शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

Maharashtra Election 2019 ; नितीन गडकरींनी मोबाईलवरुन केले सभेला संबोधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

खराब वातावरणामुळे नियोजीत दौरा रद्द झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, जगात भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास हाच एक महत्वाचा मुद्या ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जी विकासाची कास धरली आहे, ती कायम राहण्यासाठी भाजप उमेदवारांना साथ द्या असे सांगितले.

ठळक मुद्देखराब वातावरणामुळे दौरा रद्द : विकासाला साथ देण्याची घातली साद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप-सेना युतीचे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी (दि.१८) येथील सर्कस मैदानावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र खराब वातावरणामुळे नागपूर येथून हेलिकाप्टरचे उड्डाण होऊ शकले नाही. त्यामुळे गडकरींना आपला नियोजित दौरा रद्द करावा लागला. मात्र सर्कस मैदानावर सभेला उपस्थित असलेल्या जनतेचा हिरमोढ होऊ नये यासाठी त्यांनी मोबाईलवरुन सभेला संबोधित केले.मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी साथ देण्यास सांगितले.सभेला प्रामुख्याने मध्यप्रदेशचे माजी कृषीमंत्री आ.गौरीशंकर बिसेन, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,उमेदवार गोपालदास अग्रवाल, आ.रामिकशोर कावरे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ.खोमेश रहांगडाले, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा भावना कदम, जि.प.चे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, पंकज यादव, रिपाई जिल्हाध्यक्ष राजेश रामटेके, दिनेश दादरीवाल, संजय कुळकर्णी, नंदकुमार बिसेन, अशोक चौधरी, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, सभापती रमेश अंंबुले, राजकुमार नोतानी, गणेश हेमणे, संतोष चव्हाण, डॉ. प्रशांत कटरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खराब वातावरणामुळे गडकरी यांचा नियोजित दौरा रद्द झाल्याने त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या मोबाईलवर कॉल केला. यानंतर पटले यांनी मोबाईल माईकला लावला. गडकरी यांनी पाच ते दहा मिनिटे मोबाईलवरुन सभेला संबोधित केले. खराब वातावरणामुळे नियोजीत दौरा रद्द झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, जगात भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास हाच एक महत्वाचा मुद्या ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जी विकासाची कास धरली आहे, ती कायम राहण्यासाठी भाजप उमेदवारांना साथ द्या असे सांगितले. गोपालदास अग्रवाल हे एक विकासाचे व्हिजन असलेले त्यांचे व्यक्तिमत्व आहे. भारतीय जनता पक्षाचे व्हिजन केवळ सर्वसामान्यांचा विकास हेच असल्याने यांनी अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाNitin Gadkariनितीन गडकरी