शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वेची लूट, ४९ कि.मी.वरील तुमसरसाठी १५० किमीचे भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:27 IST

गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून बऱ्याच रेल्वेगाड्या बंद आहेत, तर रेल्वे विभागाने काही विशेष गाड्या सुरू ठेवल्या ...

गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून बऱ्याच रेल्वेगाड्या बंद आहेत, तर रेल्वे विभागाने काही विशेष गाड्या सुरू ठेवल्या आहेत. मात्र, या गाड्यांचे तिकिटाचे दर नियमित तिकिटांपेक्षा दुप्पट आहेत. गोंदिया ते तुमसर हे ४९ कि.मी.चे अंतर असून, यासाठी आरक्षित तिकिटाचे दर १७५ रुपये आहे. विशेष म्हणजे एवढ्याच भाड्यात पूर्वी गोंदिया ते नागपूर जाणे शक्य होते. म्हणजे ४९ कि.मी.च्या अंतरासाठी आता प्रवाशांना दीडशे कि.मी.चे भाडे मोजावे लागत आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सध्या ४७ गाड्या नियमित धावत असून, त्यात विशेष गाड्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रीमियम तिकीट दराचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासीसुद्धा आता संतापले असून, आणखी किती दिवस हा भुर्दंड सहन करावा लागणार, असा सवाल करीत आहेत.

.............

आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या

छत्तीसगड-अमृतसर एक्स्प्रेस

हावडा-मुंबई मेल

जबलपूर-चांदाफोर्ट

अजमेर-पुरी एक्स्प्रेस

समता एक्स्प्रेस

गीतांजली एक्स्प्रेस

..................

तिकिटाचे दर दुप्पटच

- कोरोनाचा संसर्गामुळे रेल्वे विभागाने अद्यापही नियमित गाड्या सुरू केल्या नाहीत. तर नियमित गाड्यांनाच विशेष गाड्यांचा दर्जा देऊन तिकीट दरात दुप्पट वाढ केली आहे.

- विशेष गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी आरक्षण करणे अनिवार्य असून, त्याचे दर हे नियमित तिकिटापेक्षा दुप्पट असल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.

- आता कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात आला असून, नियमित गाड्या सुरू करून तिकिटाचे प्रीमियम दर करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

...........

ही लूट कधी बंद होणार?

विशेष गाड्यांच्या नावाखाली आकारले जाणारे तिकिटांचे दर कधी कमी होणार आणि लोकल व पॅसेंजर गाड्या केव्हापर्यंत सुरू यासंदर्भात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्यापही कुठलेही निर्देश मिळाले नसल्याचे सांगितले.

............

प्रवासी वैतागले.......

रेल्वेने कोरोनाचा संसर्गाचा बहाणा सांगत विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. याचे तिकीट दर दुप्पट असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच पगारात कपात झाली असून, खर्च मात्र तिप्पट वाढला आहे.

- आशिष कावळे, प्रवासी

............

कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला असून, परिस्थिती सामान्य झाली आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने आता नियमित गाड्या सुरू करून प्रीमियम तिकिटाचे दर कमी करण्याची गरज आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडत चालले आहे.

- मनोज आगलावे, प्रवासी

...........

किमान १०० : रेल्वे विभागाने ४९ कि.मी.च्या प्रवासाठी विशेष गाड्यांमध्ये १५० कि.मी.चे प्रवास भाडे आकारून प्रवाशांच्या खिशावरील भार वाढविला आहे.

कमाल ३०० : विशेष गाड्यांचे तिकीट दर आकारताना कुठला निकष लावून भाडे दुप्पट करण्यात आले हे मात्र समजण्याच्या पलीकडे आहे.

.............