शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

महाराष्ट्रात आघाडीचे नव्हे तर एखाद्या टोळीचे राज्य : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 18:52 IST

महाराष्ट्रात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या टोळीचे राज्य आहे की काय असे वाटू लागले आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

गोंदिया : सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, तो सर्व महाराष्ट्राला लाजवणारा व्यवहार चाललेला आहे. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही. परमवीर सिंह यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. त्यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ते राजीनामा देणार नसतील तर मग अनिल देशमुख यांचा राजीनामा कशाला घेतला, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचा अपघातात मृत्यू झाला होता. रहांगडाले कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी चंद्रकांत पाटील शुक्रवारी (दि. ४) तिरोड्याला आले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. लोकांना निवडणुका येईपर्यंत थांबावे लागते, पण आम्ही थांबू शकत नाही. कारण अनिल देशमुख यांच्यावर देखील परमवीर सिंह यांनी आरोपच केले होते. त्यापुढे काही झाले नव्हते, चौकशी पुढे जायचीच होती आणि राजीनामा घेतला गेला. आता तर अनिल देशमुखांना सर्वांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात भयंकर स्थिती

एखाद्या टोळीचे राज्य आहे की काय, असे वाटू लागले आहे. राज्याचे मुख्य सचिव म्हणतात की, अनिल देशमुख मला चिठ्ठी आणून द्यायचे. परमबीर सिंह म्हणतात की, सचिन वाझेंची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी आग्रह धरला होता अन् तिकडे अनिल परबांच्या १०० कोटी रुपयांच्या रिसॉर्टला तोडण्यासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याची नोटीस निघते, अशा एक एक घटना सांगत, काय चाललंय काय महाराष्ट्रात, असा सवाल त्यांनी केला.

आता कुर्सी खाली करो म्हणण्याची वेळ

आता तर किराणा दुकानांतून वाईन विकण्याची परवानगी दिली आहे. हे होईल असे सरकारला वाटत आहे. पण वाईन विक्री सुरू होताच महिलांचे मोर्चे दुकानांवर आणि मंत्र्यांच्या घरांवर धडकतील, तेव्हा सरकारला कळेल. आता जनता जागली आहे. ‘कुर्सी खाली करो, असे सरकारला म्हणण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे