पुढील 100 दिवसात सहकार विभागाअंतर्गत विविध सुविधा ऑनलाईन करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरविण्याकरीता 79 सेवा सहकारी संस्थांकडे सी.एस.सी. सेंटरचे कामकाज प्रत्यक्षात सुरु झालेले आहे', असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

अॅग्रीस्टॅक संकल्पना राबवणार

'शेतकऱ्यांना अधिक समृध्द आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच, हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मीती म्हणजेच ‘ॲग्रीस्टॅक’ या संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरु झाली आहे. ॲग्रीस्टॅक ही एक अशी क्रांतीकारक संकल्पना आहे जी शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते. यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते', असेही ते म्हणाले.

'जिल्हा पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त परिसरात विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी पूर्ण करण्याच्या उद्देशाने ‘पोलीस दादालोरा खिडकी’ योजनेंतर्गत एक हात मदतीचा हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत 38 उपक्रमांतर्गत 9 हजार 145 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये एकूण 255 कोटी 48 लाख निधी खर्च झालेला असून त्यामधून 65 लाख 85 हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झालेली आहे. 1 लाख 81 हजार 878 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे', असे त्यांनी सांगितले.

यावेळी भारत सरकारच्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 तसेच ई-सिगारेट बंदीबाबतच्या 18 सप्टेंबर 2019 च्या अध्यादेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता आज प्रजासत्ताक दिनानिमीत्त तंबाखु मुक्तीची सामुहिक शपथ घेण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी