शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन वाढू न देणे हे आता सर्वस्वी जनतेच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी बलकवडे म्हणाल्या, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या. तसेच नागरिकांनी देखील याला सहकार्य केल्याने जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे सध्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण नाही. शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविला आहे.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : २० एप्रिलनंतर होणार शिथिलता आणण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात आणि राज्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र सुदैवाने गोंदिया जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. तर केंद्र शासनाने २० एप्रिलनंतर काही जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यावरील अंतीम निर्णय हा २० एप्रिलनंतरच होणार असून नागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील नागरिक जेवढ्या कठोरपणे या निर्णयाचे पालन करतील तेवढीच मदत जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यासाठी होईल. एकंदरीत लॉकडाउनचा कालावधी वाढू न देणे हे सर्वस्वी जतनेच्या हातात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१५) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. रूखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजीव दोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी देवचंद वानखेडे, न.प.मुख्याधिकारी चंदन पाटील उपस्थित होते.जिल्हाधिकारी बलकवडे म्हणाल्या, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या. तसेच नागरिकांनी देखील याला सहकार्य केल्याने जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे सध्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण नाही. शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविला आहे. तर २० एप्रिलपासून काही जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात काही गोष्टींसाठी सवलत देण्याची शक्यता आहे. यामध्ये कृषी विषयक कामे, मनरेगाची कामे आणि छोट्या उद्योगांचा समावेश असण्याची शक्यता आहे.मात्र लॉकडाऊनमध्ये काही सुट दिल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घालून देण्यात आलेली बंधने ही कायम राहतील. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन कोरोनाला हद्दपार करण्याची गरज असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढू न देणे हे पूर्णपणे जनतेच्या हाती आहे.जिल्ह्यात अन्नधान्याचा तुटवडा नाहीलॉकडाऊनच्या कालावधी गोरगरीब व गरजू कुटुंबांची परवड होवू नये यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून बीपीएल व अंत्योदय योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत अन्नधान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. जवळपास २ लाख १८ हजार शिधापत्रिकाधारकांनापैकी २ लाख १२ हजार लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप झाले आहे. तर उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच वाटप पूर्ण होईल.जिल्ह्यात १७ आश्रयस्थानेजिल्ह्यात बाहेर राज्य व जिल्ह्यातील मजूर व प्रवाशी अडकले आहे. अशांची राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था काही संस्थाच्या मदतीने केली जात आहे. यासाठी १७ ठिकाणी शेल्टरहोम स्थापन करण्यात आले असून त्यात ७३७ जण आश्रयास असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी