शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात आघाडीचे नव्हे तर एखाद्या टोळीचे राज्य : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 18:52 IST

महाराष्ट्रात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या टोळीचे राज्य आहे की काय असे वाटू लागले आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

गोंदिया : सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, तो सर्व महाराष्ट्राला लाजवणारा व्यवहार चाललेला आहे. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही. परमवीर सिंह यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. त्यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ते राजीनामा देणार नसतील तर मग अनिल देशमुख यांचा राजीनामा कशाला घेतला, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचा अपघातात मृत्यू झाला होता. रहांगडाले कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी चंद्रकांत पाटील शुक्रवारी (दि. ४) तिरोड्याला आले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. लोकांना निवडणुका येईपर्यंत थांबावे लागते, पण आम्ही थांबू शकत नाही. कारण अनिल देशमुख यांच्यावर देखील परमवीर सिंह यांनी आरोपच केले होते. त्यापुढे काही झाले नव्हते, चौकशी पुढे जायचीच होती आणि राजीनामा घेतला गेला. आता तर अनिल देशमुखांना सर्वांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात भयंकर स्थिती

एखाद्या टोळीचे राज्य आहे की काय, असे वाटू लागले आहे. राज्याचे मुख्य सचिव म्हणतात की, अनिल देशमुख मला चिठ्ठी आणून द्यायचे. परमबीर सिंह म्हणतात की, सचिन वाझेंची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी आग्रह धरला होता अन् तिकडे अनिल परबांच्या १०० कोटी रुपयांच्या रिसॉर्टला तोडण्यासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याची नोटीस निघते, अशा एक एक घटना सांगत, काय चाललंय काय महाराष्ट्रात, असा सवाल त्यांनी केला.

आता कुर्सी खाली करो म्हणण्याची वेळ

आता तर किराणा दुकानांतून वाईन विकण्याची परवानगी दिली आहे. हे होईल असे सरकारला वाटत आहे. पण वाईन विक्री सुरू होताच महिलांचे मोर्चे दुकानांवर आणि मंत्र्यांच्या घरांवर धडकतील, तेव्हा सरकारला कळेल. आता जनता जागली आहे. ‘कुर्सी खाली करो, असे सरकारला म्हणण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे